वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे. MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. “वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली. गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.” वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे. MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. “वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली. गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.” वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
- पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में मुंब्रा की सड़कों पर उतरी मानवता की मिसाल! नगरसेविका मर्जिया शानू पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में ईद-ए-मिलादुन्नबी के खास मौके पर नगरसेविका मर्जिया शानू पठान द्वारा 'ह्यूमन चेन' बनाकर पैगंबर हज़रत मोहम्मद (स.) की हदीस पेश करने की इस अनूठी और प्रेरणादायक खबर के लिए1
- #Amravati #Maharashtra #AmravatiHospital #FireIncident #NICU #News24mumbai#महाराष्ट्र #अमरावती1
- पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? Pure vidhansabha ko shayarana banaa Diya1
- समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम1
- *IIIT हैदराबाद में एडमिशन के नाम पर 20 लाख ठगे:* फर्जी अलॉटमेंट लेटर भेजकर फोन बंद किया, लखनऊ में 3 ठगों पर पीड़ित और पृष्ठभूमि: विभूतिखंड के रहने वाले नरेंद्र सिंह की बेटी रुद्राक्षी सिंह कोटा से इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा की तैयारी कर रही थीं. दिसंबर 2024 में कोचिंग संस्थान FIIT JEE के अचानक बंद होने से उनकी पढ़ाई प्रभावित हुई, जिसके बाद वे किसी प्रतिष्ठित कॉलेज में एडमिशन का विकल्प ढूंढ रहे थे. [1] गूगल सर्च से संपर्क: अप्रैल 2026 में पीड़ित का संपर्क गूगल सर्च के जरिए अविनाश सिंह नाम के व्यक्ति से हुआ. उसने खुद को मुंबई की "विजडम एजुकेशन" नामक कंसल्टेंसी का संचालक बताया. [1] झांसा और फर्जीवाड़ा: आरोपी ने पहले बेंगलुरु के एक कॉलेज में और फिर बाद में IIIT हैदराबाद में उतने ही खर्च में बीटेक (ECE) सीट दिलाने का दावा किया. [1] रकम की वसूली: आरोपियों ने पीड़ित को झांसे में लेकर 5 किस्तों में कुल ₹20 लाख ऐंठ लिए. इस रकम का कुछ हिस्सा आरोपी खुद पीड़ित के घर आकर नकद ले गया और बाकी हिस्सा ट्रांसफर कराया गया. [1] फर्जी अलॉटमेंट और फरार: आरोपियों ने फर्जी सीट अलॉटमेंट लेटर भेजा और जैसे ही पूरी रकम मिल गई, उन्होंने अपने मोबाइल फोन बंद कर दिए. ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा दैनिक समाचार पत्र1
- 🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई! बस में महिलाओं की सोने की चूड़ियां चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश। 3 आरोपी गिरफ्तार, करीब ₹20.53 लाख कीमत की 130 ग्राम सोने की चूड़ियां बरामद। जांच में 6 चोरी के मामलों का खुलासा। 🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई! बस में महिलाओं की सोने की चूड़ियां चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश। 3 आरोपी गिरफ्तार, करीब ₹20.53 लाख कीमत की 130 ग्राम सोने की चूड़ियां बरामद। जांच में 6 चोरी के मामलों का खुलासा।1
- मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता! मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता!1
- नेपाल में कुदरत का कहर: बाढ़ ने मचाई भारी तबाही, सैकड़ों की मौत और 1,300 से ज्यादा लापता काठमांडू। नेपाल-चीन सीमा के पास आई विनाशकारी बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। तेज बहाव ने घरों, सड़कों, पुलों और कई इलाकों को अपनी चपेट में ले लिया। तस्वीरों में बाढ़ के पानी का खौफनाक मंजर साफ दिखाई दे रहा है। रिपोर्टों के अनुसार, 26 अगस्त को हिमालयी क्षेत्र में बर्फ-पत्थर के बड़े पैमाने पर खिसकने के बाद अचानक आई बाढ़ ने नेपाल के कई इलाकों में कहर बरपाया। नेपाल में 826 लोग अब भी लापता बताए जा रहे हैं, जबकि तिब्बत में भी सैकड़ों लोगों के लापता होने की खबर है। नेपाल और तिब्बत को मिलाकर 1,300 से अधिक लोगों के लापता होने की रिपोर्ट सामने आई है। इस आपदा में सैकड़ों लोगों की जान जा चुकी है और राहत-बचाव अभियान लगातार जारी है। कई इलाकों में सड़क और संचार व्यवस्था बुरी तरह प्रभावित होने के कारण बचाव दलों को मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। सेना और सुरक्षा बल हेलीकॉप्टरों समेत अन्य संसाधनों से लोगों को सुरक्षित निकालने में जुटे हैं। सोशल मीडिया पर 1,500–2,000 लोगों के बह जाने का दावा भी वायरल है, लेकिन इस संख्या की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। ऐसे में आधिकारिक आंकड़ों के सामने आने तक इस दावे को सावधानी से देखना जरूरी है। कुदरत के इस कहर ने एक बार फिर पूरे हिमालयी क्षेत्र में बढ़ते प्राकृतिक खतरे की भयावह तस्वीर सामने रख दी है।1