Shuru
Apke Nagar Ki App…
पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर! नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- फुलंब्री येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आला,1
- छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.1
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप1