logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक एप्रिल पासून लातूर जिल्ह्यात चार विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार लातूर (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) अभियान स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे.  कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रशिक्षण पार पडणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान ३० ते ४० शेतकऱ्यांनी यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनद्वारे संचलित ही डिजिटल शेती शाळा एक प्रगत ऑनलाईन व्यासपीठ असून, याद्वारे तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन झूम आणि युट्युब च्या माध्यमातून दिले जाणार आहे. या उपक्रमात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, तसेच कृषी ताई व कृषी सखी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावनिहाय नियोजन करून एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्रित उपस्थित राहावे, यासाठी कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. या विशेष शेती शाळांचे वेळापत्रक चार भागांत विभागले असून, त्याचे सत्र निश्चित केलेल्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. याची लिंक गावनिहाय व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या भागात १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, टोकण पद्धत, आंतरपीक आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन होईल. दुसऱ्या भागात ८ एप्रिल रोजी बीजामृत, जिवामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीवर भर दिला जाईल. तिसऱ्या भागात १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके आणि मित्र कीटकांचा वापर यावर चर्चा होईल, तर चौथ्या भागात २२ एप्रिल रोजी भात शेती लागवडीचे आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या डिजिटल शेती शाळेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

4 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक एप्रिल पासून लातूर जिल्ह्यात चार विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार लातूर (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) अभियान स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे.  कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रशिक्षण पार पडणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान ३० ते ४० शेतकऱ्यांनी यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनद्वारे संचलित ही डिजिटल शेती शाळा एक प्रगत ऑनलाईन व्यासपीठ असून, याद्वारे तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन झूम आणि युट्युब च्या माध्यमातून दिले जाणार आहे. या उपक्रमात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, तसेच कृषी ताई व कृषी सखी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावनिहाय नियोजन करून एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्रित उपस्थित राहावे, यासाठी कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. या विशेष शेती शाळांचे वेळापत्रक चार भागांत विभागले असून, त्याचे सत्र निश्चित केलेल्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. याची लिंक गावनिहाय व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या भागात १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, टोकण पद्धत, आंतरपीक आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन होईल. दुसऱ्या भागात ८ एप्रिल रोजी बीजामृत, जिवामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीवर भर दिला जाईल. तिसऱ्या भागात १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके आणि मित्र कीटकांचा वापर यावर चर्चा होईल, तर चौथ्या भागात २२ एप्रिल रोजी भात शेती लागवडीचे आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या डिजिटल शेती शाळेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
    4
    *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही  रेल्वे स्टेशन.वर 
वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही  येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.
    1
    लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर,
लातूर मनपा  चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक  अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    5 hrs ago
  • ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    1
    ये सारी बात का जिम्मेदार कोण है?
चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो.
बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है.
मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. 
और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    17 hrs ago
  • लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    18 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    1
    शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    1
    हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे.
निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे.
👉 नागरिकांची मागणी:
✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
✔️ देयके तात्काळ थांबवा
✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा
सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    1
    खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा
हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो 
आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे 
दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो 
#RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.