एमएमआरडीएच्या 600 TPD एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे 60% काम पूर्ण मुंबई, 16 सप्टेंबर 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 600 टन प्रतिदिन (TPD) क्षमतेच्या एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे 60% भौतिक काम पूर्ण झाले आहे. KfW – Mumbai Metropolitan Region Urban Infrastructure Improvement Programme (MMRUIIP) अंतर्गत सहाय्यित हा प्रकल्प बदलापूर येथे उभारण्यात येत असून, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांसाठी एकात्मिक आणि शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. कचरा निर्मिती कमी करणे, त्यातील उपयुक्त संसाधनांची पुनर्प्राप्ती आणि उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट या तत्त्वांवर आधारित हा प्रकल्प तीनही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील कचरा व्यवस्थापनाच्या प्रमुख आव्हानांवर दीर्घकालीन उपाय उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशातील अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाला चालना मिळणार आहे. *प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये* * क्षमता: प्रतिदिन 600 टन महानगरपालिका घनकचऱ्यावर प्रक्रिया * ठिकाण: बदलापूर * मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF) द्वारे पुनर्वापरयोग्य घटकांचे वर्गीकरण आणि पुनर्प्राप्ती * जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र सुविधा * उर्वरित कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी शास्त्रोक्त सॅनिटरी लँडफिल * कचरा कमी करणे, संसाधन पुनर्प्राप्ती आणि शास्त्रोक्त विल्हेवाट या तत्त्वांवर आधारित व्यवस्था * Design-Build-Operate-Transfer (DBOT) तत्त्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी हा प्रकल्प चक्रीय अर्थव्यवस्थेच्या (Circular Economy) तत्त्वांना बळकटी देणार आहे. कचऱ्यातील कागद, प्लास्टिक, धातू आणि काच यांसारख्या उपयुक्त घटकांची पुनर्प्राप्ती व पुनर्चक्रण करून नैसर्गिक कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. जैवविघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट तसेच उर्वरित योग्य कचऱ्यापासून Refuse Derived Fuel (RDF) तयार करण्याची प्रक्रियाही या व्यवस्थेचा भाग असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरमधील महानगरपालिका घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाची क्षमता लक्षणीयरीत्या बळकट होणार असून, नागरिकांना अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल. *नागरिक आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे फायदे* प्रतिदिन 600 टन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया झाल्यामुळे तीनही शहरांमधील कचरा व्यवस्थापन सेवा अधिक सक्षम होतील. उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण आणि लँडफिलवरील अवलंबित्व कमी होऊन दुर्गंधी, रोगवाहक कीटकांची उत्पत्ती आणि आग लागण्यासारखे धोके कमी करण्यास मदत होईल. जैवविघटनशील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यामुळे मिथेन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर लिचेटवर शास्त्रोक्त प्रक्रिया करून माती आणि भूजलाचे संरक्षण करण्यास हातभार लागेल. कागद, प्लास्टिक, धातू आणि काच यांची पुनर्प्राप्ती व पुनर्चक्रण, जैवविघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती आणि RDF उत्पादनामुळे जास्तीत जास्त संसाधन पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी लँडफिल विल्हेवाट शक्य होईल. प्रकल्पाच्या बांधकाम आणि परिचालनाच्या टप्प्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच अनौपचारिक कचरा वेचकांना औपचारिक कचरा व्यवस्थापन प्रणालीशी जोडून त्यांच्यासाठी अधिक संघटित, सुरक्षित आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल. यामुळे प्रादेशिक पुनर्चक्रण उद्योगालाही चालना मिळून शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लागेल. *अंमलबजावणीला गती देण्यासाठी एमएमआरडीएचा सक्रिय पुढाकार* तीन शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध भागधारकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएमआरडीए सातत्यपूर्ण समन्वय आणि नियमित देखरेखीच्या माध्यमातून सक्रिय भूमिका बजावत आहे. एमएमआरडीए, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, KfW Development Bank, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, कंत्राटदार, तंत्रज्ञान पुरवठादार आणि वैधानिक प्राधिकरणे यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात आहे. प्रकल्पाची प्रगती गतिमान ठेवण्यासाठी नियमित आढावा बैठका, टप्प्याटप्प्याने स्थळ विकास, वैधानिक मंजुरींसाठी समन्वय, पूर्वीपासून साचलेल्या कचऱ्याचे निर्मूलन, नियंत्रित ब्लास्टिंगसाठी समन्वय, पूरक पायाभूत सुविधांचा विकास तसेच यंत्रसामग्रीची खरेदी आणि उभारणी यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी माइलस्टोन-आधारित देयक प्रणाली, स्वतंत्र तांत्रिक पडताळणी आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत सातत्यपूर्ण पर्यवेक्षण करण्यात येत आहे. तसेच KfW Development Bank सोबत नियमित समन्वयातून लागू असलेल्या पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) निकषांचे पालन सुनिश्चित करण्यात येत आहे. 60% भौतिक प्रगतीचा टप्पा गाठल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने पुढे जात असून, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरसाठी आधुनिक, शास्त्रोक्त आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाची मजबूत पायाभरणी होत आहे.
