तोष्णीवाल महाविद्यालयात जनजागृती अभियान;नशा मुक्ती सायबर सुरक्षा वाहतुकीचे नियम अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन तोष्णीवाल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या संकल्पनेतून 'जनजागृती अभियान' उत्साहात पार पडला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्तीची गरज युवकांमधील जनजागृती नशा मुक्ती सायबर सुरक्षा वाहतुकीचे नियम अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला विद्यार्थीनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर पी. बी. पाटील तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, पोलीस स्टेशन सेनगाव व हवालदार संदीप गीते आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. उपरोक्त अभियानात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी पी पी टी सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी नशा मुक्त व्हा, अपघात टाळा, सायबर फसवणुक टाळा, मुलाच्या सुरक्षिततेसाठी पाल्य सुरक्षा आदी विषयांना प्राधान्य देत युवकांनी नशेपासून स्वतःला अलिप्त ठेवत अशा कृती करणाऱ्याला त्यापासून परावृत्त करावे. वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालनातून सुरक्षित प्रवास करावा येतो, त्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान हाताळणी जरी सोपी असेल तरी देखील जागृत व विवेकी बनणे आवश्यक आहे. तरच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यातून सहजपणे सुटका करून घेऊन शकता. बाल सुरक्षा ही मुलाच्या सुरक्षिततेसाठी गरजेची आहे, त्यासाठी समाजातील विकृत घटकांना ओळखून आपल्या पाल्यांना त्यांच्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर पी.बी. पाटील यांनी उपरोक्त अभियानाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल अशी ग्वाही देत विद्यार्थ्यांनी उपरोक्त ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टि.यु.केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय फड यांनी केले कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोष्णीवाल महाविद्यालयात जनजागृती अभियान;नशा मुक्ती सायबर सुरक्षा वाहतुकीचे नियम अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन तोष्णीवाल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या संकल्पनेतून 'जनजागृती अभियान' उत्साहात पार पडला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्तीची गरज युवकांमधील जनजागृती नशा मुक्ती सायबर सुरक्षा वाहतुकीचे नियम अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला विद्यार्थीनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर पी. बी. पाटील तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, पोलीस स्टेशन सेनगाव व हवालदार संदीप गीते आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. उपरोक्त अभियानात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी पी पी टी सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी नशा मुक्त व्हा, अपघात टाळा, सायबर फसवणुक टाळा, मुलाच्या सुरक्षिततेसाठी पाल्य सुरक्षा आदी विषयांना प्राधान्य देत युवकांनी नशेपासून स्वतःला अलिप्त ठेवत अशा कृती करणाऱ्याला त्यापासून परावृत्त करावे. वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालनातून सुरक्षित प्रवास करावा येतो, त्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान हाताळणी जरी सोपी असेल तरी देखील जागृत व विवेकी बनणे आवश्यक आहे. तरच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यातून सहजपणे सुटका करून घेऊन शकता. बाल सुरक्षा ही मुलाच्या सुरक्षिततेसाठी गरजेची आहे, त्यासाठी समाजातील विकृत घटकांना ओळखून आपल्या पाल्यांना त्यांच्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर पी.बी. पाटील यांनी उपरोक्त अभियानाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल अशी ग्वाही देत विद्यार्थ्यांनी उपरोक्त ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टि.यु.केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय फड यांनी केले कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.2