निवेदनाची तत्काळ दखल; तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर... निवेदनाची तत्काळ दखल; तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर रिसोड, रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील शेतक-याच्या वतीने रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांना कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत तसेच सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत तहसीलदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाअभावी करपून गेलेले सोयाबीन पीक, झालेली मोठी आर्थिक हानी व सध्याची बिकट परिस्थिती तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली. तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. काल निवेदन आणि आज प्रत्यक्ष बांधावर पाहणी झाल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी जावळे , तलाठी विजय राऊत, सरपंच व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
निवेदनाची तत्काळ दखल; तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर... निवेदनाची तत्काळ दखल; तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर रिसोड, रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील शेतक-याच्या वतीने रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांना कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत तसेच सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत तहसीलदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाअभावी करपून गेलेले सोयाबीन पीक, झालेली मोठी आर्थिक हानी व सध्याची बिकट परिस्थिती तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली. तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. काल निवेदन आणि आज प्रत्यक्ष बांधावर पाहणी झाल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी जावळे , तलाठी विजय राऊत, सरपंच व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1