जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील 'फायर ऑडिट' चा प्रश्न कधी सुटणार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या शिशुंच्या अतिदक्षता कक्षाला व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा बालके गंभीर जखमी झाले. अशा प्रकारची दुदैवी घटना भंडारा जिल्हा रुग्णालयात घडली होती. त्यात दहा बालकांचा वेदनादायी मृत्यू झाला होता. अमरावती येथील घटनेनंतर वाशीम जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयाच्या 'फायर ऑडिट' चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयाचे 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत प्रशानाने ठोस पावले उचलून अशा रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. वाशीम जिल्ह्यात जवळपास २५० च्या वर नोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. सर्वच रुग्णालयात गंभीर आजारी रुग्णावर उपचार करण्यासाठी अद्ययावत विद्युत उपकरणे आहेत. बहुतांश उपकरणे २४ तास वापरात असतात. सलग वापरामुळे त्या उपकरणावर ताण येतो आणि ते गरम होतात. त्यामुळे त्यातील वायरींग जळण्याची भिती अधिक असते. तज्ञ डॉटरांच्या रुग्णालयात दरदिवशी शेकडो रुग्ण तपासणी साठी येतात. त्यात काही गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी भरती करुन केल्या जाते. गंभीर रुग्णावर गरजेनुसार विद्युत उपकरणावर उपचार करण्यात येतात. गंभीर आजारी रुग्णावर उपचार करणारी विद्युत उपकरणे एकदा रुग्णालयात आणून बसविल्यानंतर त्या उपकरणाची नियमीत तपासणी होते? हा एक संशोधनाचा विषय आहे. बहुतांश खासगी रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणेसह तेथील सुरक्षा यंत्रणा देखील कमकुवत आहे. बहुतांश रुग्ण हे कंपाऊंडरच्या भरोशावर आहेत. दरदिवशी एका रुग्णालयात किती रुग्णांची ओपीडी असावी व त्यांच्याकडून किती शुल्क घ्यावे यावरही कुठेही नियंत्रण नाही. दरदिवशी नामांकीत दरदिवशी रुग्णालयात २०० रुग्णांची नोंद होते. भरती केलेल्या रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता नाही. काही रुग्णालयात तर एवढी बिकट अवस्था आहे की, खाटा नसल्यामुळे रुग्णावर जमीनीवर उपचार केल्या जातात. सर्वच रुग्णालयात तज्ञ डॉटर वगळता अप्रशिक्षीत लोकांकडून रुग्णावर उपचार होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील 'फायर ऑडिट' चा प्रश्न कधी सुटणार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या शिशुंच्या अतिदक्षता कक्षाला व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा बालके गंभीर जखमी झाले. अशा प्रकारची दुदैवी घटना भंडारा जिल्हा रुग्णालयात घडली होती. त्यात दहा बालकांचा वेदनादायी मृत्यू झाला होता. अमरावती येथील घटनेनंतर वाशीम जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयाच्या 'फायर ऑडिट' चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयाचे 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत प्रशानाने ठोस पावले उचलून अशा रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. वाशीम जिल्ह्यात जवळपास २५० च्या वर नोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. सर्वच रुग्णालयात गंभीर आजारी रुग्णावर उपचार करण्यासाठी अद्ययावत विद्युत उपकरणे आहेत. बहुतांश उपकरणे २४ तास वापरात असतात. सलग वापरामुळे त्या उपकरणावर ताण येतो आणि ते गरम होतात. त्यामुळे त्यातील वायरींग जळण्याची भिती अधिक असते. तज्ञ डॉटरांच्या रुग्णालयात दरदिवशी शेकडो रुग्ण तपासणी साठी येतात. त्यात काही गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी भरती करुन केल्या जाते. गंभीर रुग्णावर गरजेनुसार विद्युत उपकरणावर उपचार करण्यात येतात. गंभीर आजारी रुग्णावर उपचार करणारी विद्युत उपकरणे एकदा रुग्णालयात आणून बसविल्यानंतर त्या उपकरणाची नियमीत तपासणी होते? हा एक संशोधनाचा विषय आहे. बहुतांश खासगी रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणेसह तेथील सुरक्षा यंत्रणा देखील कमकुवत आहे. बहुतांश रुग्ण हे कंपाऊंडरच्या भरोशावर आहेत. दरदिवशी एका रुग्णालयात किती रुग्णांची ओपीडी असावी व त्यांच्याकडून किती शुल्क घ्यावे यावरही कुठेही नियंत्रण नाही. दरदिवशी नामांकीत दरदिवशी रुग्णालयात २०० रुग्णांची नोंद होते. भरती केलेल्या रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता नाही. काही रुग्णालयात तर एवढी बिकट अवस्था आहे की, खाटा नसल्यामुळे रुग्णावर जमीनीवर उपचार केल्या जातात. सर्वच रुग्णालयात तज्ञ डॉटर वगळता अप्रशिक्षीत लोकांकडून रुग्णावर उपचार होत असल्याचे चित्र आहे.
- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.2
- परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.4
- *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.2