सांगली शहरात बिअर शॉपची जुनी उधारी मागितल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करून, कटरने वार करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रशांत दिलीप चौगुले (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक दशरथ कोतवाल (वय २६, रा. खणभाग, सांगली) हे शुक्रवार, दि. २९ रोजी रात्री आपल्या घरी परतत असताना आंबेडकर रोडवरील मद्रासी कॉलनीच्या कोपऱ्यावर त्यांना ओळखीचा प्रशांत चौगुले थांबलेला दिसला. अभिषेक यांनी प्रशांतकडे बिअर शॉपच्या जुन्या उधारीच्या पैशांची मागणी करताच त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून प्रशांतने अभिषेकला प्रथम कानाखाली मारून व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने फळे कापण्याच्या कटरने अभिषेक कोतवाल यांच्या डाव्या कानावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, 'परत पैसे मागितले तर सोडणार नाही' अशी जीवे मारण्याची धमकी देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेचा अधिक तपास सांगली शहर पोलिस करत आहेत.
सांगली शहरात बिअर शॉपची जुनी उधारी मागितल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करून, कटरने वार करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रशांत दिलीप चौगुले (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक दशरथ कोतवाल (वय २६, रा. खणभाग, सांगली) हे शुक्रवार, दि. २९ रोजी रात्री आपल्या घरी परतत असताना आंबेडकर रोडवरील मद्रासी कॉलनीच्या कोपऱ्यावर त्यांना ओळखीचा प्रशांत चौगुले थांबलेला दिसला. अभिषेक यांनी प्रशांतकडे बिअर शॉपच्या जुन्या उधारीच्या पैशांची मागणी करताच त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून प्रशांतने अभिषेकला प्रथम कानाखाली मारून व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने फळे कापण्याच्या कटरने अभिषेक कोतवाल यांच्या डाव्या कानावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, 'परत पैसे मागितले तर सोडणार नाही' अशी जीवे मारण्याची धमकी देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेचा अधिक तपास सांगली शहर पोलिस करत आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय देणे हीच त्यांच्या सरकारची भूमिका राहिली आहे. पत्रकारांच्या समोरच अंतरवाली सराटी येथे मंत्री विखे पाटील आणि आमदार लाड यांनीही हेच विधान वाचून दाखवले.1
- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियान' या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.1
- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे माती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर सात जणांनी एकत्र येत एका कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या रक्तरंजित मारहाणीमध्ये महिलेसह कुटुंबातील सदस्यांवर काठीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सात जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कलम लावण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.1
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले. सरनाईक यांनी नमूद केले की, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते सर्वजण रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहत होते, परंतु महायुतीचा धर्म पाळण्यासाठी काही वेळा मागे-पुढे करावे लागते. याशिवाय, आगामी विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या जागांच्या मागणीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राजकारणात देवाणघेवाण आणि राजकीय समीकरणे बदलत असतात. महायुतीमध्ये आपल्या हक्काच्या जागा मागणे ही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या आग्रही मागणीनुसार, मागील वेळेस लढवलेल्या पाच जागा कायम राहाव्यात आणि अतिरिक्त दोन जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. जरी आता समीकरणे बदलली असली तरी, भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी, सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांनी संवेदनशील विषयांवर बोलताना तोंडाला कुलूप लावणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले. प्रसाद लाड यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पक्षात कोणतीही नाराजी नसून, महायुतीचे ऐक्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच, जागावाटपावरून भविष्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.4
- बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले, ज्यामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला आहे.1
- जेजुरी येथील एका टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटे यांनी टोल भरण्यास नकार देत गोंधळ घातला. 'मी रील स्टार आहे, मी टोल देणार नाही,' असे म्हणत मोटे यांनी टोलनाक्यावर राडा केला होता. या घटनेनंतर, पुण्याच्या रील स्टार अमृता कुलकर्णी यांनी महेश मोटे यांच्या या कृतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. टोल भरण्यावरून महेश मोटे यांनी घातलेल्या या राड्यानंतर इतर अनेक रील स्टार्सनीही त्यांच्यावर टीका केली आहे.1