विकास सोसायटीचे सचिव सुनील गायकवाड 'उत्कृष्ट सचिव' पुरस्काराने सन्मानित भोर - प्रतिनिधी देशातील आग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या, भोर तालुक्यातील भोलावडे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव सुनील गायकवाड यांना सन २०२५ - २६ च्या 'उत्कृष्ट सचिव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सचिव सुनील गायकवाड हे भोलावडे, वेनवडी आणि हातनोशी (ता.भोर) या तिन्ही विकास संस्थांचा कारभार पाहतात. या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून जवळपास १३३५ सभासदांना विविध सेवा व लाभ मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सुनील गायकवाड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल सहकार क्षेत्रातून आणि विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
विकास सोसायटीचे सचिव सुनील गायकवाड 'उत्कृष्ट सचिव' पुरस्काराने सन्मानित भोर - प्रतिनिधी देशातील आग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या, भोर तालुक्यातील भोलावडे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव सुनील गायकवाड यांना सन २०२५ - २६ च्या 'उत्कृष्ट सचिव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सचिव सुनील गायकवाड हे भोलावडे, वेनवडी आणि हातनोशी (ता.भोर) या तिन्ही विकास संस्थांचा कारभार पाहतात. या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून जवळपास १३३५ सभासदांना विविध सेवा व लाभ मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सुनील गायकवाड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल सहकार क्षेत्रातून आणि विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले विक्रम शिंदे /भोर दि. 31 भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1