लातूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने अभिनव 'गांधीगिरी' आंदोलन करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करून धोकादायक, खरूज झालेल्या व रोगी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत, प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लातूर मनपा व नाना नानी पार्क परिसरात कुत्र्याचे मुखवटे परिधान करून शांततापूर्ण निदर्शने केली. शहरातील अनेक भागात, गल्लीबोळात आणि मुख्य रस्त्यांवर ५० ते १०० मोकाट कुत्र्यांचे कळप सर्रास दिसतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते, तर लहान मुलांना खेळणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांच्या चावण्याने अनेक बालके जखमी झाली असून, काहींना तर प्राणही गमवावे लागले आहेत. सकाळी आणि रात्री फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या कळपांची भीती वाटते. तसेच, वाहन चालकांचा पाठलाग करत असल्याने अपघात होऊन चालक जखमी होतात; विशेषतः, क्लासला जाण्यासाठी वाहन वेगाने चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा जास्त परिणाम होतो. या गंभीर समस्येबाबत मनपा प्रशासनास अनेक निवेदनांद्वारे माहिती देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अँड. अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वात, नागरिकांनी हातात बोलके फलक घेऊन "आता तरी करा बंदोबस्त!" आणि "हद्दपार करून दाखव!" असे आव्हान मनपा प्रशासनाला दिले. यावेळी अँड. अजय कलशेट्टी, अँड. शिरीष दहिवाल, अँड. सचिन बावगे, सूर्यप्रकाश धूत, शिरीष माळी, डॉ. संजय जमादाडे, डॉ. राजकुमार तोष्णीवाल, डॉ. श्रीराम कोळेकर, अभिजित सिरसाठ, विलास भुमकर, प्रकाश साठे, राम बरचे, शिवा धुळे, महेश खेकडे, हुसेन पठान, विजय वारद, विनोद गायकवाड, महेश बावगे, गजानन हुंडेकरी, पारस चापशी, अर्जुन स्वामी, अशोक कांबळे, दत्ता ढगे, विष्णू बंग, शिवा रोडे, लक्षीमन सबणीस आदींसह अनेकजण उपस्थित होते. मोकाट फिरणाऱ्या रोगी कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याच्या प्रभुराज प्रतिष्ठानच्या मागणीवर आता मनपा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लातूरचे नागरिक डोळे लावून आहेत.
लातूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने अभिनव 'गांधीगिरी' आंदोलन करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करून धोकादायक, खरूज झालेल्या व रोगी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत, प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लातूर मनपा व नाना नानी पार्क परिसरात कुत्र्याचे मुखवटे परिधान करून शांततापूर्ण निदर्शने केली. शहरातील अनेक भागात, गल्लीबोळात आणि मुख्य रस्त्यांवर ५० ते १०० मोकाट कुत्र्यांचे कळप सर्रास दिसतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते, तर लहान मुलांना खेळणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांच्या चावण्याने अनेक
बालके जखमी झाली असून, काहींना तर प्राणही गमवावे लागले आहेत. सकाळी आणि रात्री फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या कळपांची भीती वाटते. तसेच, वाहन चालकांचा पाठलाग करत असल्याने अपघात होऊन चालक जखमी होतात; विशेषतः, क्लासला जाण्यासाठी वाहन वेगाने चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा जास्त परिणाम होतो. या गंभीर समस्येबाबत मनपा प्रशासनास अनेक निवेदनांद्वारे माहिती देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अँड. अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वात, नागरिकांनी हातात बोलके फलक घेऊन "आता तरी करा बंदोबस्त!" आणि "हद्दपार करून दाखव!" असे आव्हान मनपा प्रशासनाला दिले. यावेळी अँड.
अजय कलशेट्टी, अँड. शिरीष दहिवाल, अँड. सचिन बावगे, सूर्यप्रकाश धूत, शिरीष माळी, डॉ. संजय जमादाडे, डॉ. राजकुमार तोष्णीवाल, डॉ. श्रीराम कोळेकर, अभिजित सिरसाठ, विलास भुमकर, प्रकाश साठे, राम बरचे, शिवा धुळे, महेश खेकडे, हुसेन पठान, विजय वारद, विनोद गायकवाड, महेश बावगे, गजानन हुंडेकरी, पारस चापशी, अर्जुन स्वामी, अशोक कांबळे, दत्ता ढगे, विष्णू बंग, शिवा रोडे, लक्षीमन सबणीस आदींसह अनेकजण उपस्थित होते. मोकाट फिरणाऱ्या रोगी कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याच्या प्रभुराज प्रतिष्ठानच्या मागणीवर आता मनपा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लातूरचे नागरिक डोळे लावून आहेत.
