भूमच्या 'समाधान शिबिरा'त समाधान होणार की राजकीय सामना? जिल्ह्याचे लक्ष एकाच व्यासपीठाकडे ! भूमच्या 'समाधान शिबिरा'त समाधान होणार की राजकीय सामना? जिल्ह्याचे लक्ष एकाच व्यासपीठाकडे ! धाराशिव | प्रतिनिधी भूम येथे शनिवार, 1 ऑगस्ट रोजी होणारे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' हे केवळ नागरिकांच्या तक्रार निवारणापुरते मर्यादित राहणार की जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणार, याची उत्सुकता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला लागली आहे. यंदाच्या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि त्यांचे भावजय-दीर असलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध महसुली व शासकीय कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी सकाळी 10 वाजता रामहारी मंगल कार्यालय, नगर रोड, भूम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चनाताई पाटील उपस्थित राहणार आहेत. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व अधिक वाढवणारी ठरणार आहे. धाराशिवच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी आणि बदलती समीकरणे चर्चेचा विषय ठरत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सावंत, अर्चनाताई पाटील आणि खासदार ओमराजे हे एकाच मंचावर दिसणार असल्याने अनेकांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी आमदार सावंत यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर स्थानिक राजकारणात निर्माण झालेल्या घडामोडी अजूनही चर्चेत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून काही नवे राजकीय संकेत मिळतात का, याची उत्सुकता राजकीय निरीक्षकांना आहे. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य बसवराज पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण, नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान, तहसीलदार जयवंत पाटील (भूम), निलेश काकडे (परंडा) आणि प्रकाश म्हेत्रे (वाशी) यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महसुली सेवा, विविध शासकीय योजना आणि प्रलंबित प्रकरणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. आता लक्ष एकाच गोष्टीकडे... हे 'समाधान शिबिर' नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान करणार, की राजकीय घडामोडींमुळे चर्चेचा नवा विषय ठरणार?
भूमच्या 'समाधान शिबिरा'त समाधान होणार की राजकीय सामना? जिल्ह्याचे लक्ष एकाच व्यासपीठाकडे ! भूमच्या 'समाधान शिबिरा'त समाधान होणार की राजकीय सामना? जिल्ह्याचे लक्ष एकाच व्यासपीठाकडे ! धाराशिव | प्रतिनिधी भूम येथे शनिवार, 1 ऑगस्ट रोजी होणारे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' हे केवळ नागरिकांच्या तक्रार निवारणापुरते मर्यादित राहणार की जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणार, याची उत्सुकता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला लागली आहे. यंदाच्या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि त्यांचे भावजय-दीर असलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध महसुली व शासकीय कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी सकाळी 10 वाजता रामहारी मंगल कार्यालय, नगर रोड, भूम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चनाताई पाटील उपस्थित राहणार आहेत. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व अधिक वाढवणारी ठरणार आहे. धाराशिवच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी आणि बदलती समीकरणे चर्चेचा विषय ठरत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सावंत, अर्चनाताई पाटील आणि खासदार ओमराजे हे एकाच मंचावर दिसणार असल्याने अनेकांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी आमदार सावंत यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर स्थानिक राजकारणात निर्माण झालेल्या घडामोडी अजूनही चर्चेत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून काही नवे राजकीय संकेत मिळतात का, याची उत्सुकता राजकीय निरीक्षकांना आहे. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य बसवराज पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण, नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान, तहसीलदार जयवंत पाटील (भूम), निलेश काकडे (परंडा) आणि प्रकाश म्हेत्रे (वाशी) यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महसुली सेवा, विविध शासकीय योजना आणि प्रलंबित प्रकरणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. आता लक्ष एकाच गोष्टीकडे... हे 'समाधान शिबिर' नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान करणार, की राजकीय घडामोडींमुळे चर्चेचा नवा विषय ठरणार?
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1