एमएमआरडीएच्या 600 TPD एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे 60% काम पूर्ण मुंबई, 16 सप्टेंबर 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 600 टन प्रतिदिन (TPD) क्षमतेच्या एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे 60% भौतिक काम पूर्ण झाले आहे. KfW – Mumbai Metropolitan Region Urban Infrastructure Improvement Programme (MMRUIIP) अंतर्गत सहाय्यित हा प्रकल्प बदलापूर येथे उभारण्यात येत असून, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांसाठी एकात्मिक आणि शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. कचरा निर्मिती कमी करणे, त्यातील उपयुक्त संसाधनांची पुनर्प्राप्ती आणि उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट या तत्त्वांवर आधारित हा प्रकल्प तीनही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील कचरा व्यवस्थापनाच्या प्रमुख आव्हानांवर दीर्घकालीन उपाय उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशातील अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाला चालना मिळणार आहे. *प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये* * क्षमता: प्रतिदिन 600 टन महानगरपालिका घनकचऱ्यावर प्रक्रिया * ठिकाण: बदलापूर * मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF) द्वारे पुनर्वापरयोग्य घटकांचे वर्गीकरण आणि पुनर्प्राप्ती * जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र सुविधा * उर्वरित कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी शास्त्रोक्त सॅनिटरी लँडफिल * कचरा कमी करणे, संसाधन पुनर्प्राप्ती आणि शास्त्रोक्त विल्हेवाट या तत्त्वांवर आधारित व्यवस्था * Design-Build-Operate-Transfer (DBOT) तत्त्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी हा प्रकल्प चक्रीय अर्थव्यवस्थेच्या (Circular Economy) तत्त्वांना बळकटी देणार आहे. कचऱ्यातील कागद, प्लास्टिक, धातू आणि काच यांसारख्या उपयुक्त घटकांची पुनर्प्राप्ती व पुनर्चक्रण करून नैसर्गिक कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. जैवविघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट तसेच उर्वरित योग्य कचऱ्यापासून Refuse Derived Fuel (RDF) तयार करण्याची प्रक्रियाही या व्यवस्थेचा भाग असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरमधील महानगरपालिका घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाची क्षमता लक्षणीयरीत्या बळकट होणार असून, नागरिकांना अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल. *नागरिक आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे फायदे* प्रतिदिन 600 टन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया झाल्यामुळे तीनही शहरांमधील कचरा व्यवस्थापन सेवा अधिक सक्षम होतील. उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण आणि लँडफिलवरील अवलंबित्व कमी होऊन दुर्गंधी, रोगवाहक कीटकांची उत्पत्ती आणि आग लागण्यासारखे धोके कमी करण्यास मदत होईल. जैवविघटनशील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यामुळे मिथेन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर लिचेटवर शास्त्रोक्त प्रक्रिया करून माती आणि भूजलाचे संरक्षण करण्यास हातभार लागेल. कागद, प्लास्टिक, धातू आणि काच यांची पुनर्प्राप्ती व पुनर्चक्रण, जैवविघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती आणि RDF उत्पादनामुळे जास्तीत जास्त संसाधन पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी लँडफिल विल्हेवाट शक्य होईल. प्रकल्पाच्या बांधकाम आणि परिचालनाच्या टप्प्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच अनौपचारिक कचरा वेचकांना औपचारिक कचरा व्यवस्थापन प्रणालीशी जोडून त्यांच्यासाठी अधिक संघटित, सुरक्षित आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल. यामुळे प्रादेशिक पुनर्चक्रण उद्योगालाही चालना मिळून शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लागेल. *अंमलबजावणीला गती देण्यासाठी एमएमआरडीएचा सक्रिय पुढाकार* तीन शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध भागधारकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएमआरडीए सातत्यपूर्ण समन्वय आणि नियमित देखरेखीच्या माध्यमातून सक्रिय भूमिका बजावत आहे. एमएमआरडीए, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, KfW Development Bank, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, कंत्राटदार, तंत्रज्ञान पुरवठादार आणि वैधानिक प्राधिकरणे यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात आहे. प्रकल्पाची प्रगती गतिमान ठेवण्यासाठी नियमित आढावा बैठका, टप्प्याटप्प्याने स्थळ विकास, वैधानिक मंजुरींसाठी समन्वय, पूर्वीपासून साचलेल्या कचऱ्याचे निर्मूलन, नियंत्रित ब्लास्टिंगसाठी समन्वय, पूरक पायाभूत सुविधांचा विकास तसेच यंत्रसामग्रीची खरेदी आणि उभारणी यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी माइलस्टोन-आधारित देयक प्रणाली, स्वतंत्र तांत्रिक पडताळणी आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत सातत्यपूर्ण पर्यवेक्षण करण्यात येत आहे. तसेच KfW Development Bank सोबत नियमित समन्वयातून लागू असलेल्या पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) निकषांचे पालन सुनिश्चित करण्यात येत आहे. 60% भौतिक प्रगतीचा टप्पा गाठल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने पुढे जात असून, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरसाठी आधुनिक, शास्त्रोक्त आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाची मजबूत पायाभरणी होत आहे.
