डीजेमुक्त ईद-ए-मिलाद मिरवणुकीतून उमरखेडचा सामाजिक सलोख्याचा बुलंद संदेश! उमरखेड, दि. २6 ऑगस्ट : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र उत्सव उमरखेड शहरात धार्मिक उत्साह, शिस्त आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात उत्साहात पार पडला. यंदाच्या मिरवणुकीचे सर्वाधिक ठळक वैशिष्ट्य म्हणजे डीजेचा वापर पूर्णपणे टाळून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. धार्मिक आस्था जपत ध्वनिप्रदूषणाला फाटा देत उमरखेडकरांनी शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला. सकाळी ९ वाजता शहरातील हजरत तातार शाह बाबा दर्गा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध मशिदींचे कमिटी पदाधिकारी, मौलवी, ईद-ए-मिलाद उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिस्तबद्ध वातावरणात निघालेली ही मिरवणूक आठवडी बाजार, शिवाजी वॉर्ड, नाग चौक, संजय गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक आणि सुवर्णपथक मार्ग आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे गेली. धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिरवणुकीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर ईद-ए-मिलादच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. डीजे नाही, पण उत्साह मात्र तसूभरही कमी नाही! यंदाच्या मिरवणुकीने एक गोष्ट ठामपणे दाखवून दिली—धार्मिक उत्साह व्यक्त करण्यासाठी कर्णकर्कश आवाजाची किंवा डीजेची गरज नसते. श्रद्धा, शिस्त, संस्कार आणि सामाजिक एकोपा यांच्या जोरावरही भव्य आणि प्रभावी मिरवणूक काढता येते. विविध मशिदींचे मौलवी, मागील वर्षीच्या सिरफ कमिटी तसेच यंदाच्या ईद-ए-मिलाद उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडली. ध्वनिप्रदूषण टाळून धार्मिक परंपरा जपण्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कायदा-सुव्यवस्था अबाधित उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उमरखेड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. मिरवणुकीच्या मार्गासह प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली. सुवर्णपथक मार्गे आठवडी बाजार परिसरात पोहोचल्यानंतर मिरवणूक पुन्हा हजरत तातार शाह बाबा दर्गा येथे परतली आणि शांततापूर्ण वातावरणात समारोप झाला. ईद-ए-मिलादच्या डीजेमुक्त मिरवणुकीतून उमरखेडने धार्मिक आस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधत “श्रद्धेसोबत शिस्त आणि उत्साहासोबत सामाजिक सलोखा” असा बुलंद संदेश दिला. धार्मिक सण समाजाला जोडणारे असतात, तोडणारे नाहीत—याची प्रचिती या मिरवणुकीने पुन्हा एकदा करून दिली.
डीजेमुक्त ईद-ए-मिलाद मिरवणुकीतून उमरखेडचा सामाजिक सलोख्याचा बुलंद संदेश! उमरखेड, दि. २6 ऑगस्ट : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र उत्सव उमरखेड शहरात धार्मिक उत्साह, शिस्त आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात उत्साहात पार पडला. यंदाच्या मिरवणुकीचे सर्वाधिक ठळक वैशिष्ट्य म्हणजे डीजेचा वापर पूर्णपणे टाळून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. धार्मिक आस्था जपत ध्वनिप्रदूषणाला फाटा देत उमरखेडकरांनी शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला. सकाळी ९ वाजता शहरातील हजरत तातार शाह बाबा दर्गा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध मशिदींचे कमिटी पदाधिकारी, मौलवी, ईद-ए-मिलाद
उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिस्तबद्ध वातावरणात निघालेली ही मिरवणूक आठवडी बाजार, शिवाजी वॉर्ड, नाग चौक, संजय गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक आणि सुवर्णपथक मार्ग आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे गेली. धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिरवणुकीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर ईद-ए-मिलादच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक
करण्यात आले. डीजे नाही, पण उत्साह मात्र तसूभरही कमी नाही! यंदाच्या मिरवणुकीने एक गोष्ट ठामपणे दाखवून दिली—धार्मिक उत्साह व्यक्त करण्यासाठी कर्णकर्कश आवाजाची किंवा डीजेची गरज नसते. श्रद्धा, शिस्त, संस्कार आणि सामाजिक एकोपा यांच्या जोरावरही भव्य आणि प्रभावी मिरवणूक काढता येते. विविध मशिदींचे मौलवी, मागील वर्षीच्या सिरफ कमिटी तसेच यंदाच्या ईद-ए-मिलाद उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडली. ध्वनिप्रदूषण टाळून धार्मिक परंपरा जपण्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कायदा-सुव्यवस्था अबाधित उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उमरखेड
पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. मिरवणुकीच्या मार्गासह प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली. सुवर्णपथक मार्गे आठवडी बाजार परिसरात पोहोचल्यानंतर मिरवणूक पुन्हा हजरत तातार शाह बाबा दर्गा येथे परतली आणि शांततापूर्ण वातावरणात समारोप झाला. ईद-ए-मिलादच्या डीजेमुक्त मिरवणुकीतून उमरखेडने धार्मिक आस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधत “श्रद्धेसोबत शिस्त आणि उत्साहासोबत सामाजिक सलोखा” असा बुलंद संदेश दिला. धार्मिक सण समाजाला जोडणारे असतात, तोडणारे नाहीत—याची प्रचिती या मिरवणुकीने पुन्हा एकदा करून दिली.
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो1
- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- *ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुजीब भाई मित्र मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम* नांदेड शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून येत होता. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुजीब भाई मित्र मंडळाने शहरातील मुख्य चौकात सेवा उपक्रमाला सुरुवात केली. मानवतेचा संदेश देण्यासाठी मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने पाणी बॉटल, बुंदीचे लाडू आणि पार्ले बिस्किटाचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता आलेल्या प्रत्येक भाविकाला थंड पाण्याची बॉटल आणि प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात आला, तर लहान मुलांना आवडीने पार्ले बिस्कीट वाटण्यात आले. मुजीब भाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिवसभर स्वतः उभे राहून हे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांततेत आणि सेवाभावाने सण साजरा करून मुजीब भाई मित्र मंडळाने पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आदर्श जपला आहे.1