"अठरापगड जाती धर्मातील तमाम बहुजनांना एकत्र करून सामाजिक प्रबोधनाचा माध्यमातून जागृती घडविणाऱ्या अशाच प्रबोधन कार्यक्रमांची आज समाजाला नितांत गरज आहे." असे प्रतिपादन उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई जैन यांनी केले. त्या प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक गीत गायन व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात राजे संभाजी नगर बोरबन उमरखेड येथे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवनियुक्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी उपस्थित युवकाना ,"महापुरुषांच्या विचारांचा अंगिकार करून विविध क्षेत्रात यश संपादित करून आचरण केले पाहिजे." असे विचार व्यक्त केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या सरोजताई देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक गजेंद्र ठाकरे,बांधकाम सभापती न . पा.उमरखेड प्रकाश शिकारे, आरोग्य सभापती न . पा.उमरखेड विरेंद्र खंदारे,सामाजिक कार्यकर्ते राहुल काळबांडे,मराठा सेवा संघाचे प्रवीण सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आठवले,सुभाष वाठोरे, प्रकाश हापसे, देवानंदपाटील मोरे,प्रफुल दिवेकर,आकाश लोणकर,सुनीताताई वाळके, हरीभाऊ जाधव,पत्रकार सविताताई चंद्रे,मुनव्वर पठाण,प्रमोद वाळुककर, सतेजभाऊ जैन,हरिभाऊ जाधव,राम कांबळे,बंडू भुते आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्यामध्ये अक्षय कांबळे, विद्यारत्न खंदारे, डॉ.नितु मुनेश्वर, भुषण पठाडे, अवंती लोकरे, प्रसेनजीत पाटील,अंजली पवार, सौरभ पाईकराव,सूरज बहादूरे,यश फटाले,आदित्य वाळूककर, तेजस पाटील,रोहन खर्चे, आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर शिवरंजन म्युझिकल ग्रुप चे गायक शिवशंकर वैद्य आणि संच यांनी प्रबोधनात्मक गीत गायनाचे सादरीकरण करून श्रोत्यांची माने जिंकली. प्रस्तावना निखिल थोरात,संचलन प्रशिक नंदुरकर,तर आभार आम्रपाली प्रदीप लोकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट, जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ,भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.अठरापगड जाती धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी ट्रस्ट चे अध्यक्ष विद्वान केवटे,कोषाध्यक्ष संभाजी पाईकराव यांसह मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
"अठरापगड जाती धर्मातील तमाम बहुजनांना एकत्र करून सामाजिक प्रबोधनाचा माध्यमातून जागृती घडविणाऱ्या अशाच प्रबोधन कार्यक्रमांची आज समाजाला नितांत गरज आहे." असे प्रतिपादन उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई जैन यांनी केले. त्या प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक गीत गायन व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात राजे संभाजी नगर बोरबन उमरखेड येथे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवनियुक्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी उपस्थित युवकाना ,"महापुरुषांच्या विचारांचा अंगिकार करून विविध क्षेत्रात यश संपादित करून आचरण केले पाहिजे." असे विचार व्यक्त केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या सरोजताई देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक गजेंद्र ठाकरे,बांधकाम सभापती न . पा.उमरखेड प्रकाश शिकारे, आरोग्य सभापती न . पा.उमरखेड विरेंद्र खंदारे,सामाजिक कार्यकर्ते राहुल काळबांडे,मराठा सेवा संघाचे प्रवीण सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आठवले,सुभाष वाठोरे,
प्रकाश हापसे, देवानंदपाटील मोरे,प्रफुल दिवेकर,आकाश लोणकर,सुनीताताई वाळके, हरीभाऊ जाधव,पत्रकार सविताताई चंद्रे,मुनव्वर पठाण,प्रमोद वाळुककर, सतेजभाऊ जैन,हरिभाऊ जाधव,राम कांबळे,बंडू भुते आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्यामध्ये अक्षय कांबळे, विद्यारत्न खंदारे, डॉ.नितु मुनेश्वर, भुषण पठाडे, अवंती लोकरे, प्रसेनजीत पाटील,अंजली पवार, सौरभ पाईकराव,सूरज बहादूरे,यश फटाले,आदित्य वाळूककर, तेजस पाटील,रोहन खर्चे, आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर शिवरंजन म्युझिकल ग्रुप चे गायक शिवशंकर वैद्य आणि संच यांनी प्रबोधनात्मक गीत गायनाचे सादरीकरण करून श्रोत्यांची माने जिंकली. प्रस्तावना निखिल थोरात,संचलन प्रशिक नंदुरकर,तर आभार आम्रपाली प्रदीप लोकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट, जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ,भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.अठरापगड जाती धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी ट्रस्ट चे अध्यक्ष विद्वान केवटे,कोषाध्यक्ष संभाजी पाईकराव यांसह मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
- Post by Sk Chand1
- नांदेड /महाराष्ट्र ब्युरो अरविंद जाधव यांचा रिपोर्ट हदगाव तालुक्यातील मौजे टाकराळा येथील एका शेतकऱ्यांनी महिंद्रा नोवा कंपनीचे ट्रॅक्टर 19 महिन्यापूर्वी खरेदी केले होते. सदरील ट्रॅक्टर शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून ऊस वाहतुकीसाठी घेतले होते 19 महिने ट्रॅक्टर सुरळीत चालल्यानंतर त्यांना ट्रॅक्टरच्या क्लच प्लेटमध्ये प्रॉब्लेम वाटत होता सदरील ट्रॅक्टर वारंटी मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या ट्रॅक्टरला दुरुस्तीसाठी महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीच्या शोरूम ला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले वारंटी मध्ये असतानाही कंपनी म्हणते ते ट्रॅक्टरचे काही पार्ट वॉरंटी मध्ये असतात आणि काही नाही त्यामुळे सदरील शेतकरी हतास झाला. महेंद्र कंपनीच्या मॅनेजर कडे वारंवार विनंती करून देखील महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता पूर्व उडवा उडवीचीच उत्तरे दिली. ट्रॅक्टर खरेदी करते वेळेस कंपनीच्या डीलरने सदरील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करण्याचा सल्ला दिला त्यामुळे शेतकऱ्याने त्याच कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले परंतु ज्या वेळेस ट्रॅक्टर मध्ये तांत्रिक प्रॉब्लेम उद्भवला त्यावेळेस मात्र महिंद्रा कंपनीने आपले हात वर केले सदरील शेतकऱ्यांनी न्यायासाठी वंदे भारत टीव्ही चॅनलचे ब्युरो अरविंद जाधव यांच्याकडे चॅनलच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली असता आमचे ब्युरो अरविंद जाधव यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर महिंद्रा कंपनीचे हादगाव येथील मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता ते काय म्हणाले ते पहा4
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन1
- Post by Sk Chand1