- राजस्थान चुनाव 2026: मां का वोट बना बेटे की जीत की वजह | मां का आखिरी वोट बेटे के लिए भावुक कर देने वाली ताकत बन गया। मतदान के बाद मां ने बेटे की जीत की कामना की, और चुनाव परिणाम आने के बाद यह वोट परिवार के लिए यादगार बन गया।1
- > 25 saal ka hisab ek video me! Gujarat Model se Viksit Bharat tak - Jo poochte hain "Modi ji ne kya kiya", unko ye video dikhao. Naam hai Mani Menan, Masjid Bunder East, Mumbai 09 - Dil se BJP parivar 🙏 #25YearsOfSeva1
- सुप्रिया श्रीनेत ने UPI के नए नियम पर क्या कहा? 15 अक्टूबर से क्या बदलेगा? | UPI New Rule 2026 UPI Payment New Rule 2026: UPI को लेकर नए नियमों पर चर्चा तेज है। सुप्रिया श्रीनेत ने UPI और नए शुल्क नियम को लेकर क्या कहा? इस वीडियो में जानिए पूरी बात।1
- मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...1
- रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प! रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!1
- “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda1
- 14वीं मंजिल से गिरी, सिर सलामत रहा? 6 साल बाद बॉम्बे हाईकोर्ट ने पूछा - ये कैसी जांच थी? मुंबई, 16 सितंबर सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियान मामले में 6 साल बाद फिर भूचाल आ गया है। सोशल मीडिया पर हाईकोर्ट में क्या हुआ? - वीडियो में किए गए दावे 1. मेडिकल रिपोर्ट पर सवाल: कोर्ट ने पूछा कि 14वीं मंजिल यानी करीब 150 फीट की ऊंचाई से गिरने पर किसी का सिर्फ सामने का दांत कैसे टूट सकता है? इतनी ऊंचाई से गिरने पर खोपड़ी में फ्रैक्चर क्यों नहीं हुआ? 2. खून वाला बहाना फेल: सरकारी वकील ने कहा कि बारिश में खून बह गया। कोर्ट ने मौसम विभाग का रिकॉर्ड दिखाया कि घटना आधी रात को हुई थी और बारिश सुबह 9:40 बजे शुरू हुई थी। बीच में 8 घंटे का गैप था तो खून कैसे बह गया? 3. फॉरेंसिक में भारी लापरवाही का आरोप: वीडियो में आरोप लगाया गया है कि - • दिशा के नाखूनों के सैंपल सुरक्षित नहीं रखे गए • पोस्टमार्टम की वीडियो रिकॉर्डिंग नहीं की गई • पोस्टमार्टम 2-3 डॉक्टरों के पैनल ने नहीं, अकेले डॉक्टर ने किया • मौत 8 जून को हुई और पोस्टमार्टम 3 दिन बाद 11 जून को किया गया सुशांत केस से क्या कनेक्शन बताया गया? वीडियो में कहा गया है कि 8 जून को दिशा की खबर आने के बाद 9 से 14 जून तक सुशांत बहुत घबराए हुए थे। 14 जून को जब उनके कमरे का दरवाजा नहीं खुला तो चाबी वाले को बुलाया गया, लेकिन ताला खुलते ही उसे अंदर देखे बिना ही बाहर भेज दिया गया। फ्लैट को तुरंत सील नहीं किया गया, जिससे कई सबूत कमजोर हो गए। दूसरा पहलू भी जान लीजिए इस याचिका में दिशा के पिता ने इंसाफ की मांग की है। याचिका में कुछ बड़े राजनीतिक और फिल्मी लोगों पर आरोप लगाए गए हैं। वहीं जिन पर आरोप लगे हैं उनका हमेशा से कहना रहा है कि ये सब राजनीति से प्रेरित है और उनकी छवि खराब करने की साजिश है। कानून के हिसाब से याचिका में नाम आने से ही कोई दोषी नहीं हो जाता। दोष तब तक साबित नहीं होता जब तक पक्के वैज्ञानिक और डिजिटल सबूत कोर्ट में साबित न हो जाएं। इससे पहले एम्स की मेडिकल टीम ने सुशांत मामले को आत्महत्या ही बताया था। अब सबकी नजर इस बात पर है कि 6 साल बाद क्या सच सामने आ पाएगा।1
- होर्मुज में ईरानी लड़ाके युद्ध के लिए तैनात। हो रही जोरदार जंग1