बेवारस गौवंशासाठी 'एकनिष्ठा' धावून आली; जखमी नंदीसह अनेक जनावरांवर उपचार! खामगांव : गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बेवारस गौवंशासाठी 'एकनिष्ठा' धावून आली; जखमी नंदीसह अनेक जनावरांवर उपचार! खामगांव : गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे: • प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही • संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा • संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- mumbai malad infinity mall1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.1
- खामगाव : नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ महिलांनी शहरातून रॅली काढून जल्लोष केला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे देशाच्या विकास यात्रेत हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी येत्या 16,17 व 18 एप्रिल रोजी विशेष अधिवेशनसुद्धा बोलाविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल 15 एप्रिल रोजी भाजपा महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.शहरात भव्य रॅली काढून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून अर्जुन जल मंदिर येथून दुपारी 4 वाजता रॅलीला सुरवात झाली . महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत भाजप कार्यालय टॉवर चौक येथे झाला. नगरध्यक्षा सौ अपर्णा फुंडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सारिकाताई डागा, खामगाव तालुकाध्यक्षा सौ श्रद्धा धोरण धोरण,तालुकाध्यक्षा श्रद्धा जोशी,शहराध्यक्षा सौ भाग्यश्री मानकर ,माजी प. स. सौ उर्मिलाताई गायकी सौ शिवानी कुलकर्णी नगरसेविका सौ कांता पवार,सौ नीलिमा डोरले, सौ जानवी कुलकर्णी,रुबीना पटेल, सौ ज्योती काळे,सौ सत्यभामा दही, सौ ज्योती पवार,सौ सरला नेमाने, सौ लता ताठे, सौ इंद्रायणी घोगले, सौ वंदना मानकर, सो मनकर्णा क्षीरसागर,सौ आशा करंगळे, सौ सुरेखा बोचरे, सौ मनीषा खंडारे, सौ उमा ठोंबरे, सौ कोकिला देशमुख,सौ खडसनेताई, सौ सुनीता पानझाडे, सौ प्रमिला मोरे रजनी भारसाकडे, सौ छाया भावसार, सौ रेखा शेळके, सौ अनिता डाहे, सौ सविता साने, सौ सुरेखा जाधव, सौ मयुरी बोदडे, सौ कोमल थानवी, सौ लीलावती जोशी, सौ सोनल सदावर्ते, सौ शितल सदावर्ते, सौ पायल कडाळे, सौ सुरेखा ठाकरे, सौ अश्विनी हेलोडे,सौ विद्या इंगळे रेखा हेलोडे, सो मंगला सुळे, सौ गीता देशमुख, सौ सरस्वती वेरुळकर, सौ सारिका शमी, सौ ज्योती शर्मा,सौ कल्पना कस्तुरे,सौ कांचन मंदानी, सौ वर्षा शमी,सौ रुपाली पारस्कर, सौ पौर्णिमा चोटलानी, सौ कल्पना वाघाडे, सौ अरुणा राऊत, सौ शितल मोरे, सौ शारदा खुमकर, सौ रुख्मा काटे , सौ अनिता वानखडे, सौ राधा गायकवाड, सौ वैशाली चांभारे, सौ वर्षा हिवराळे, सौ दीक्षा चोपडे, सौ सोनू इंगळे, आधी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या व जल्लोष करीत या विधेयकाचे स्वागत केले. यावेळी या विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शेकडो महिला व नागरिकांनी फलकावर स्वाक्षरी केल्या.1
- कोचिंग सेंटरपासून ब्लॅकमेलपर्यंत? अमरावती प्रकरण गाजतंय 🚨 अमरावती येथे समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही मुलींना कोचिंग सेंटरच्या माध्यमातून टार्गेट करून त्यानंतर ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची चर्चा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित मुलींचे व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांचा गैरवापर केल्याचे आरोप समोर येत आहेत. या माध्यमातून पैसे उकळणे आणि दबाव टाकण्याचे प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे. सुमारे 180 पेक्षा अधिक मुलींना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असून, 350 पेक्षा अधिक फोटो आणि व्हिडिओ संदर्भात माहिती पुढे येत आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून, मोहम्मद जोयान हा सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सत्य परिस्थिती काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.1
- shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd1