मर्दानी खेळ-आष्टेडू आखाडा खेळाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा मर्दानी खेळ-आष्टेडू आखाडा खेळाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मर्दानी खेळ-आष्टेडू आखाडा या खेळाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा नुकतेच सुभेदार हॉल रवी नगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत जवळपास १६ महाविद्यालयातील ८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. संभाजी भोसले यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून अधिसभा सदस्य सुनील फुडके, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर सहकारी शिक्षक बँकेचे संचालक डॉ. सुनील पाटील, राजेश तलमले, जगदीश देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये दांडपट्टा, ढाल, तलवार, काठी, भोवरा या सारखे प्रकार खेळले गेले. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. संभाजी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या खेळाचा वारसा जोपासणे काळची गरज असून या खेळात विद्यार्थ्यांही जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन किरण यादव यांनी केले.
मर्दानी खेळ-आष्टेडू आखाडा खेळाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा मर्दानी खेळ-आष्टेडू आखाडा खेळाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मर्दानी खेळ-आष्टेडू आखाडा या खेळाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा नुकतेच सुभेदार हॉल रवी नगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत जवळपास १६ महाविद्यालयातील ८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. संभाजी भोसले यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून अधिसभा सदस्य सुनील फुडके, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर सहकारी शिक्षक बँकेचे संचालक डॉ. सुनील पाटील, राजेश तलमले, जगदीश देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये दांडपट्टा, ढाल, तलवार, काठी, भोवरा या सारखे प्रकार खेळले गेले. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. संभाजी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या खेळाचा वारसा जोपासणे काळची गरज असून या खेळात विद्यार्थ्यांही जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन किरण यादव यांनी केले.
- शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.1
- उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.1
- मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.2
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे नवीन पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर विदेशी सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला. क्राईम ब्रांचच्या 'ऑपरेशन थंडर'ने ही कारवाई केली असून, यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतक-यांना दुहेरी फायदा नागपूर शहर प्रतिनिधी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतक-यांना दुहेरी फायदा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि १० मे) पाणंद रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणारा मुरूम जर नदी, नाले व तलाव यांच्या खोलीकरणातून उपलब्ध करून घेतला, तर त्यातून दुहेरी फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन आमदार आशीष देशमुख यांनी केले. एका बाजूला शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे बांधकाम होईल, तर दुसऱ्या बाजूला जलयुक्त शिवार व जलसंधारणाची प्रभावी कामेही पूर्ण होतील. नदी, नाले आणि तलावांचे खोलीकरण झाल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, विहिरी व बोअरवेलला पाणी टिकून राहील आणि भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मोठ्या प्रमाणात मात करता येईल.1