आज शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते. आज शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून, समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल. चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे. समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तातडीने १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे. चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून देश-विदेशातून अनेक नागरिक व उद्योजक येथे येतात. त्यामुळे परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे. चाकणमध्ये येताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा व प्लास्टिक दिसणे ही चिंतेची बाब आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर एमआयडीसीशी चर्चा झाली असून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीचे काम पुढे नेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकल्पाला काही कालावधी लागतो; मात्र कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबतही प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकण परिसरातील पार्किंगचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. उपलब्ध जागांचा योग्य वापर करून पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही. मात्र स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणांना पाठबळ न देता प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करणे आवश्यक आहे. चाकणच्या प्रश्नांवर एमआयडीसी, पीएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगाने काम सुरू केले आहे. विविध बैठकींमध्ये समोर आलेल्या प्रश्नांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही केली जात आहे. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा, अतिक्रमण, गृहनिर्माण सोसायट्या तसेच शाळांशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल. राज्य शासनाच्या अखत्यारितील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. चाकण तसेच संपूर्ण औद्योगिक परिसरातील नागरिक आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. यावेळी उद्योजक तसेच वाहतूक, उद्योग आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध अडचणी व समस्या मांडल्या. या अडचणी जाणून घेत संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली तसेच त्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते. 📍 पुणे
आज शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते. आज शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून, समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल. चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे. समितीच्या माध्यमातून
विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तातडीने १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे. चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून देश-विदेशातून अनेक नागरिक व उद्योजक येथे येतात. त्यामुळे परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे. चाकणमध्ये येताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा व प्लास्टिक दिसणे ही चिंतेची बाब आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर एमआयडीसीशी चर्चा झाली असून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीचे काम पुढे नेण्यात
येत आहे. कोणत्याही प्रकल्पाला काही कालावधी लागतो; मात्र कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबतही प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकण परिसरातील पार्किंगचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. उपलब्ध जागांचा योग्य वापर करून पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही. मात्र स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणांना पाठबळ न देता प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करणे
आवश्यक आहे. चाकणच्या प्रश्नांवर एमआयडीसी, पीएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगाने काम सुरू केले आहे. विविध बैठकींमध्ये समोर आलेल्या प्रश्नांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही केली जात आहे. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा, अतिक्रमण, गृहनिर्माण सोसायट्या तसेच शाळांशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल. राज्य शासनाच्या अखत्यारितील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. चाकण तसेच संपूर्ण औद्योगिक परिसरातील नागरिक आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. यावेळी उद्योजक तसेच वाहतूक, उद्योग आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध अडचणी व समस्या मांडल्या. या अडचणी जाणून घेत संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली तसेच त्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते. 📍 पुणे
- मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे. हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य! पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊ #प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव1
- सुप्रसिद्ध श्रेया घोषाल पिंपरी चिंचवड मध्ये 29 ऑगस्टला1
- लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे1
- लांडेवाडी भोसरी ब्रिज उड्डाणपूल याच्याबद्दल थोडीशी माहिती पिंपरी-चिंचवडमधील या उड्डाणपुलाच्या बांधकामाची सुरुवात 2009 च्या सुमारास झाली. सुरुवातीचा अंदाज ₹12 ते ₹15 कोटी होता; नंतर खर्च वाढून सुमारे ₹21.5 कोटी झाला. बांधकाम 2013 मध्ये पूर्ण झाले आणि जानेवारी 2014 मध्ये उद्घाटन झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्चात मोठी वाढ झाल्याचे या कागदपत्रातून दिसते.1
- अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..1
- हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता कारवाई आणि आरोपीला अटक: गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) रमेश भोसले (सहायक फौजदार) सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) सचिन जगताप (पोलीस हवालदार) कमलेश होले (पोलीस हवालदार) अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) संजय दाणे (पोलीस शिपाई) सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)1