पवन चक्की व सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक,प्रकल्प धारकांना सुरक्षा बळकट करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे होते. या बैठकीस लातूर जिल्ह्यातील विविध पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांचे प्रतिनिधी, प्रकल्प धारक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील अनेक पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्प हे दुर्गम व निर्जन भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी कॉपर वायर, अल्युमिनियम वायर तसेच इतर विद्युत साहित्य चोरीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर अशा चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच प्रकल्पांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सर्व प्रकल्प धारकांना सुरक्षा व्यवस्थेबाबत विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रकल्प परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व ट्रॅप कॅमेरे बसविणे, तसेच प्रकल्पाच्या चारही बाजूंनी आय पी कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी हालचाल टिपणारे मोशन सेन्सर कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुर्गम भागातील पवनचक्की व सौर प्रकल्पांच्या परिसरात उच्च क्षमतेचे विद्युत दिवे (हाय मास्ट लाईट्स) बसवून परिसर अधिक प्रकाशमान ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्प परिसरात सुरक्षा रक्षकांना प्रभावीपणे गस्त घालता यावी यासाठी चारचाकी वाहन व मोटारसायकलद्वारे पेट्रोलिंग करता येईल असा रस्ता ठेवणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. प्रकल्प परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती मिळावी यासाठी अलार्म सिस्टीम व जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. तसेच सौर व पवनचक्की प्रकल्पांवर काम करणारे कामगार व सुरक्षा रक्षक यांची पोलीस विभागा मार्फत चारित्र्य पडताळणी करूनच त्यांची नियुक्ती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले. बैठकीत चर्चा करताना अनेक वेळा असे निदर्शनास आले आहे की, प्रकल्पातील कॉपर किंवा अल्युमिनियम वायर चोरीचे प्रकार हे बहुतांश वेळा त्या प्रकल्पाशी संबंधित असलेले कामगार किंवा पूर्वी काम करून गेलेले कामगार यांच्याकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कामगारांची पार्श्वभूमी तपासणे तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय सौर व पवनचक्की प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विद्युत वायर शक्य असल्यास जमिनीखाली टाकाव्यात व त्यावर सिमेंटचा थर द्यावा, जेणेकरून त्या सहजपणे काढता येणार नाहीत. तसेच उपकरणांच्या सुरक्षेसाठी अन्टी-थेफ्ट नट-बोल्टचा वापर करणे किंवा आवश्यक त्या ठिकाणी वेल्डिंग करणे यासारख्या उपाययोजनाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.प्रकल्प परिसरात हायमास्ट दिवे बसविणे, पुरेसे सुरक्षा रक्षक नेमणे व त्यांच्या गस्तीची व्यवस्था मजबूत करणे, तसेच गस्त प्रभावीपणे होण्यासाठी आर एफ आय डी प्रणाली किंवा पीएफ आयडीचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षा रक्षकांना परिसरावर प्रभावीपणे लक्ष ठेवता यावे यासाठी वॉच टॉवरची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. तसेच प्रकल्पाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीकडून खंडणीची मागणी किंवा इतर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.लातूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून प्रकल्प धारकांनीही आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पवन चक्की व सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक,प्रकल्प धारकांना सुरक्षा बळकट करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे होते. या बैठकीस लातूर जिल्ह्यातील विविध पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांचे प्रतिनिधी, प्रकल्प धारक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील अनेक पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्प हे दुर्गम व निर्जन भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी कॉपर वायर, अल्युमिनियम वायर तसेच इतर विद्युत साहित्य चोरीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर अशा चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच प्रकल्पांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सर्व प्रकल्प धारकांना सुरक्षा व्यवस्थेबाबत विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रकल्प परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व ट्रॅप कॅमेरे बसविणे, तसेच प्रकल्पाच्या चारही बाजूंनी आय पी कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी हालचाल टिपणारे मोशन सेन्सर कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुर्गम भागातील पवनचक्की व सौर प्रकल्पांच्या परिसरात उच्च क्षमतेचे विद्युत दिवे (हाय मास्ट लाईट्स) बसवून परिसर अधिक प्रकाशमान ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्प परिसरात सुरक्षा रक्षकांना प्रभावीपणे गस्त घालता यावी यासाठी चारचाकी वाहन व मोटारसायकलद्वारे पेट्रोलिंग करता येईल असा रस्ता ठेवणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. प्रकल्प परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती मिळावी यासाठी अलार्म सिस्टीम व जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. तसेच सौर व पवनचक्की प्रकल्पांवर काम करणारे कामगार व सुरक्षा रक्षक यांची पोलीस विभागा मार्फत चारित्र्य पडताळणी करूनच त्यांची नियुक्ती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले. बैठकीत चर्चा करताना अनेक वेळा असे निदर्शनास आले आहे की, प्रकल्पातील कॉपर किंवा अल्युमिनियम वायर चोरीचे प्रकार हे बहुतांश वेळा त्या प्रकल्पाशी संबंधित असलेले कामगार किंवा पूर्वी काम करून गेलेले कामगार यांच्याकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कामगारांची पार्श्वभूमी तपासणे तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय सौर व पवनचक्की प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विद्युत वायर शक्य असल्यास जमिनीखाली टाकाव्यात व त्यावर सिमेंटचा थर द्यावा, जेणेकरून त्या सहजपणे काढता येणार नाहीत. तसेच उपकरणांच्या सुरक्षेसाठी अन्टी-थेफ्ट नट-बोल्टचा वापर करणे किंवा आवश्यक त्या ठिकाणी वेल्डिंग करणे यासारख्या उपाययोजनाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.प्रकल्प परिसरात हायमास्ट दिवे बसविणे, पुरेसे सुरक्षा रक्षक नेमणे व त्यांच्या गस्तीची व्यवस्था मजबूत करणे, तसेच गस्त प्रभावीपणे होण्यासाठी आर एफ आय डी प्रणाली किंवा पीएफ आयडीचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षा रक्षकांना परिसरावर प्रभावीपणे लक्ष ठेवता यावे यासाठी वॉच टॉवरची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. तसेच प्रकल्पाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीकडून खंडणीची मागणी किंवा इतर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.लातूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून प्रकल्प धारकांनीही आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
- प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.2
- भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.2
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share1
- Post by अखंड भारत1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4