फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन जळगाव प्रतिनिधी वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या उदाहरणांमुळे उपस्थितांना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यापासून बचाव करण्याचे प्रभावी मार्ग समजले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी अशा जनजागृती उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती वाढण्यास मोलाची मदत झाली.
फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन जळगाव प्रतिनिधी वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या उदाहरणांमुळे उपस्थितांना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यापासून बचाव करण्याचे प्रभावी मार्ग समजले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी अशा जनजागृती उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती वाढण्यास मोलाची मदत झाली.
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- Muslim colony Khadka ward kramank 31
- ek hi barish mein new Eid ka gharon ke pass Tak gussa Pani yah ek Hi din ki barish mein Khadka Gram Panchayat ke new Eid ka colony ke HAL1
- जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1
- भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता भिवंडी, ३१ जुलै भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड, नारपोली येथील गंगाराम वाडी परिसरात काल रात्री सुमारे साडेअकरा वाजता चार मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी-विंगचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून सुमारे सहा ते दहा मजूर अजूनही अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इमारत आधीच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने ‘कॅटेगरी सी’ म्हणजे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केली होती. प्रशासनाकडून चार नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि बहुतेक रहिवासी बाहेर काढले होते. तरीही ग्राउंड फ्लोअरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना आणि काही व्यक्ती आत असताना इमारत कोसळली, असे प्राथमिक माहितीवरून समजते. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकर्त्यांना लोखंड आणि काँक्रिटचे ढिगारे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. मृतदेह आयजीएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. भिवंडी वेस्टचे आमदार महेश चौगुले यांनी सांगितले, “ही कोहिनूर इमारत भंडारी कंपाउंडमध्ये आहे. महानगरपालिकेने ती धोकादायक म्हणून वर्गीकृत केली होती. इमारत रिकामी होती, पण ग्राउंड फ्लोअरवर काम सुरू होते. सहा-सात मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि पोलीस टीम घटनास्थळी आहेत.” भिवंडीतील अनेक इमारती अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धोकादायक असल्याची समस्या गेली अनेक वर्षे सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षा नियमांचे पालन आणि अंमलबजावणीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बचावकार्य सध्याही वेगाने सुरू आहे.1