बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण; ‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण; जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती नंदुरबार, : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा (UNESCO) अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील 35 हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअॅप व ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाच्या या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तिकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या डिजिटल अभियानात सहभागी होऊन आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ (Digital Cultural Preserver Certificate) देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या परंपरा जतन करण्यासोबतच नागरिकांचा या सांस्कृतिक लोकचळवळीत सक्रिय सहभाग वाढणार आहे. नंदुरबारमध्ये व्यापक जनसहभागावर भर राज्यस्तरीय या मोहिमेची नंदुरबार जिल्हा व नगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, सुलभ समन्वय आणि विविध विभागांचा एकसंघ सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, यांनी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती तसेच नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, नागरी सुविधा केंद्रे आणि शासकीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअॅप क्यूआर कोड असलेले होर्डिंग्ज लावण्यात येणार असून, डिजिटल स्क्रीन, सोशल मीडिया तसेच अन्य प्रचारमाध्यमांत या डिजिटल मंचाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल जतन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण; ‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण; जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती नंदुरबार, : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा (UNESCO) अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील 35 हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअॅप व ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाच्या या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तिकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या डिजिटल अभियानात सहभागी होऊन आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ (Digital Cultural Preserver Certificate) देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या परंपरा जतन करण्यासोबतच नागरिकांचा या सांस्कृतिक लोकचळवळीत सक्रिय सहभाग वाढणार आहे. नंदुरबारमध्ये व्यापक जनसहभागावर भर राज्यस्तरीय या मोहिमेची नंदुरबार जिल्हा व नगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, सुलभ समन्वय आणि विविध विभागांचा एकसंघ सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, यांनी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती तसेच नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, नागरी सुविधा केंद्रे आणि शासकीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअॅप क्यूआर कोड असलेले होर्डिंग्ज लावण्यात येणार असून, डिजिटल स्क्रीन, सोशल मीडिया तसेच अन्य प्रचारमाध्यमांत या डिजिटल मंचाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल जतन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
- "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" नवापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने टॉयलेट (शौचालय) बांधले खरे, परंतु ते वापरण्यायोग्य नसल्याने अथवा त्याला नेहमी कुलूप ठोकलेले असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरील या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, ऐन प्रवासाच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांची तुफान ससेहोलपट होत आहे. कुलूपबंद सुविधा, प्रवाशांची अडचण: नवापूर स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वर बनवण्यात आलेले स्वच्छतागृह नेहमी कुलूपबंद स्थितीत पहायला मिळते. 'टॉयलेट असूनही वापरता येत नाही' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महिला व वृद्धांना मोठा मनस्ताप: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना, लहान मुलांना आणि वयोवृद्धांना प्रातर्विधी व स्वच्छतेसाठी कुठे जावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे महिलांना प्रचंड संकोच आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा फज्जा आणि दुर्गंधी: एका बाजूला टॉयलेटला कुलूप असल्याने परिसर अस्वच्छ राहतो, तर दुसऱ्या बाजूला उघड्यावर जाण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय उरत नाही, ज्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरत आहे. प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष: प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तोंडी तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. "अशा सुविधा जर बंदच ठेवायच्या असतील तर त्या बांधल्या कशासाठी?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांची मागणी: नवापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि ३ वरील कुलूपबंद टॉयलेट्स तात्काळ उघडून ते स्वच्छ व वापरायोग्य करण्यात यावेत. प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.3
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.1
- लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुक्यातील लाडगाव–हट्टी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गावरील फरशी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. पुलाची झालेली झीज पाहता हा पूल ‘आज मरू की उद्या?’ अशा अवस्थेत पोहोचला असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, फरशी पुलाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, पुलावरून पाणी वाहत असताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाचा वापर परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र रस्त्याची आणि पुलाची अवस्था पाहता प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून फरशी पुलाची दुरुस्ती अथवा आवश्यक ठिकाणी नव्याने बांधकाम करावे, तसेच रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.1
- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.1