Shuru
Apke Nagar Ki App…
सेवानिवृत्त सुरेश खारगे यांचे वयाचे 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन.. करमाळा प्रतिनिधी- सुरेश ज्ञानदेव खारगे वय ७९ यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले ते सेवानिवृत्त एस. टी. महामंडळ मध्ये क्लार्क होते करमाळा येथील हिंदू स्मशान भूमी येथे.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक निशांत खारगे यांचे वडील होत.
समर्थ महाराष्ट्र न्यूज
सेवानिवृत्त सुरेश खारगे यांचे वयाचे 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन.. करमाळा प्रतिनिधी- सुरेश ज्ञानदेव खारगे वय ७९ यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले ते सेवानिवृत्त एस. टी. महामंडळ मध्ये क्लार्क होते करमाळा येथील हिंदू स्मशान भूमी येथे.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक निशांत खारगे यांचे वडील होत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पत्रकारांच्या हक्कां साठी आणखी जोमाने लढणार - पठाण अमरजान नियुक्तीपत्र स्वीकारून पदभार; पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- मनोज दादा जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी; सरकारच्या माध्यमातून मागण्यांचा मार्ग काढण्याची भूमिका – आ. विजय सिंह पंडित मनोज दादा जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी; सरकारच्या माध्यमातून मागण्यांचा मार्ग काढण्याची भूमिका – आ. विजय सिंह पंडित बीड | प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणारे मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार विजय सिंह पंडित यांनी केले आहे. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा मार्ग काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून आपण या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला असून, पुढेही करत राहणार असल्याचे आ. विजय सिंह पंडित यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “मनोज दादा जरांगे यांनी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मोठा संघर्ष उभा केला आहे. मात्र, त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक मार्ग सरकारच्या माध्यमातून काढण्याची भूमिका सरकारची आहे. सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि पुढेही करीत राहणार आहे.” मराठा समाजाच्या भावना आणि आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील असून, संवाद आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघणे आवश्यक आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवादातून योग्य मार्ग काढण्यासाठी आपण आपली भूमिका बजावत राहू, असेही आ. पंडित यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये. मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!1
- देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...1
- मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज, अनेक ठिकानी होनार स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज बीड | प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वागतासाठी विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, मराठा समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागत फलक, बॅनर आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून नियोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे बीड शहरात ‘जरांगे पाटील यांच्या स्वागताचा जल्लोष’ पाहायला मिळणार असून, त्यांच्या विचारांना आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडूनही आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. बीड नगरीत जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला पोहोचला असून, त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.2
- बीडमधून हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीकडे रवाना; मनोज जरांगे यांना जाहीर पाठिंबा! मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव आणि तरुण मोठ्या जोशामध्ये मोटरसायकल रॅलीने अंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत. बीड शहरासह ग्रामीण भागातून शेकडो दुचाकींवर स्वार होऊन तरुण या महा-रॅलीत सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर 'जय जिजाऊ, जय शिवराय' आणि जरांगे-पाटील यांच्या समर्थनाच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!1