अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास सुरुवात! एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला अंतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम व बुलढाणा या तीन जिल्ह्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता भारत सरकार दहावीनंतरची (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ संगणकीय प्रणालीवर नवीन व नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे. 📖 पात्र अभ्यासक्रम 🔹 उच्च माध्यमिक व पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम : ११ वी, १२ वी, बी.ए., बी.कॉम., बी.एससी., एम.ए., एम.कॉम., एम.एससी., बी.एस.डब्ल्यू., एम.एस.डब्ल्यू., बी.लिब., एम.लिब., ए.एन.एम., जी.एन.एम., डी.एड., बी.एड. आणि एम.एड. 🔹 इतर व्यावसायिक अभ्यासक्रम : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी विभाग, तसेच पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रम. 📑 आवश्यक दाखले व कागदपत्रे १️⃣ महाविद्यालयात शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड प्रमाणपत्र) २️⃣ जातीचा दाखला ३️⃣ उत्पन्नाचे प्रमाणपत्र ४️⃣ अधिवास प्रमाणपत्र (रहिवासी दाखला) ५️⃣ शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (स्थानांतरण प्रमाणपत्र) ६️⃣ शैक्षणिक गुणपत्रिका ७️⃣ आवश्यक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता दाखला) मार्गदर्शक सूचना : योजनेच्या सविस्तर कार्यप्रणालीसाठी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाचा १७ जानेवारी २०२२ रोजीचा शासन निर्णय पाहावा. संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व मुदतीचे पालन करणे सर्व विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील. अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास सुरुवात! एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला अंतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम व बुलढाणा या तीन जिल्ह्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता भारत सरकार दहावीनंतरची (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ संगणकीय प्रणालीवर नवीन व नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे. 📖 पात्र अभ्यासक्रम 🔹 उच्च माध्यमिक व पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम : ११ वी, १२ वी, बी.ए., बी.कॉम., बी.एससी., एम.ए., एम.कॉम., एम.एससी., बी.एस.डब्ल्यू., एम.एस.डब्ल्यू., बी.लिब., एम.लिब., ए.एन.एम., जी.एन.एम., डी.एड., बी.एड. आणि एम.एड. 🔹 इतर व्यावसायिक अभ्यासक्रम : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी विभाग, तसेच पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रम. 📑 आवश्यक दाखले व कागदपत्रे १️⃣ महाविद्यालयात शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड प्रमाणपत्र) २️⃣ जातीचा दाखला ३️⃣ उत्पन्नाचे प्रमाणपत्र ४️⃣ अधिवास प्रमाणपत्र (रहिवासी दाखला) ५️⃣ शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (स्थानांतरण प्रमाणपत्र) ६️⃣ शैक्षणिक गुणपत्रिका ७️⃣ आवश्यक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता दाखला) मार्गदर्शक सूचना : योजनेच्या सविस्तर कार्यप्रणालीसाठी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाचा १७ जानेवारी २०२२ रोजीचा शासन निर्णय पाहावा. संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व मुदतीचे पालन करणे सर्व विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील. अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1