राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे सन्मानित समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आकर्षक आणि संस्मरणीय ठरला. या सोहळ्यात लातूर येथील दैनिक जगमित्रचे जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांना त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठित “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन २०१७ पासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या सोनवणे यांनी समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत जनजागृती केली असून, त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मोलाचा हातभार लागला आहे. मान्यवरांची उपस्थिती: या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार व समाजकार्यकर्ते अॅड. बाळासाहेब तोरस्कर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाशदादा सुर्वे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस सब इन्स्पेक्टर मंगेश अनंत नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. स्वागताध्यक्ष व संयोजिका म्हणून सौ. मीनाक्षी महादेव पाखरे यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले, तर ट्रस्टचे सचिव महेश महादेव पाखरे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन केले. यावेळी राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त प्राध्यापिका व ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अलका नाईक तसेच डॉ. रावसाहेब नाना घोडेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारिता व समाजकार्य हे लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगत, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सोहळ्यात कला, क्रीडा, साहित्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची शोभा अधिक खुलवली. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. उत्कृष्ट नियोजन व भोजन व्यवस्थेची विशेष दखल कार्यक्रमासोबतच आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी अत्यंत सुंदर, सुटसुटीत व नियोजनबद्ध पद्धतीने भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता, शिस्तबद्धता आणि रुचकर खाद्यपदार्थ यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनापासून कौतुक केले. या व्यवस्थेमुळे कार्यक्रमाला अधिक चारचाँद लागले.
राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे सन्मानित समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आकर्षक आणि संस्मरणीय ठरला. या सोहळ्यात लातूर येथील दैनिक जगमित्रचे जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांना त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठित “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन २०१७ पासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या सोनवणे यांनी समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत जनजागृती केली असून, त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मोलाचा हातभार लागला आहे. मान्यवरांची उपस्थिती: या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार व समाजकार्यकर्ते अॅड. बाळासाहेब तोरस्कर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाशदादा सुर्वे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस सब इन्स्पेक्टर मंगेश अनंत नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. स्वागताध्यक्ष व संयोजिका म्हणून सौ. मीनाक्षी महादेव पाखरे यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले, तर ट्रस्टचे सचिव महेश महादेव पाखरे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन केले. यावेळी राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त प्राध्यापिका व ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अलका नाईक तसेच डॉ. रावसाहेब नाना घोडेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारिता व समाजकार्य हे लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगत, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सोहळ्यात कला, क्रीडा, साहित्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची शोभा अधिक खुलवली. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. उत्कृष्ट नियोजन व भोजन व्यवस्थेची विशेष दखल कार्यक्रमासोबतच आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी अत्यंत सुंदर, सुटसुटीत व नियोजनबद्ध पद्धतीने भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता, शिस्तबद्धता आणि रुचकर खाद्यपदार्थ यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनापासून कौतुक केले. या व्यवस्थेमुळे कार्यक्रमाला अधिक चारचाँद लागले.
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- Post by Karan1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1