ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न . ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न राज्य शासन विविध माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद’च्या माध्यमातून सक्षणीकरणाचे हे काम ग्रामीण भागात यशस्वीपणे व्यापक स्वरुपात सुरू आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘उमेद’ अभियानांतर्गत कृषी अवजार बँक आणि कृषी निविष्ठा केंद्र हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रे स्वतः खरेदी न करता भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, हा कृषी अवजार बँकेचा प्रमुख उद्देश आहे.
ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न . ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न राज्य शासन विविध माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद’च्या माध्यमातून सक्षणीकरणाचे हे काम ग्रामीण भागात यशस्वीपणे व्यापक स्वरुपात सुरू आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘उमेद’ अभियानांतर्गत कृषी अवजार बँक आणि कृषी निविष्ठा केंद्र हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रे स्वतः खरेदी न करता भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, हा कृषी अवजार बँकेचा प्रमुख उद्देश आहे.
- सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.3
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज नेटवर्क अलिबाग: सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.1
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. #SalwaCrime #KuhiPolice #SuperstitionNews #MaharashtraNews #NagpurNews विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): #अंधश्रद्धा #साळवा #कुही #अघोरीपूजा #भानामती #स्मशानभूमी #महाराष्ट्रबातम्या #जादूटोणाविरोधीकायदा विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): #BlackMagicNews #StopSuperstition #CrimeUpdate #PoliceInvestigation #LocalNews1
- लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ), सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद ) सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण ) निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई। नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई। पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।1