भारतीय संस्कृतीची जगाला लाभलेली अनमोल देणगी असलेल्या योगाच्या प्रसारासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगरचे अध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विशेष पोलीस निरीक्षक शहाजी उमाप, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले, प्रवीण साले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात पाचशेहून अधिक योगसाधकांनी सहभाग नोंदवला. श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर योग संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. त्यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज जगभरात योगाला अभूतपूर्व मान्यता मिळाली असून १९० हून अधिक देशांमध्ये जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. निरोगी भारत आणि सक्षम समाज घडविण्यासाठी योगाचा प्रसार ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात नगरसेविका शांभवी साले, शितल खांडील, सुषमा थोरात, पंढरीनाथ कंठेवार, नागेश शेट्टी, सुभाष देवकते, रामकृष्ण चक्रवार, राजश्री हुरने, प्रकाश उंटवाले, सरदार गुरुबचनसिंघ, राम शेळके, उर्मिला साजणे आणि जी. नागय्या यांचा शाल व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. कामाजी सरोदे, सुरेश लोट, बागड्या यादव, व्यंकटेश जिंदम, अनिल हजारी आणि राज यादव यांच्या हस्ते हा सत्कार झाला. योगशिक्षक सुरेश लंगडापुरे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, तसेच योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास कशी मदत होते, याची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. या शिबिराला अमरनाथ यात्री संघ, पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, हॅपी बीसी ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप, महात्मा फुले शाळा, सचखंड आयटीआय, खालसा हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, अशोक माध्यमिक विद्यालय, भाजपा, विश्व हिंदू परिषद तसेच लायन्स परिवार यांसारख्या विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेतला. दीड तास चाललेल्या या योग सत्रात सहभागींना कोणतीही गैरसोय जाणवली नाही. भव्य व्यासपीठ, मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक व्यवस्था, सहभागींसाठी अल्पोपहार व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. अमर राजुरकर यांनी याप्रसंगी सर्वांचे आभार मानले. युवा मोर्चा अध्यक्ष क्षीरसागर, ओम बंडेवार, शिवा लोट, शुभम महाजन, राजेशसिंह ठाकूर, शंकर नांदेडकर, चंचलसिंग जट, मारुती वाघ, प्रेम जुन्नी, सचिन मित्तल, तौसिफ अहमद, जनार्दन वाकडीकर, शततारका पांढरे, मंगला धुळेकर, वैशाली देबडवार, अनिता हिंगोले, धीरज स्वामी आणि सूर्यकांत कदम, रामजी भानुशाली यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी २४ जून रोजी श्रीराम सेतू, गोवर्धन घाट नांदेड येथे होणाऱ्या २७ व्या चालण्याच्या भव्य स्पर्धेत सर्वांनी भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगर गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन करत आहे. वर्षानुवर्षे वाढत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहता नांदेडमध्ये योगाबाबत जागरूकता आणि आकर्षण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मोठ्या संख्येने झालेल्या उपस्थितीमुळे आयोजकांसह योगप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय संस्कृतीची जगाला लाभलेली अनमोल देणगी असलेल्या योगाच्या प्रसारासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगरचे अध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विशेष पोलीस निरीक्षक शहाजी उमाप, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले, प्रवीण साले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात पाचशेहून अधिक योगसाधकांनी सहभाग नोंदवला. श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर योग संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. त्यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज जगभरात योगाला अभूतपूर्व मान्यता मिळाली असून १९० हून अधिक देशांमध्ये जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. निरोगी भारत आणि सक्षम समाज घडविण्यासाठी योगाचा प्रसार ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात नगरसेविका शांभवी साले, शितल खांडील, सुषमा थोरात, पंढरीनाथ कंठेवार, नागेश शेट्टी, सुभाष देवकते, रामकृष्ण चक्रवार, राजश्री हुरने, प्रकाश उंटवाले, सरदार गुरुबचनसिंघ, राम शेळके, उर्मिला साजणे आणि जी. नागय्या यांचा शाल व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. कामाजी सरोदे, सुरेश लोट, बागड्या यादव, व्यंकटेश जिंदम, अनिल हजारी आणि राज यादव यांच्या हस्ते हा सत्कार झाला. योगशिक्षक सुरेश लंगडापुरे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, तसेच योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास कशी मदत होते, याची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. या शिबिराला अमरनाथ यात्री संघ, पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, हॅपी बीसी ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप, महात्मा फुले शाळा, सचखंड आयटीआय, खालसा हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, अशोक माध्यमिक विद्यालय, भाजपा, विश्व हिंदू परिषद तसेच लायन्स परिवार यांसारख्या विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेतला. दीड तास चाललेल्या या योग सत्रात