मिरजगावातील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरातील क्रांती चौक येथील स्नेहा ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद नंदकिशोर पंडित (वय २५) हे मूळचे वाडोणा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील असून सध्या ते मिरजगाव येथे राहतात. मिरजगाव शहरातील क्रांती चौकात स्नेहा ज्वेलर्स हे सोने-चांदीचे दुकान चालवितात. ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर बंद करून ते घरी गेले होते. १० सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास फिर्यादींचे मित्र निलेश कटारे यांनी फोन करून दुकानासमोर काही लोक दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी मोबाईलवरून दुकानातील सीसीटीव्ही पाहिले असता चार ते पाच व्यक्ती दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. फिर्यादींनी तत्काळ त्यांचे मित्र विजयसिंह बावडकर तसेच पोलिसांना फोन करून घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी आणि विजयसिंह बावडकर घटनास्थळी पोहोचले असता पाच अज्ञात व्यक्ती शटर कटावणी, कटर आणि क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यांना पाहताच संबंधित व्यक्तींनी कटर व क्रू ड्रायव्हर तेथेच टाकून दोन मोटारसायकलींवरून पळ काढला. त्याचवेळी पोलिसांचे नाईट राऊंड वाहन घटनास्थळी आले. पोलिसांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला. पाठलागादरम्यान एका मोटारसायकलवरील चोरटा हळगाव येथील पुलाखालून पुन्हा मिरजगावच्या दिशेने आला. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी प्रसाद नंदकिशोर पंडित यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ६२, ३०३(२), ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी अज्ञात आहेत.
मिरजगावातील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरातील क्रांती चौक येथील स्नेहा ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद नंदकिशोर पंडित (वय २५) हे मूळचे वाडोणा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील असून सध्या ते मिरजगाव येथे राहतात. मिरजगाव शहरातील क्रांती चौकात स्नेहा ज्वेलर्स हे सोने-चांदीचे दुकान चालवितात. ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर बंद करून ते घरी गेले होते. १० सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास फिर्यादींचे मित्र निलेश कटारे यांनी फोन करून दुकानासमोर काही लोक दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी मोबाईलवरून दुकानातील सीसीटीव्ही पाहिले असता चार ते पाच व्यक्ती दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. फिर्यादींनी तत्काळ त्यांचे मित्र विजयसिंह बावडकर तसेच पोलिसांना फोन करून घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी आणि विजयसिंह बावडकर घटनास्थळी पोहोचले असता पाच अज्ञात व्यक्ती शटर कटावणी, कटर आणि क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यांना पाहताच संबंधित व्यक्तींनी कटर व क्रू ड्रायव्हर तेथेच टाकून दोन मोटारसायकलींवरून पळ काढला. त्याचवेळी पोलिसांचे नाईट राऊंड वाहन घटनास्थळी आले. पोलिसांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला. पाठलागादरम्यान एका मोटारसायकलवरील चोरटा हळगाव येथील पुलाखालून पुन्हा मिरजगावच्या दिशेने आला. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी प्रसाद नंदकिशोर पंडित यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ६२, ३०३(२), ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी अज्ञात आहेत.
- फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.2
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1