कुंभमेळा मार्गाची दयनीय अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ कुरखेडा. *कुरखेडा–कुंभीटोला मार्गाची दयनीय अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ*! *खड्डे, धोकादायक वळणे, झुडपांचे साम्राज्य; आंदोलक भूमिका घेण्याचा नागरिकांचा इशारा* कुरखेडा–कुंभीटोला हा अत्यंत वर्दळीचा डांबरी मार्ग आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात या मार्गावर जागोजागी पाणी साचून मोठमोठे खड्डे लपून जात असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. या मार्गावर वर्षभर रेती व विटांची जड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, याची माहिती असूनही संबंधित प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धोकादायक वळणांवर वाढलेली झाडे व झुडपे वाहनचालकांची दृष्टी आडवी करत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नागरिकांना या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कुरखेडा शहराकडे अवघ्या दोन किलोमीटरचा प्रवासही जीवघेणा ठरत असून याच मार्गावर यापूर्वी अनेक अपघात घडल्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली. विशेष म्हणजे, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजविणे, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे हटविणे किंवा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता आणि उदासीनता उघड झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कुंभीटोला परिसरातील नागरिकांनी तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, धोकादायक वळणांवरील झाडे-झुडपे हटवावीत आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. "अपघात झाल्यानंतर जागे होणाऱ्या प्रशासनाने आता तरी झोपेतून उठावे. एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा बळी गेल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
कुंभमेळा मार्गाची दयनीय अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ कुरखेडा. *कुरखेडा–कुंभीटोला मार्गाची दयनीय अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ*! *खड्डे, धोकादायक वळणे, झुडपांचे साम्राज्य; आंदोलक भूमिका घेण्याचा नागरिकांचा इशारा* कुरखेडा–कुंभीटोला हा अत्यंत वर्दळीचा डांबरी मार्ग आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात या मार्गावर जागोजागी पाणी साचून मोठमोठे खड्डे लपून जात असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. या मार्गावर वर्षभर रेती व विटांची जड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, याची माहिती असूनही संबंधित प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धोकादायक वळणांवर वाढलेली झाडे व झुडपे वाहनचालकांची दृष्टी आडवी करत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नागरिकांना या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कुरखेडा शहराकडे अवघ्या दोन किलोमीटरचा प्रवासही जीवघेणा ठरत असून याच मार्गावर यापूर्वी अनेक अपघात घडल्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली. विशेष म्हणजे, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजविणे, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे हटविणे किंवा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता आणि उदासीनता उघड झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कुंभीटोला परिसरातील नागरिकांनी तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, धोकादायक वळणांवरील झाडे-झुडपे हटवावीत आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. "अपघात झाल्यानंतर जागे होणाऱ्या प्रशासनाने आता तरी झोपेतून उठावे. एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा बळी गेल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- वाडा बिअर बार मध्ये जुगार खेळतां ना सात आरोपीवर कारवाई , शहरात एकच खळबळ ८ कक्ष ५६ हजार ५० हजारचा मुद्देमाल जप्त उमरेड । भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २ किमी अंतरावर असलेल्या भिवापूर - उमरेड महामार्गवर असलेला वाडा बार मधील एका खोलीत जुगार खेळत असतांना ७ जणांवर कारवाई करीत ८ लक्ष ५६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. सदरच्या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. दि. ३० जुलै सायंकाळच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर वाडा बार येथे एका बंदिस्त जागेत सात व्यक्ति पैशाची बाजी लावून हारजीत जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय किशोर सिंग ठाकूर यांनी केली आहे.सदरच्या कारवाई मध्ये आरोपीकडून ४४ ६०० रूपये नगदी, मोबाईल हन्डसेट ९ नग २,६५, ००० रुपये , दुचाकी वाहने १,४५, ००० रुपये, चारचाकी वाहन ४,००, ००० रुपये असा सर्व मिळून एकूण ८, ५६, ०५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1