सहभागींना कोणतीही गैरसोय जाणवली नाही. भव्य व्यासपीठ, मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक व्यवस्था, सहभागींसाठी अल्पोपहार व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. अमर राजुरकर यांनी याप्रसंगी सर्वांचे आभार मानले. युवा मोर्चा अध्यक्ष क्षीरसागर, ओम बंडेवार, शिवा लोट, शुभम महाजन, राजेशसिंह ठाकूर, शंकर नांदेडकर, चंचलसिंग जट, मारुती वाघ, प्रेम जुन्नी, सचिन मित्तल, तौसिफ अहमद, जनार्दन वाकडीकर, शततारका पांढरे, मंगला धुळेकर, वैशाली देबडवार, अनिता हिंगोले, धीरज स्वामी आणि सूर्यकांत कदम, रामजी भानुशाली यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी २४ जून रोजी श्रीराम सेतू, गोवर्धन घाट नांदेड येथे होणाऱ्या २७ व्या चालण्याच्या भव्य स्पर्धेत सर्वांनी भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगर गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन करत आहे. वर्षानुवर्षे वाढत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहता नांदेडमध्ये योगाबाबत जागरूकता आणि आकर्षण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मोठ्या संख्येने झालेल्या उपस्थितीमुळे आयोजकांसह योगप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- नांदेड जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २८ जून रोजी होणार आहे. नांदेड जिल्हा केमिस्ट संघटनेच्या या निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया २८ जूनला पूर्ण केली जाईल.1
- देगलूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी पक्षाचे खासदार शिंदे गटात सामील झाल्याच्या पार्श्वभूमीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट इशारा दिला की, "पिस्तूल असती तर गद्दार खासदारांना गोळ्या घातल्या असत्या. समोर आल्यावर पायातील जोडा काढून मारणार." खासदारांनी पक्षासोबत केलेल्या कथित दगाबाजीवर आपली तीव्र नाराजी व्यक्त करत पाटील यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या संतप्त इशाऱ्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.1
- उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरात म्हशी आणि ट्रॅक्टर ट्रॉली चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले आहे. नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, या संशयितावर यापूर्वीही म्हशी आणि ट्रॅक्टर चोरून विकल्याचा संशय होता. काही नागरिकांना तो नांदेड नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच, त्यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी त्वरीत त्याला पकडले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयिताला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी या प्रकरणातील चोरीच्या इतर घटनांशी त्याचा संबंध आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आहे का, याबाबत सखोल तपास सुरू केला आहे. नागरिकांनी दाखवलेल्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी नागरिक आणि पोलिसांनी समन्वयाने काम केल्यास गुन्हेगारीला आळा घालता येतो. सध्या, "नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरीच्या घटनांमागील संशयित पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू" अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या शेलगाव ग्रामपंचायतीत आजही पाण्यासाठी तीव्र टंचाई असून, गावातील कोणत्याही नागरिकाला घरपोच पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जात असताना आणि गावात जलजीवन मिशनसारख्या योजनेचे काम झाले असतानाही, ही समस्या कायम आहे. पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन वापराच्या पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांची अवस्था स्वातंत्र्यपूर्व काळासारखी झाली आहे. गावात नळजोडणी झालेली असली तरी, या नळांना पाणीच येत नाही. एवढेच नाही तर, गावातील हातपंप किंवा सार्वजनिक बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध नाही. गावातील काही भागांमध्ये रस्ते खाली गेले असून नाले उंच झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यांमध्ये पाणी साचून तळ्यासारखी स्थिती निर्माण होते. काही ठिकाणी नाल्यांची बिले उचलली गेली असली तरी, तिथे नाले बांधले गेलेले नाहीत. नामफलकावर दर्शवल्याप्रमाणे नाले जेवढ्या रस्त्यावर दाखवले आहेत, त्याच्या अर्ध्या भागातच काम झाले असून अर्धा भाग तसाच अपूर्ण आहे, असा भोंगळ कारभार या गावात दिसून येतो. ग्रामपंचायतीत कागदपत्रे काढणे असो किंवा इतर कामे असो, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील सरंपच महिन्यातून केवळ एक-दोन वेळा गावात येत असल्याने ग्रामस्थांच्या अनंत समस्या अधिकच वाढत आहेत.1
- देगलूर येथील मालेगाव मक्ता परिसरात आज पहाटे ०५:०९ वाजता भीषण वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. या वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत, तर रस्त्यांवरून नाल्यांचे पाणी वाहत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने आणि नालीचे पाणी आल्याने वाहने चालवणाऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास होत आहे.2
- नांदेड जिल्ह्यातील माळेगाव मक्ता गावात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, रस्त्यावरच नाला वाहत आहे. आज सकाळी ०५:०० वाजताचे हे दृश्य आहे. या स्थितीमुळे गावकऱ्यांचे हाल होत असून, 'नाला वाहतोय रस्त्यावर अन प्रशासन आहे गादीवर' या म्हणीप्रमाणेच येथील प्रशासनाची निष्क्रियता आणि दुर्लक्ष उघड झाले आहे.1