logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे झाडावर पडली वीज, घटना पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.

7 hrs ago
user_Rupesh Thakur
Rupesh Thakur
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
7 hrs ago

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे झाडावर पडली वीज, घटना पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.

  • user_BK Nalawade
    BK Nalawade
    Paithan, Aurangabad
    😤
    5 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भक्तीचा महाकुंभ आणि प्रशासनाचे कवच; औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव दिमाखात संपन्न! ​शिस्तबद्ध बंदोबस्त अन् भक्तांचा जनसागर; पोलीस आणि 'पोलीस मित्रांच्या' साथीने यात्रा उत्सव ठरला आदर्श ​प्रतिनिधी | गौतम हिवराळे दिनांक: २९ मार्च २०२६ ​कन्नड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरळा येथे श्री लक्ष्मी देवीचा वार्षिक यात्रा सोहळा भक्ती, शक्ती आणि युक्तीच्या त्रिवेणी संगमाने पार पडला. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे, तर प्रशासनाने आखलेली चोख सुरक्षा व्यवस्था आणि मंदिर समितीचे सूक्ष्म नियोजन. यामुळेच लाखो भाविकांनी अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणात देवीचे दर्शन घेतले. ​खाकीची सतर्कता आणि वरिष्ठांचे सूक्ष्म नियोजन ​यंदाचा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलीस अधीक्षक राठोड साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा चक्र उभारण्यात आले होते. प्रत्यक्ष जमिनीवर या नियोजनाची अंमलबजावणी एपीआय संतोष भालेराव यांनी अत्यंत कौशल्याने केली. औरळा पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल कांबळे आणि होमगार्ड शिंदे यांच्या पथकाने गर्दीच्या ठिकाणी चोख पहारा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. ​व्यवस्थापनाचा 'सुवर्ण' अध्याय: मंदिर ट्रस्टची भूमिका ​भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानने अहोरात्र कष्ट घेतले. अध्यक्ष आनंदराव महाले, उपाध्यक्ष दिलीपराव वाघ, कोषाध्यक्ष रमेश कुमार खंडेलवाल आणि सचिव सुधाकर जीवरख यांच्या नेतृत्वाखालील टीमने उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे रांजण आणि भव्य सावलीची व्यवस्था केली होती. दर्शनासाठी रांगांचे योग्य व्यवस्थापन केल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. ​ग्रामीण संस्कृतीचा जागर: कुस्त्या आणि बारा गाड्यांचा थरार ​उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेला 'बारा गाड्यांची ओढ' हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, आखाड्यात रंगलेल्या कुस्त्यांच्या जंगी सामन्यांनी क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लहानांसाठी खेळणी, पाळणे आणि मोठ्यांसाठी विविध स्टॉल्समुळे जत्रेला मोठी रंगत आली होती. ​सहकार्याचा हात: महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना ​केवळ पोलीस प्रशासनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेने या सोहळ्यात मोलाची भूमिका बजावली. सिल्लोड तालुका अध्यक्ष गौतम हिवराळे आणि कन्नड प्रतिनिधी तौफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. ​"पोलीस प्रशासन, मंदिर समिती आणि आमची संघटना यांच्यातील समन्वयामुळेच इतका मोठा सोहळा कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वी झाला. ही सेवा करणे हेच आमचे कर्तव्य आहे," अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष गौतम हिवराळे यांनी दिली. ​धार्मिक परंपरेसोबतच प्रशासकीय शिस्तीचा एक नवा वस्तुपाठ औरळा नगरीने या निमित्ताने महाराष्ट्रसमोर ठेवला आहे.
    2
    भक्तीचा महाकुंभ आणि प्रशासनाचे कवच; औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव दिमाखात संपन्न!
​शिस्तबद्ध बंदोबस्त अन् भक्तांचा जनसागर; पोलीस आणि 'पोलीस मित्रांच्या' साथीने यात्रा उत्सव ठरला आदर्श
​प्रतिनिधी | गौतम हिवराळे 
दिनांक: २९ मार्च २०२६
​कन्नड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरळा येथे श्री लक्ष्मी देवीचा वार्षिक यात्रा सोहळा भक्ती, शक्ती आणि युक्तीच्या त्रिवेणी संगमाने पार पडला. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे, तर प्रशासनाने आखलेली चोख सुरक्षा व्यवस्था आणि मंदिर समितीचे सूक्ष्म नियोजन. यामुळेच लाखो भाविकांनी अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणात देवीचे दर्शन घेतले.
​खाकीची सतर्कता आणि वरिष्ठांचे सूक्ष्म नियोजन
​यंदाचा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलीस अधीक्षक राठोड साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा चक्र उभारण्यात आले होते. प्रत्यक्ष जमिनीवर या नियोजनाची अंमलबजावणी एपीआय संतोष भालेराव यांनी अत्यंत कौशल्याने केली. औरळा पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल कांबळे आणि होमगार्ड शिंदे यांच्या पथकाने गर्दीच्या ठिकाणी चोख पहारा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.
​व्यवस्थापनाचा 'सुवर्ण' अध्याय: मंदिर ट्रस्टची भूमिका
​भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानने अहोरात्र कष्ट घेतले. अध्यक्ष आनंदराव महाले, उपाध्यक्ष दिलीपराव वाघ, कोषाध्यक्ष रमेश कुमार खंडेलवाल आणि सचिव सुधाकर जीवरख यांच्या नेतृत्वाखालील टीमने उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे रांजण आणि भव्य सावलीची व्यवस्था केली होती. दर्शनासाठी रांगांचे योग्य व्यवस्थापन केल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही.
​ग्रामीण संस्कृतीचा जागर: कुस्त्या आणि बारा गाड्यांचा थरार
​उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेला 'बारा गाड्यांची ओढ' हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, आखाड्यात रंगलेल्या कुस्त्यांच्या जंगी सामन्यांनी क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लहानांसाठी खेळणी, पाळणे आणि मोठ्यांसाठी विविध स्टॉल्समुळे जत्रेला मोठी रंगत आली होती.
​सहकार्याचा हात: महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना
​केवळ पोलीस प्रशासनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेने या सोहळ्यात मोलाची भूमिका बजावली. सिल्लोड तालुका अध्यक्ष गौतम हिवराळे आणि कन्नड प्रतिनिधी तौफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
​"पोलीस प्रशासन, मंदिर समिती आणि आमची संघटना यांच्यातील समन्वयामुळेच इतका मोठा सोहळा कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वी झाला. ही सेवा करणे हेच आमचे कर्तव्य आहे," अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष गौतम हिवराळे यांनी दिली.
​धार्मिक परंपरेसोबतच प्रशासकीय शिस्तीचा एक नवा वस्तुपाठ औरळा नगरीने या निमित्ताने महाराष्ट्रसमोर ठेवला आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    1
    जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी..
जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे.
या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
    1
    सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ
    1
    जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    8 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    1
    (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.  बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सावळदबारा येथे अवकाळी पावसाचा थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सावळदबारा (प्रतिनिधी): परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. वाऱ्याचा वेगही जास्त असल्यामुळे झाडांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके घेतली असताना ऐन कापणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
    1
    सावळदबारा येथे अवकाळी पावसाचा थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सावळदबारा (प्रतिनिधी): परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. वाऱ्याचा वेगही जास्त असल्यामुळे झाडांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके घेतली असताना ऐन कापणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे चिंता वाढली आहे.
याशिवाय काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.