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील 'शिवनेरी' शिवसेना कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर-चाकूर आणि उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे स्पष्ट आदेश यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आणि संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या सूचनेनुसार, लातूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अहमदपूर-चाकूर आणि उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर व्याख्यानमाला, शिवसेना सदस्य नोंदणी, आणि 'गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक' हे अभियान राबवून प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत पदवीधर निवडणुकीसाठी पदवीप्राप्त मतदारांची नोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले. व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, युवासेना जिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर आणि उदगीर विधानसभा समन्वयक स्वप्नील (अण्णा) जाधव उपस्थित होते, ज्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामध्ये गोविंद बेंबडे (उदगीर-जळकोट विधानसभा संघटक), मंगेश येरकुंडे (उदगीर शहर संघटक), सुजीत मुळे (उपतालुकाप्रमुख चाकूर) आणि धोंडीराम मुठ्ठे (चाकूर तालुका संघटक) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिकेत फुलारी यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष गुंडीले यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत मोरे, दत्ता हेंगणे, युवासेना तालुका प्रमुख नागेश कोंबडे, बालाजी काळे, शहर प्रमुख शिवा कासले, शिवा भारती, मंगेश यरकुंडे, सुधाकर जायभाय, माऊली देवकत्ते, गणेश राठोड, इस्माईल अब्दुल रहीम, महेश महापुरे, दत्ता कदम, गजानन यन्ने, पद्माकर पेंढारकर, शिवा मोरार, अरुण बिरादार, गोविंद बेंबडे, शिवकांत सरनाळे, व्यंकट साबणे, सारंग आगलावे, धोंडीराम गुट्टे, मारुती बडे, कालिदास धुळगुंडे, सुजीत मुळे, दत्ता पावडे, भगवान कदम, बापूराव देऊळकर, गंगाधर कल्याणे, पांडुरंग परीट, नीलकांत परतवाघ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.4
- उदगीरच्या कल्पना चौक परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरखन सेवाभावी संस्थेने मृतदेह रुग्णालयात दाखल केला असून, आत्महत्येचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. उदगीर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.1
- निलंगा येथील महाराज ट्रॅव्हल्सने प्रवाशांसाठी विविध मार्गांवर रिटर्न बुकिंग सेवा उपलब्ध केली आहे. या सेवेमध्ये औराद, हालगरापाटी, अनसरवाडा पाटी, निलंगा, खरोसा, लामजना, औसा, शिवली, उजणी, तुळजापूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणांचा समावेश आहे. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी 9146624747 आणि 9359596526 या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधता येईल.1
- आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील वारजे भागात ५१ गुंठे जमीन घेतल्याचे उघड झाले आहे. ही जागा मोक्याच्या ठिकाणी असून तिचे बाजारमूल्यही जास्त आहे. या व्यवहारातून मोटेगावकरांकडे एवढी 'माया' कुठून आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही जमीन 'राजर्षी शाहु महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास, महाराष्ट्र, लातूर' या सामाजिक संस्थेच्या नावाने विकत घेण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जागेच्या फलकावर मोटेगावकरांचे नाव काळ्या रंगाने झाकल्याचेही समोर आले आहे. याच भागात मोटेगावकरांचे आणखी दोन प्लॉट असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याच भागात असलेल्या महापालिकेचा रस्ताही शिवराज मोटेगावकरांना आपल्या ताब्यात घ्यायचा होता, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. त्यांनी दोन्ही प्लॉटमधील हा महापालिकेचा रस्ता हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील नागरिकांनी आंदोलन करून त्यांचा हा डाव हाणून पाडला आणि सामाजिक भान असलेल्या नागरिकांमुळे हा रस्ता वाचल्याचे म्हटले जात आहे. कोट्यवधी रुपयांची ही जमीन घेण्यासाठी आलेला पैसा मोटेगावकरांनी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून कमावला, की तो पेपर फुटीतून मिळाला, असा सवाल विचारला जात आहे.1
- NEET पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आलेल्या मोटेगावकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना शिकवताना दिलेली काही विचित्र उदाहरणे सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, मोटेगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना "पिझ्झा आणि वडा-पाव हे कुत्र्याचे आहार आहेत" तसेच "पाणीपुरी खाणारे भिकारी असतात" अशा प्रकारची वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत आहेत. या वक्तव्यांमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काही पालक आणि विद्यार्थ्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे. आधीच NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या मोटेगावकर यांच्या या जुन्या व्हिडिओमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याऐवजी अशा प्रकारची उदाहरणे देणे योग्य आहे का, असा सवालही विचारला जात आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत; अनेकांनी उपरोधिकपणे, "आणि खरंच असे असेल तर लातूरकरांनी आता पिझ्झा, वडा-पाव आणि पाणीपुरी खाऊ नये," अशा प्रतिक्रिया देत टोलेबाजी केली आहे. दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि तो नेमका कधीचा आहे याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, संबंधित व्यक्तीकडूनही या व्हायरल व्हिडिओवरील अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.1
- प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. कुत्र्यांचे मुखवटे परिधान करून नागरिकांनी मनपाला धोकादायक व रोगी कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याचे आव्हान दिले. शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.1
- कॉक्रोच जानता पार्टीने आपली पहिली मागणी मांडली असून, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.1
- लातूर स्थानिक गुन्हे शाखेने बनावट सोने दाखवून फसवणूक करणाऱ्या आणि गर्दीतून चोरी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि बनावट सोन्याचे बिस्कीट जप्त केले. या टोळीमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.2