लातूर. सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी संजय घाडगे यांच्या ‘अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी संजय घाडगे यांच्या ‘अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन लातूर : येथील ज्येष्ठ सुप्रसिद्ध कवी व गझलकार संजय घाडगे यांच्या बहुचर्चित “अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये थाटात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष माननीय लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली माननीय प्रा. प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले सर यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी संजय घाडगे हे मागील सुमारे 30 ते 35 वर्षांपासून सातत्याने काव्यलेखन करत आहेत. त्यांच्या लेखनातून सामाजिक वास्तव, मानवी भावना आणि बदलत्या काळातील अस्वस्थता प्रभावीपणे व्यक्त होत असल्याने साहित्यिक वर्तुळात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक काव्यसंग्रहांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. “वणवा”, “अंधाराला डोळे फुटता”, “निळ्या आभाळाचे गाणे”, “कविता तुझ्या माझ्या” हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कवितांची दखल घेत काही कवितांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आलेला आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कवी संजय घाडगे यांना राज्यस्तरीय तसेच राज्याबाहेरील अशा साठहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा नवीन काव्यसंग्रह “अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल” प्रकाशित झाल्याबद्दल साहित्यिक, कवी, लेखक आणि वाचकवर्गातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लातूर. सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी संजय घाडगे यांच्या ‘अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी संजय घाडगे यांच्या ‘अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन लातूर : येथील ज्येष्ठ सुप्रसिद्ध कवी व गझलकार संजय घाडगे यांच्या बहुचर्चित “अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये थाटात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष माननीय लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली माननीय प्रा. प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले सर यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी संजय घाडगे हे मागील सुमारे 30 ते 35 वर्षांपासून सातत्याने काव्यलेखन करत आहेत. त्यांच्या लेखनातून सामाजिक वास्तव, मानवी भावना आणि बदलत्या काळातील अस्वस्थता प्रभावीपणे व्यक्त होत असल्याने साहित्यिक वर्तुळात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक काव्यसंग्रहांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. “वणवा”, “अंधाराला डोळे फुटता”, “निळ्या आभाळाचे गाणे”, “कविता तुझ्या माझ्या” हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कवितांची दखल घेत काही कवितांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आलेला आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कवी संजय घाडगे यांना राज्यस्तरीय तसेच राज्याबाहेरील अशा साठहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा नवीन काव्यसंग्रह “अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रँगल” प्रकाशित झाल्याबद्दल साहित्यिक, कवी, लेखक आणि वाचकवर्गातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर1
- *वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले* मुंबई, दि. ९ मार्च २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केले ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतुन मार्ग काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादांमुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.1
- Post by अखंड भारत1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- Post by Dilip Surwase5
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by Dilip Surwase7