स साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी कुही : कुही तालुक्यातील साळवा परिसरातील टाकळी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. राधेशाम मारोती खांडेकर (वय ४८, रा. टाकळी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधेशाम खांडेकर हे आपल्या शेतात उरलेला कापूस वेचण्याचे काम करत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर मागून झडप घातली. वाघ अंगावर येत असल्याचे लक्षात येताच खांडेकर यांनी तत्काळ खाली वाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही वाघाच्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला आणि दोन्ही खांद्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला झाल्यानंतर खांडेकर यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे नाना भोयर आणि ईश्वर डहारे हे मदतीसाठी धावून आले. नागरिकांचा वाढता आरडाओरडा पाहून वाघाने तिथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच टाकळीचे सरपंच राजहंस रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राधेशाम खांडेकर यांना स्वतःच्या मोटारसायकलने तातडीने साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अरुण हटवार, माजी जिल्हा नियोजन समीती नागपुर सदस्य भागेश्वर फेडंर, दिलीप कुकडे,नामदेव बुराडे,अतुल भोयल,पुरुषोत्तम खराबे,वनरक्षक सीमा भोयर आणि वनमजूर सुरेश भोयर यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमीची विचारपूस केली. "या घटनेमुळे साळवा आणि राजोला परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी." ~ राजहंस रामटेके, सरपंच टाकळी देवळीखुर्द.
स साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी कुही : कुही तालुक्यातील साळवा परिसरातील टाकळी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. राधेशाम मारोती खांडेकर (वय ४८, रा. टाकळी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधेशाम खांडेकर हे आपल्या शेतात उरलेला कापूस वेचण्याचे काम करत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर मागून
झडप घातली. वाघ अंगावर येत असल्याचे लक्षात येताच खांडेकर यांनी तत्काळ खाली वाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही वाघाच्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला आणि दोन्ही खांद्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला झाल्यानंतर खांडेकर यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे नाना भोयर आणि ईश्वर डहारे हे मदतीसाठी धावून आले. नागरिकांचा वाढता आरडाओरडा पाहून वाघाने तिथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच टाकळीचे सरपंच राजहंस रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राधेशाम खांडेकर
यांना स्वतःच्या मोटारसायकलने तातडीने साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अरुण हटवार, माजी जिल्हा नियोजन समीती नागपुर सदस्य भागेश्वर फेडंर, दिलीप कुकडे,नामदेव बुराडे,अतुल भोयल,पुरुषोत्तम खराबे,वनरक्षक सीमा भोयर आणि वनमजूर सुरेश भोयर यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमीची विचारपूस केली. "या घटनेमुळे साळवा आणि राजोला परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी." ~ राजहंस रामटेके, सरपंच टाकळी देवळीखुर्द.
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1