पंढरपूर येथील गोपाळपूरमधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) च्या भव्य क्रीडांगणावर राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान व स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) व स्वेरी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या प्रसंगी योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक श्री. राजेंद्र अनवते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण भविष्यात अनेक व्याधींपासून दूर राहू शकतो. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगाचे सातत्य महत्त्वाचे असून, योगामुळे मन स्थिर व बुद्धी चंचल राहून कामातील उत्साह वाढतो. समीर बॉम्बेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी योग साधनेचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की, योग शरीर मनाला, मन आत्म्याला आणि आत्मा परमात्म्याला जोडण्यासाठी आवश्यक आहे. स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून स्वीकारला आहे, ज्यामुळे सर्वांना योगाचा फायदा होत आहे. त्यांनी नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी योगासारखे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे मन स्थिर राहते आणि प्रगती झपाट्याने होते. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, वज्रासन, भुजंगासन, पद्मासन, सुखासन, सूर्यनमस्कार यांसारखी विविध आसने करवून घेण्यात आली. करकंब येथील विद्यार्थिनी अमृता सरगुले हिने योगाची विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली, ज्यात तिने शरीराची लवचिकता व सहजता दाखवली. या कार्यक्रमाला स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट, वडाळा, मुंबईच्या प्राचार्या डॉ. संगीता जोशी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, उन्नत भारत अभियानचे प्रमुख प्रा. प्रशांत भागानगरे, सर्व समन्वयक, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोलकाता (पश्चिम बंगाल) मध्ये झालेल्या योग कार्यक्रमाचे प्रक्षेपण स्वेरीच्या प्रांगणात मोठ्या एलसीडीच्या माध्यमातून दाखवण्यात आले, याचा लाभ उपस्थितांनी घेतला. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या सूचनेनुसार जुलै २०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला नियमितपणे ‘स्वेरी योगा डे’ साजरा केला जाणार असून, दैनंदिन वेळापत्रकात सकाळी १०:०० ते १०:३० या वेळेत स्वेरीतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून योगा केला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
पंढरपूर येथील गोपाळपूरमधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) च्या भव्य क्रीडांगणावर राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान व स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) व स्वेरी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या प्रसंगी योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक श्री. राजेंद्र अनवते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण भविष्यात अनेक व्याधींपासून दूर राहू शकतो. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगाचे सातत्य महत्त्वाचे असून, योगामुळे मन स्थिर व बुद्धी चंचल राहून कामातील उत्साह वाढतो. समीर बॉम्बेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी योग साधनेचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की, योग शरीर मनाला, मन आत्म्याला आणि आत्मा परमात्म्याला जोडण्यासाठी आवश्यक आहे. स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून स्वीकारला आहे, ज्यामुळे सर्वांना योगाचा फायदा होत आहे. त्यांनी नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी योगासारखे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे मन स्थिर राहते आणि प्रगती झपाट्याने होते. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, वज्रासन, भुजंगासन, पद्मासन, सुखासन, सूर्यनमस्कार यांसारखी विविध आसने करवून घेण्यात आली. करकंब येथील विद्यार्थिनी अमृता सरगुले हिने योगाची विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली, ज्यात तिने शरीराची लवचिकता व सहजता दाखवली. या कार्यक्रमाला स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट, वडाळा, मुंबईच्या प्राचार्या डॉ. संगीता जोशी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, उन्नत भारत अभियानचे प्रमुख प्रा. प्रशांत भागानगरे, सर्व समन्वयक, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोलकाता (पश्चिम बंगाल) मध्ये झालेल्या योग कार्यक्रमाचे प्रक्षेपण स्वेरीच्या प्रांगणात मोठ्या एलसीडीच्या माध्यमातून दाखवण्यात आले, याचा लाभ उपस्थितांनी घेतला. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या सूचनेनुसार जुलै २०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला नियमितपणे ‘स्वेरी योगा डे’ साजरा केला जाणार असून, दैनंदिन वेळापत्रकात सकाळी १०:०० ते १०:३० या वेळेत स्वेरीतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून योगा केला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
- आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.1
- शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.1
- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावामध्ये सध्या नागरिकांसाठी ना घरे उपलब्ध आहेत ना बोअरवेलची सोय. त्यामुळे येथील लोकांना मूलभूत सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.1
- कर्नाटकच्या हुबळी-कारवार परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसामुळे नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. हुबळी-कारवार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे.1
- चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी सुप्रियाताईंचा मुका घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांच्या मौनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, त्यांना विचारण्यात आले आहे की ते आता गप्प का आहेत?1
- वडूज ते गणेशवाडी रस्त्यावर असलेल्या सेवालाल मंदिरासमोरच्या दुकानदारांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप असून, नागरिकांनी संबंधित दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.1
- आमदार रोहितदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या सहकार्याने सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण येथील अग्रणी नदीवरील उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. विकास म्हणजे केवळ तात्पुरत्या उपाययोजना नसून, जनतेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधणे, याच विचारधारेतून हे कार्य साध्य झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशिंग, खरशिंग, शिरढोण, बोरगाव आणि परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणाशी निगडित असलेला हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, रोहितदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांना खासदार विशालदादा पाटील यांची मिळालेली भक्कम साथ यामुळे या दीर्घकाळ प्रलंबित समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा उड्डाण पूल केवळ काँक्रीटची रचना नसून, हजारो नागरिकांच्या सुरक्षित, सुलभ आणि गतिमान भविष्यासाठी उभारला जाणारा विकासाचा भक्कम पाया आहे. तात्पुरती कामे जरी काही काळासाठी दिलासा देत असली तरी, शाश्वत आणि कायमस्वरूपी विकासकामे पिढ्यानपिढ्या लाभ देतात, यावर भर देण्यात आला आहे. आमदार रोहितदादा पाटील हे जनतेच्या भविष्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत, असे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.1
- दारूच्या व्यसनापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दारूची विक्री करणारे लोक दिवसेंदिवस गडगंज श्रीमंत होत आहेत, तर दुसरीकडे दारू पिणारे व्यक्ती मात्र भिकारी बनत चालले आहेत. त्यामुळे दारूपासून दूर राहणे हेच हितावह असल्याचे यातून सूचित होते.1