logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

4 hrs ago
user_Salman Fayyaz khan
Salman Fayyaz khan
Video editing service Aurangabad, Maharashtra•
4 hrs ago

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पश्चिम बंगाल येथील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी नाझिया इलाही यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शहर जिल्हा कमिटीने केली आहे. नाझिया इलाही यांनी मुस्लिम समाज, महाराष्ट्र पोलीस तसेच इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत पैगंबर मोहम्मद (स.) यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करून धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या मागणीसाठी अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार तसेच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाझिया इलाही यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल यांनी देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा सन्मान राखण्याचा अधिकार दिला असल्याचे सांगितले. कोणत्याही धर्माविषयी किंवा समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी विधाने करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असून, नाझिया इलाही यांच्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने समाजात तणाव निर्माण होण्याचा धोका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याने संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. समाजात शांतता, बंधुता आणि सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. सरताज पठाण, इब्राहिम पठाण, अॅड. इक्बालसिंग गिल, गुलाब पटेल, डॉ. अरुण शिरसाट, असदुल्ला शकील, साजिद कुरेशी, नदीम सौदागर, शेख कैसर बाबा, इरफान पठाण, साहेबराव बनकर, डॉ. सिकंदर शेख, अब्दुल रज्जाक शेख, जसबीरसिंग सौदी, शाहिद खान, मुदस्सीर अन्सारी, अजमल सिद्दीकी, सलीम पटेल, महेश वैद्य, शफीक शेख, सबिया बाजी, शेख आबेद पठाण, शहेबाज खान, अब्दुल रझिक शेख, सय्यद युनूस, सय्यद अशफाक अली, एजाज खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल आणि अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी केले होते.
    1
    पश्चिम बंगाल येथील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी नाझिया इलाही यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शहर जिल्हा कमिटीने केली आहे. नाझिया इलाही यांनी मुस्लिम समाज, महाराष्ट्र पोलीस तसेच इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत पैगंबर मोहम्मद (स.) यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करून धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या मागणीसाठी अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार तसेच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाझिया इलाही यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल यांनी देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा सन्मान राखण्याचा अधिकार दिला असल्याचे सांगितले. कोणत्याही धर्माविषयी किंवा समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी विधाने करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असून, नाझिया इलाही यांच्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने समाजात तणाव निर्माण होण्याचा धोका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याने संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. समाजात शांतता, बंधुता आणि सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. सरताज पठाण, इब्राहिम पठाण, अॅड. इक्बालसिंग गिल, गुलाब पटेल, डॉ. अरुण शिरसाट, असदुल्ला शकील, साजिद कुरेशी, नदीम सौदागर, शेख कैसर बाबा, इरफान पठाण, साहेबराव बनकर, डॉ. सिकंदर शेख, अब्दुल रज्जाक शेख, जसबीरसिंग सौदी, शाहिद खान, मुदस्सीर अन्सारी, अजमल सिद्दीकी, सलीम पटेल, महेश वैद्य, शफीक शेख, सबिया बाजी, शेख आबेद पठाण, शहेबाज खान, अब्दुल रझिक शेख, सय्यद युनूस, सय्यद अशफाक अली, एजाज खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल आणि अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी केले होते.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • २६ जून २०२६ रोजी, बदनापूर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील आकाश हॉटेल (लॉज) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर बदनापूर पोलिसांनी छापा टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने कारवाई करत हॉटेलचा चालक आणि मालक अर्जुन उर्फ शिवा गौरीलाल जोशी (वय २५, रा. देवगाव, ता. बदनापूर, जि. जालना) याला रंगेहात पकडले. जोशी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरगावांहून महिलांना बोलावून हॉटेलमध्ये ठेवून पुरुष ग्राहकांना आकर्षित करून अनैतिक वेश्याव्यवसाय चालवत होता, असे समोर आले आहे. या कारवाईदरम्यान, अक्षय सुधाकर परघणे (वय २८, रा. नेवरी, ता. हदगाव, जि. नांदेड; हल्ली मुक्काम वडगाव कोलाटी, बजाजनगर, जि. छत्रपती संभाजीनगर) नावाचा एक ग्राहकही पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्यांच्याकडून १०५० रुपये रोख रक्कम आणि निरोधचे पाकीट जप्त केले. घटनास्थळी सापडलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल चालक व ग्राहकाविरुद्ध महिलांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या या दोन्ही आरोपींविरोधात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल करत आहेत. सदरची ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक अजय जैस्वाल, पोहेका गणेश नागलोत, पोका पूनमसिंह गोलवाल, पोका शाबान तडवी, पोका रतन तडवी, पोका रामेश्वर सानप आणि महिला पोका प्रीती जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
    2
    २६ जून २०२६ रोजी, बदनापूर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील आकाश हॉटेल (लॉज) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर बदनापूर पोलिसांनी छापा टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने कारवाई करत हॉटेलचा चालक आणि मालक अर्जुन उर्फ शिवा गौरीलाल जोशी (वय २५, रा. देवगाव, ता. बदनापूर, जि. जालना) याला रंगेहात पकडले. जोशी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरगावांहून महिलांना बोलावून हॉटेलमध्ये ठेवून पुरुष ग्राहकांना आकर्षित करून अनैतिक वेश्याव्यवसाय चालवत होता, असे समोर आले आहे.

