Shuru
Apke Nagar Ki App…
दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील शेतशिवारात अचानक आग लागल्याने शेतीच्या कामासाठी वापरले जाणारे सुमारे ७५ स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाले. या घटनेत अर्जुन विजय चव्हाण नावाच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी शेतीच्या कामाकरिता एकूण ९० स्प्रिंकलर पाईप घराच्या टिनावर ठेवले होते, त्यापैकी ७० ते ७५ पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अतोनात नुकसानीमुळे संतप्त शेतकऱ्याने पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह दिग्रस तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
Sajid Patlewale
दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील शेतशिवारात अचानक आग लागल्याने शेतीच्या कामासाठी वापरले जाणारे सुमारे ७५ स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाले. या घटनेत अर्जुन विजय चव्हाण नावाच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी शेतीच्या कामाकरिता एकूण ९० स्प्रिंकलर पाईप घराच्या टिनावर ठेवले होते, त्यापैकी ७० ते ७५ पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अतोनात नुकसानीमुळे संतप्त शेतकऱ्याने पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह दिग्रस तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रशासनाच्या भव्य उपक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या हजारोंच्या सहभागातून योगाचा महत्त्वपूर्ण संदेश सर्वत्र पोहोचवण्यात आला.1
- MIDC परिसरातील 13 थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्तीनामा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.1
- अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.1
- एआयएमआयएम (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, "तू थकून जाशील, पण हिंदुस्तानचा मुसलमान थकणार नाही." ओवैसींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे समर्थक याला मुस्लिम समुदायाच्या धैर्याची आणि हक्कांची भावना व्यक्त करणारा आवाज म्हणून पाहत आहेत, तर विरोधक याला निव्वळ राजकीय वक्तव्य संबोधत आहेत. या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.1