नाशिक:मनमाड–इंदौर रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक संपन्न! मनमाड–इंदौर (मनमाड–धुळे) रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक तहसील कार्यालय, मालेगाव येथे पार पडली. या बैठकीस मंत्री दादा भुसे, अप्पर जिल्हाधिकारी, मनमाड–इंदौर रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी तसेच जळगाव, काळेवाडी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, मेहुणे, ज्वार्डी, सवंदगाव, सायने बु., चिखलओहोळ, देवारपाडे, झोडगे आदी गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या समस्या सविस्तर जाणून घेतल्या व त्यावर संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पार पाडली जावी, यासाठी स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांना भूसंपादनापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांकडे भूसंपादनानंतर दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमीन उरणार आहे, त्यांचे संपूर्ण क्षेत्र संपादित करण्याबाबत विचार करण्यात यावा, असे सांगितले. रस्त्याच्या प्रकारानुसार आवश्यक त्या ठिकाणी क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि प्रकल्पासाठी आवश्यक तेवढ्याच रुंदीचे भूसंपादन करावे, असेही स्पष्ट केले. याशिवाय, भूसंपादनाच्या मागणीसाठी आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. प्रत्येक गावातील जमिनींचे बाजारभाव रेडीरेकनर दरापेक्षा अधिक असल्याची बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देशही दिले. प्रत्येक गावनिहाय प्रति एकर भूसंपादन दर पारदर्शकपणे जाहीर करण्यात यावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळेल, असेही नमूद केले. तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून प्रस्तावित जमिनींच्या मोबदल्याबाबत सविस्तर चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री जाधव असे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नाशिक:मनमाड–इंदौर रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक संपन्न! मनमाड–इंदौर (मनमाड–धुळे) रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक तहसील कार्यालय, मालेगाव येथे पार पडली. या बैठकीस मंत्री दादा भुसे, अप्पर जिल्हाधिकारी, मनमाड–इंदौर रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी तसेच जळगाव, काळेवाडी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, मेहुणे, ज्वार्डी, सवंदगाव, सायने बु., चिखलओहोळ, देवारपाडे, झोडगे आदी गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या समस्या सविस्तर जाणून घेतल्या व त्यावर संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पार पाडली जावी, यासाठी स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांना भूसंपादनापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांकडे भूसंपादनानंतर दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमीन उरणार आहे, त्यांचे संपूर्ण क्षेत्र संपादित करण्याबाबत विचार करण्यात यावा, असे सांगितले. रस्त्याच्या प्रकारानुसार आवश्यक त्या ठिकाणी क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि प्रकल्पासाठी आवश्यक तेवढ्याच रुंदीचे भूसंपादन करावे, असेही स्पष्ट केले. याशिवाय, भूसंपादनाच्या मागणीसाठी आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. प्रत्येक गावातील जमिनींचे बाजारभाव रेडीरेकनर दरापेक्षा अधिक असल्याची बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देशही दिले. प्रत्येक गावनिहाय प्रति एकर भूसंपादन दर पारदर्शकपणे जाहीर करण्यात यावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळेल, असेही नमूद केले. तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून प्रस्तावित जमिनींच्या मोबदल्याबाबत सविस्तर चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री जाधव असे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
- Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...1
- Post by Afsjcjryued1
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- मुंब्रा MLA जितेंद्र आव्हाड ने S I R को लेकर क्या कहा मतदाताओं से सतर्क हो जाओ BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- सीएम नीतीश कुमार के इस्तीफ़ा देने के बाद फूट-फूट कर रोने लगे मंत्री अशोक चौधरी !!1