या कारवाईदरम्यान, अक्षय सुधाकर परघणे (वय २८, रा. नेवरी, ता. हदगाव, जि. नांदेड; हल्ली मुक्काम वडगाव कोलाटी, बजाजनगर, जि. छत्रपती संभाजीनगर) नावाचा एक ग्राहकही पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्यांच्याकडून १०५० रुपये रोख रक्कम आणि निरोधचे पाकीट जप्त केले. घटनास्थळी सापडलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल चालक व ग्राहकाविरुद्ध महिलांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या या दोन्ही आरोपींविरोधात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल करत आहेत.

सदरची ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक अजय जैस्वाल, पोहेका गणेश नागलोत, पोका पूनमसिंह गोलवाल, पोका शाबान तडवी, पोका रतन तडवी, पोका रामेश्वर सानप आणि महिला पोका प्रीती जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • रस्ता बनवला पाहिजे.
    1
    रस्ता बनवला पाहिजे.
    user_Gopal Pawar
    Gopal Pawar
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरात पोलिसांनी तीन भावांची दिंड काढली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन भावांना जाहीरपणे फिरवून ही कारवाई केली.
    1
    छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरात पोलिसांनी तीन भावांची दिंड काढली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन भावांना जाहीरपणे फिरवून ही कारवाई केली.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    1
    महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, तसेच तालुक्याच्या काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र व पुलांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, त्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
    1
    सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, तसेच तालुक्याच्या काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र व पुलांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, त्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
    user_Chetan Lokhande
    Chetan Lokhande
    Video Creator Sillod, Aurangabad•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सध्या वेग आला असून, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुढील १० दिवसांत, तर २००० मिमी व्यासाची जलवाहिनी १५ दिवसांत कार्यान्वित होईल. सध्या या जलवाहिन्यांची स्वच्छता आणि क्रॉस कनेक्शनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की, नव्या योजनेचे पाणी शहरात पोहोचल्यानंतरही नियमित पाणीपुरवठ्यातील खंड कमी होण्यासाठी आणखी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सध्या वेग आला असून, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुढील १० दिवसांत, तर २००० मिमी व्यासाची जलवाहिनी १५ दिवसांत कार्यान्वित होईल.

सध्या या जलवाहिन्यांची स्वच्छता आणि क्रॉस कनेक्शनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की, नव्या योजनेचे पाणी शहरात पोहोचल्यानंतरही नियमित पाणीपुरवठ्यातील खंड कमी होण्यासाठी आणखी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service Aurangabad, Maharashtra•
    15 hrs ago
  • बदनापूर येथील मुस्लिम समाजाने पोलीस ठाण्यात निवेदन देत नाझिया इलाहे खान नावाच्या एका मुस्लिम महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपानुसार, या महिलेने अंदाजे दिनांक ०१.०५.२०२६ पासून आतापर्यंत सोशल मीडियावर मोहम्मद पैगंबर साहेब, त्यांची पत्नी आणि मुस्लिम धर्माबद्दल तसेच मुस्लिम समाजाबद्दल काल्पनिक, बनावट आणि अश्लील भाष्य करणारे व्हिडिओ वेळोवेळी व्हायरल केले आहेत. या महिला वारंवार असे भाष्य आणि कृत्ये करत आहे ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तिच्या कृतींचा उद्देश देशाची सुरक्षा आणि शांतता भंग करणे तसेच समाजासमाजात तेढ निर्माण करणे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बदनापूर येथील मुस्लिम समाजाने मे. साहेबांना विनंती केली आहे की, या महिलेची सखोल चौकशी करून तिच्यावर योग्य त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि एफ.आय.आर. नोंदवण्यात यावा. निवेदन सादर करताना मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
    4
    बदनापूर येथील मुस्लिम समाजाने पोलीस ठाण्यात निवेदन देत नाझिया इलाहे खान नावाच्या एका मुस्लिम महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपानुसार, या महिलेने अंदाजे दिनांक ०१.०५.२०२६ पासून आतापर्यंत सोशल मीडियावर मोहम्मद पैगंबर साहेब, त्यांची पत्नी आणि मुस्लिम धर्माबद्दल तसेच मुस्लिम समाजाबद्दल काल्पनिक, बनावट आणि अश्लील भाष्य करणारे व्हिडिओ वेळोवेळी व्हायरल केले आहेत.

या महिला वारंवार असे भाष्य आणि कृत्ये करत आहे ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तिच्या कृतींचा उद्देश देशाची सुरक्षा आणि शांतता भंग करणे तसेच समाजासमाजात तेढ निर्माण करणे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बदनापूर येथील मुस्लिम समाजाने मे. साहेबांना विनंती केली आहे की, या महिलेची सखोल चौकशी करून तिच्यावर योग्य त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि एफ.आय.आर. नोंदवण्यात यावा. निवेदन सादर करताना मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे तातेराव भुजंग यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे तातेराव भुजंग यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.