जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( अहिल्यानगर जिल्हा) २२३ राहुरी विधानसभा मतदार संघातीत पोट निवडणुकीत जी स्वप्न घेऊन अक्षय कर्डिले हा मैदानात उतरला आहे ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत हे स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले.ते राहुरी येथे गणपती मंदिरा समोर झालेल्या निवडणुकीतील प्रचार सभेत बोलत होते. या प्रचार सभेस व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे,पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे,पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे,आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे,आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार खताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,श्रीमती अलकाताई कर्डिले, अण्णासाहेब बाचकर,वैभव खलाटे,संतोष शिंदे,राजू मामा तागड हे उपस्थित होते.मुख्यमंत्री विकास कामावर बोलताना पुढे म्हणाले की पुढील काळात मुळा धरणातील गाळ काढून तिन टीएमसी पाणी साठा वाढवू. मी आज तुम्हाला आश्वासीत करतो की मी शिवाजी रावा पेक्षा दीडपट प्रेम करून अक्षय कर्डिले यांनी मागितलेली गोष्ट कधीच कमी पडू देणार नाही.तसेच राहुरी कृषी विद्यापीठाची एक हजार एकर जागा काढून ती जागा एम आय डी सी साठी देऊन मोठ्या प्रमाणावर तरूणांच्या हाताला काम मिळवून देवू.तसेच संरक्षण प्रकल्पासाठी ही जिल्ह्यात इतरत्र जागा उपलब्ध करून देऊ.एस टी डेपो, उड्डाणपूल, या सर्व मागण्यां बरोबर राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक अक्षय कर्डिले यांना देऊन चाललो आहे.तसेच पुढील काळात शेतकऱ्यां साठी १०० टक्के दिवसा मोफत वीज देवू.विजबीला पोटी एक रुपया ही घेणार नाही.लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे.तसेच सुशिक्षित बेरोजगार स्टेनोग्राफर यांनी भर सभेत काळ्या अक्षरांच्या पाट्या दाखवून आपले म्हणणे मांडले ते बरोबर आहे त्यांच्या मागण्या बाबदही योग्य विचार करू. असे सांगितले.स्वर्गिय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सांगण्या वरून मी वांबोरी चारी साठी सव्वाशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले.माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली म्हणून त्यांचे ही भर सभेत आभार मानले.तसेच या निवडणुकी तील प्रचार सभेचे चोख नियोजन केले म्हणून सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक केले.आमदार विक्रम पाचपुते,आमदार राजळे,सभापती ना.राम शिंदे,ना.पंकजा मुंडे,ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले विचार व्यक्त केले.या सभेस झालेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी शेवटी उपस्थितांना असं आवाहन केलं की अक्षय कर्डिले यांना तिन चतुर्थांश मतांनी निवडून द्या. आभार सत्यजित कदम यांनी मानले.
जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( अहिल्यानगर जिल्हा) २२३ राहुरी विधानसभा मतदार संघातीत पोट निवडणुकीत जी स्वप्न घेऊन अक्षय कर्डिले हा मैदानात उतरला आहे ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत हे स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले.ते राहुरी येथे गणपती मंदिरा समोर झालेल्या निवडणुकीतील प्रचार सभेत बोलत होते. या प्रचार सभेस व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे,पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे,पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे,आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे,आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार खताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,श्रीमती अलकाताई कर्डिले, अण्णासाहेब बाचकर,वैभव खलाटे,संतोष शिंदे,राजू मामा तागड हे उपस्थित होते.मुख्यमंत्री विकास कामावर बोलताना पुढे म्हणाले की पुढील काळात मुळा धरणातील गाळ काढून तिन टीएमसी पाणी साठा वाढवू. मी आज तुम्हाला आश्वासीत करतो की मी शिवाजी रावा पेक्षा दीडपट प्रेम करून अक्षय कर्डिले यांनी मागितलेली गोष्ट कधीच कमी पडू देणार नाही.तसेच राहुरी कृषी विद्यापीठाची एक
हजार एकर जागा काढून ती जागा एम आय डी सी साठी देऊन मोठ्या प्रमाणावर तरूणांच्या हाताला काम मिळवून देवू.तसेच संरक्षण प्रकल्पासाठी ही जिल्ह्यात इतरत्र जागा उपलब्ध करून देऊ.एस टी डेपो, उड्डाणपूल, या सर्व मागण्यां बरोबर राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक अक्षय कर्डिले यांना देऊन चाललो आहे.तसेच पुढील काळात शेतकऱ्यां साठी १०० टक्के दिवसा मोफत वीज देवू.विजबीला पोटी एक रुपया ही घेणार नाही.लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे.तसेच सुशिक्षित बेरोजगार स्टेनोग्राफर यांनी भर सभेत काळ्या अक्षरांच्या पाट्या दाखवून आपले म्हणणे मांडले ते बरोबर आहे त्यांच्या मागण्या बाबदही योग्य विचार करू. असे सांगितले.स्वर्गिय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सांगण्या वरून मी वांबोरी चारी साठी सव्वाशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले.माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली म्हणून त्यांचे ही भर सभेत आभार मानले.तसेच या निवडणुकी तील प्रचार सभेचे चोख नियोजन केले म्हणून सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक केले.आमदार विक्रम पाचपुते,आमदार राजळे,सभापती ना.राम शिंदे,ना.पंकजा मुंडे,ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले विचार व्यक्त केले.या सभेस झालेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी शेवटी उपस्थितांना असं आवाहन केलं की अक्षय कर्डिले यांना तिन चतुर्थांश मतांनी निवडून द्या. आभार सत्यजित कदम यांनी मानले.
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.1
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.1
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…1