स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी तालुका जिल्हा नांदेड येथे आयोजित सात दिवसीय विश्वास वार्षिक युवक शिबिर आयोजित करण्यात आले. शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७. मार्च स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथे आयोजित सात दिवसीय विशेष वार्षिक युवक शिबिरात 'मोबाईल जर्नलिझम' (MoJo) या विषयावर विशेष प्रशिक्षण सत्र उत्साहात पार पडले. या शिबिरात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण धडे शिबिरार्थींना देण्यात आले. या विशेष सत्रात माध्यमशास्त्र संकुल येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. "आजच्या काळात मोबाईल फोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून, ते पत्रकारितेचे आणि स्वयंरोजगाराचे एक प्रगत माध्यम बनले आहे," असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. डॉ. यादव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून दर्जेदार व्हिडिओ चित्रीकरण करणे, बातमीला प्रभावी 'व्हॉइस ओव्हर' देणे, आकर्षक टायटल्स तयार करणे आणि 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकग्राऊंड बदलणे तसेच संगीताचा वापर करून व्हिडिओ अधिक परिणामकारक कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून बातमीदारी करून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्गही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या प्रशिक्षण सत्राच्या अध्यक्षस्थानी रासेयो विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड हे उपस्थित होते आपल्या अभिभाषणात रासेयो चे कार्य, महत्त्व आदी माहिती विद्यार्थ्या सविस्तर समजावून सांगितले याप्रसंगी विद्यापीठ परिसर समन्वयक तथा माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. सुहास पाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात संपूर्ण गावाचा विकास करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे किती गरजेचे आहे हे विविध उदाहरण देऊन पटवून सांगितले अशा तांत्रिक कौशल्यआधारित उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सामाजिक समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना एक नवे व्यासपीठ व कौशल्य प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन डॉ.पाठक यांनी केले. या शिबिरात जवळपास 54 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी तालुका जिल्हा नांदेड येथे आयोजित सात दिवसीय विश्वास वार्षिक युवक शिबिर आयोजित करण्यात आले. शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७. मार्च स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथे आयोजित सात दिवसीय विशेष वार्षिक युवक शिबिरात 'मोबाईल जर्नलिझम' (MoJo) या विषयावर विशेष प्रशिक्षण सत्र उत्साहात पार पडले. या
शिबिरात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण धडे शिबिरार्थींना देण्यात आले. या विशेष सत्रात माध्यमशास्त्र संकुल येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. "आजच्या काळात मोबाईल फोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून, ते पत्रकारितेचे आणि स्वयंरोजगाराचे एक प्रगत माध्यम बनले आहे," असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. डॉ. यादव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून दर्जेदार व्हिडिओ चित्रीकरण करणे, बातमीला प्रभावी 'व्हॉइस ओव्हर' देणे, आकर्षक
टायटल्स तयार करणे आणि 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकग्राऊंड बदलणे तसेच संगीताचा वापर करून व्हिडिओ अधिक परिणामकारक कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून बातमीदारी करून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्गही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या प्रशिक्षण सत्राच्या अध्यक्षस्थानी रासेयो विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड हे उपस्थित होते आपल्या अभिभाषणात रासेयो चे कार्य, महत्त्व आदी माहिती विद्यार्थ्या सविस्तर समजावून सांगितले याप्रसंगी विद्यापीठ परिसर समन्वयक तथा माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक
प्रा. डॉ. सुहास पाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात संपूर्ण गावाचा विकास करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे किती गरजेचे आहे हे विविध उदाहरण देऊन पटवून सांगितले अशा तांत्रिक कौशल्यआधारित उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सामाजिक समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना एक नवे व्यासपीठ व कौशल्य प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन डॉ.पाठक यांनी केले. या शिबिरात जवळपास 54 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
- Post by Today One Live1
- वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia1
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- हिमायतनगरात आंदोलन तीव्र – ‘ रविवार बंद’ चा इशारा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. 👉 “जागा मिळेपर्यंत माघार नाही” – उपोषणकर्त्यांचा निर्धार 👉 नगरपंचायतीच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये संताप 👉 प्रहार जनशक्तीकडून रविवारी हिमायतनगर बंदचा इशारा 🔥 वाढता पाठिंबा… वाढतं आंदोलन… निर्णयाची प्रतीक्षा! #Himayatnagar #ShivajiMaharaj #HimayatnagarBandh #Prahar #Maharashtra BreakingNews MarathiNews LocalNews1