सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीरच्या विद्यार्थी-शिक्षकांची शैक्षणिक सहल संपन्न उदगीर (एल पी उगीले) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीर येथील 44 विद्यार्थी व तीन शिक्षक बालाजी रोडे, सौ. मळभागे राचम्मा, सौ.शानेवार अनिता यांनी स्कुल कनेक्ट उपक्रमांतर्गत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला शैक्षणिक सहल अंतर्गत भेट दिली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच ग्रंथालयाला भेट देत विविध प्रयोगशाळांमधील प्रात्यक्षिके पाहिली, व त्याबाबत माहिती घेतली. समन्वयक प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वी केली. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोपप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साबदे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीरच्या विद्यार्थी-शिक्षकांची शैक्षणिक सहल संपन्न उदगीर (एल पी उगीले) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीर येथील 44 विद्यार्थी व तीन शिक्षक बालाजी रोडे, सौ. मळभागे राचम्मा, सौ.शानेवार अनिता यांनी स्कुल कनेक्ट उपक्रमांतर्गत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला शैक्षणिक सहल अंतर्गत भेट दिली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच ग्रंथालयाला भेट देत विविध प्रयोगशाळांमधील प्रात्यक्षिके पाहिली, व त्याबाबत माहिती घेतली. समन्वयक प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वी केली. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोपप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साबदे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
- महावितरण विभागाच्या तक्रारीवर कारवाईचा अभाव; माहिती विचारल्यावर महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी? उदगीर (प्रतिनिधी) नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी वीज ही अत्यंत महत्त्वाची सुविधा मानली जाते. वीजपुरवठा किंवा लाईट संदर्भातील समस्या निर्माण झाल्यास नागरिक संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवून त्यावर तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा करतात. मात्र तक्रार दाखल करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार उदगीर येथे समोर आल्याची माहिती मिळत आहे. ‘जनता की आवाज’चे पत्रकार असलेले अर्जदार अब्दुल नासेर बासीद काजी यांचा आरोप मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरातील रहिवासी अब्दुल नासेर बासीद काजी यांनी परिसरातील लाईट संदर्भातील समस्येबाबत दिनांक 13 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधित समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे यावर तातडीने कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल करूनही अनेक दिवस उलटून गेले तरी संबंधित समस्येवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही समजते. दरम्यान, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अर्जदार अब्दुल नासेर बासीद काजी, जे स्वतः “जनता की आवाज” या माध्यमाशी संबंधित पत्रकार आहेत, त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती विचारली. मात्र माहिती देण्याऐवजी तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती विचारल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी “अरे–राव” अशा अवमानकारक भाषेत संवाद साधत उद्धटपणे वागणूक दिल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारांनी केवळ नागरिकांच्या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी आणि तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले असताना अशी वागणूक मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.4
- रेल्वेचा प्रश्न संसदेत मांडल्याबद्दल खासदार साहेबांचे रेल्वे संघर्ष समितीकडून मनस्वी अभिनंदन. शुरु लोकल न्युज चा इफेक्ट रेल्वे संदर्भात प्रसारीत होत असलेल्या बातम्यांना खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुद्दा संसदेत मांडुन दिले न्याय. लातूर रोड – जळकोट – मुखेड – बोधन (Bodhan – Latur Road) रेल्वे मार्ग हा विशाखापट्टणम (व्हिजाग) बंदराशी कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जातो, विशेषतः महाराष्ट्र आणि तेलंगणातील मराठवाडा-उत्तर कर्नाटक भागातील शेतमाल, खनिजे आणि औद्योगिक मालाच्या निर्यात-आयातसाठी. कनेक्टिव्हिटी कशी होईल? हा नवीन मार्ग South Central Railway (SCR) अंतर्गत येतो, जो विशाखापट्टणम बंदराशी थेट जोडलेला आहे (व्हिजाग हे SCR चे प्रमुख भाग आहे). सध्याचा मार्ग: लातूर रोड → मुदखेड → परभणी → नांदेड → मुंबई/हैदराबाद मार्गे व्हिजागला जातो – हा लांब आणि वळसा घालणारा आहे. नवीन मार्ग पूर्ण झाल्यास: लातूर रोड → बोधन → निजामाबाद/कामारे → सिकंदराबाद/काजीपेट → विशाखापट्टणम असा थेट आणि कमी अंतराचा पर्याय मिळेल. यामुळे १००-२०० किमी अंतर वाचेल आणि वेळ कमी होईल. प्रमुख फायदे: विशाखापट्टणम बंदर हे भारतातील प्रमुख कोळसा, लोखंडी खनिजे, उर्वरित तेल, खते आणि कंटेनर हँडलिंग बंदर आहे. मराठवाड्यातील साखर, डाळी, कापूस, सोयाबीन सारख्या शेतमालाची थेट निर्यात व्हिजागमार्गे शक्य होईल. कॉन्कण बंदर (जसे रत्नागिरी, जेएनपीटी) सोबत पर्यायी लिंक मिळेल, ज्यामुळे व्यापार वाढेल. स्थानिक स्तरावर: जळकोट, मुखेड, बिलोली, नरसी, देगलूर सारख्या भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बंदर कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल आणि रोजगार वाढेल. नवीनतम अपडेट्स (मार्च २०२६ पर्यंत) काही सोशल मीडिया आणि स्थानिक अपडेट्स (उदा. TheMahaIndex वरून) नुसार, हा मार्ग विशाखापट्टणम आणि कॉन्कण बंदरांशी क्रिटिकल लिंक म्हणून पाहिला जात आहे, ज्यामुळे व्यापार आणि पर्यटन वाढेल. माती परीक्षण (soil testing) सुरू असताना हे फायदे हायलाइट केले जात आहेत. DPR आणि सर्वेक्षण प्रक्रियेत हे कनेक्टिव्हिटी फायदे मुख्य कारण म्हणून नमूद आहेत. व्हिजाग बंदराची रेल्वे कनेक्टिव्हिटी आधीच मजबूत आहे (१८५+ किमी अंतर्गत रेल्वे ट्रॅक), आणि RVNL सारख्या संस्था तेथे नवीन ब्रिज/मल्टीमॉडल सुविधा विकसित करत आहेत – ज्यामुळे नवीन लाइन जोडल्यास फायदा होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मराठवाडा-तेलंगणा भागाला पूर्व किनारपट्टीच्या प्रमुख बंदराशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. सद्य: हे प्रोजेक्ट DPR/सर्वे टप्प्यात आहे, पण स्थानिक खासदार/आमदारांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळत आहे. जर विशाखापट्टणम बंदराच्या मालवाहतुकीचे आकडे, किंवा या मार्गाच्या विशिष्ट फायद्यांचे अधिक डिटेल्स हवे असतील तर सांगा! 🚆1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- Post by GOSAVI. v. j.1
- लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड - माजी मंत्री संजय बनसोडे यांची निवडी नंतर संजय बनसोडे काय म्हणाले ते पहा.1
- नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.4
- Post by परळी वार्ता1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1