येवला शहरातील पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल महिलांनी मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांचे मानले आभार येवला शहराच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत येवला शहरातील महिलांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना औक्षण करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत अनोख्या पद्धतीने आभार व्यक्त केले. येवला संपर्क कार्यालयात झालेल्या या रक्षाबंधन सोहळ्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येवला शहरासाठी येसगाव पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे शहराच्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी दिशा मिळणार असून, अनेक वर्षांपासून महिलांना करावा लागणारा पाण्यासाठीचा संघर्ष कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन करावी लागणारी वणवण, पाण्याच्या टँकरची प्रतीक्षा आणि कुटुंबासाठी पाणी भरण्याची जबाबदारी यामुळे येवला शहरातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधीप्रती कृतज्ञता या भावनेतून महिलांनी समीर भुजबळ यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाच्या नात्याचे प्रतीक आहे. याच भावनेतून महिलांनी समीर भुजबळ यांना राखी बांधत येवल्याच्या विकासाची जबाबदारी आणि महिलांच्या प्रश्नांसाठीची बांधिलकी कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच येवला शहराचा पाणी प्रश्न सोडवून रक्षाबंधनासाठी आम्हाला मिळालेली मोठी ओवाळणी ही अतिशय महत्त्वाची असल्याच्या भावना यावेळी महिला भगिनींनी व्यक्त केल्या. यावेळी महिलांशी संवाद साधताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. पाण्याचा प्रश्न हा केवळ शहराचा प्रश्न नसून प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे येसगाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून येवल्याला शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळातही आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी महिला भगिनींना दिला. महिलांनी व्यक्त केलेल्या या आपुलकीबद्दल समीर भुजबळ यांनी त्यांचे आभार मानत, “आज तुम्ही मला राखी बांधून जो विश्वास व्यक्त केला आहे, तो माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. येवल्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-सुविधांसाठी ही बांधिलकी कायम राहील,” अशी ग्वाही दिली. यावेळी महिलांनी रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विकासकामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे येवला संपर्क कार्यालयातील हा रक्षाबंधन सोहळा भावनिक जिव्हाळा, विकासावरील विश्वास आणि लोकप्रतिनिधींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा आगळावेगळा सोहळा ठरला.
येवला शहरातील पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल महिलांनी मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांचे मानले आभार येवला शहराच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत येवला शहरातील महिलांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना औक्षण करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत अनोख्या पद्धतीने आभार व्यक्त केले. येवला संपर्क कार्यालयात झालेल्या या रक्षाबंधन सोहळ्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येवला शहरासाठी येसगाव पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे शहराच्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी दिशा मिळणार असून, अनेक वर्षांपासून महिलांना करावा लागणारा पाण्यासाठीचा संघर्ष कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन करावी लागणारी वणवण, पाण्याच्या टँकरची प्रतीक्षा आणि कुटुंबासाठी पाणी भरण्याची जबाबदारी यामुळे येवला शहरातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधीप्रती कृतज्ञता या भावनेतून महिलांनी समीर भुजबळ यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाच्या नात्याचे प्रतीक आहे. याच भावनेतून महिलांनी समीर भुजबळ यांना राखी बांधत येवल्याच्या विकासाची जबाबदारी आणि महिलांच्या प्रश्नांसाठीची बांधिलकी कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच येवला शहराचा पाणी प्रश्न सोडवून रक्षाबंधनासाठी आम्हाला मिळालेली मोठी ओवाळणी ही अतिशय महत्त्वाची असल्याच्या भावना यावेळी महिला भगिनींनी व्यक्त केल्या. यावेळी महिलांशी संवाद साधताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. पाण्याचा प्रश्न हा केवळ शहराचा प्रश्न नसून प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे येसगाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून येवल्याला शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळातही आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी महिला भगिनींना दिला. महिलांनी व्यक्त केलेल्या या आपुलकीबद्दल समीर भुजबळ यांनी त्यांचे आभार मानत, “आज तुम्ही मला राखी बांधून जो विश्वास व्यक्त केला आहे, तो माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. येवल्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-सुविधांसाठी ही बांधिलकी कायम राहील,” अशी ग्वाही दिली. यावेळी महिलांनी रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विकासकामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे येवला संपर्क कार्यालयातील हा रक्षाबंधन सोहळा भावनिक जिव्हाळा, विकासावरील विश्वास आणि लोकप्रतिनिधींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा आगळावेगळा सोहळा ठरला.
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام1