शेगांवात दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच..! शेगांवात दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! पारीजात नगरातील घटना; सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेगाव | प्रतिनिधी शेगाव शहरातील पारीजात नगर, एसबीआय कॉलनी परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ₹५८ हजारांचा मौल्यवान ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप रामदास परळीकर (वय ५८) हे ३० जुलै २०२६ रोजी दुपारी पत्नीसमवेत खामगाव येथे मित्राच्या घरी गेले होते. घर आणि कंपाऊंड गेटला कुलूप लावून ते बाहेर पडले. मात्र, सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाज्याचे तसेच ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करताच संपूर्ण घर अस्ताव्यस्त झाल्याचे आणि लोखंडी कपाटासह लॉकर फोडल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता सुमारे ५० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३.५ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, चांदीच्या तोरड्यांची जोडी, चांदीचे दोन करंडे, गणपतीची चांदीची मूर्ती, ₹६ हजारांची रोकड तसेच टायटन कंपनीची दोन घड्याळे, असा एकूण ₹५८ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३१(३) अन्वये शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे पुढील तपास करीत आहेत. शेगाव शहरात वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. बंद घरे चोरट्यांसाठी सहज लक्ष्य ठरत असतील, तर गस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि संशयितांवर प्रभावी नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही घर दीर्घकाळ बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही बसविणे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन अशा गुन्ह्यांना आळा घालण्याची अपेक्षा आता शेगावकर व्यक्त करत आहेत.
शेगांवात दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच..! शेगांवात दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! पारीजात नगरातील घटना; सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेगाव | प्रतिनिधी शेगाव शहरातील पारीजात नगर, एसबीआय कॉलनी परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ₹५८ हजारांचा मौल्यवान ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप रामदास परळीकर (वय ५८) हे ३० जुलै २०२६ रोजी दुपारी पत्नीसमवेत खामगाव येथे मित्राच्या घरी गेले होते. घर आणि कंपाऊंड गेटला कुलूप लावून ते बाहेर पडले. मात्र, सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाज्याचे तसेच ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करताच संपूर्ण घर अस्ताव्यस्त झाल्याचे आणि लोखंडी कपाटासह लॉकर फोडल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता सुमारे ५० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३.५ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, चांदीच्या तोरड्यांची जोडी, चांदीचे दोन करंडे, गणपतीची चांदीची मूर्ती, ₹६ हजारांची रोकड तसेच टायटन कंपनीची दोन घड्याळे, असा एकूण ₹५८ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३१(३) अन्वये शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे पुढील तपास करीत आहेत. शेगाव शहरात वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. बंद घरे चोरट्यांसाठी सहज लक्ष्य ठरत असतील, तर गस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि संशयितांवर प्रभावी नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही घर दीर्घकाळ बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही बसविणे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन अशा गुन्ह्यांना आळा घालण्याची अपेक्षा आता शेगावकर व्यक्त करत आहेत.
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- बारिश में मौत बनकर खड़ा जर्जर बिजली का पोल, शिकायत के बाद भी नहीं जागा बिजली विभाग बार्शिटाकली | प्रतिनिधि बार्शिटाकली तहसील के दोनद बु. गांव में बिजली विभाग की गंभीर लापरवाही सामने आई है। गांव में लगा एक बिजली का पोल नीचे से पूरी तरह सड़ चुका है। लगातार हो रही बारिश और तेज़ हवाओं के चलते यह पोल कभी भी गिर सकता है, जिससे बड़ा हादसा होने की आशंका जताई जा रही है। गांव निवासी गणेश नागे ने इस खतरनाक स्थिति की शिकायत बिजली विभाग से कर तत्काल नया पोल लगाने की मांग की है। बावजूद इसके अब तक विभाग की ओर से कोई कार्रवाई नहीं की गई है। इससे ग्रामीणों में नाराजगी के साथ-साथ भय का माहौल भी बना हुआ है। ग्रामीणों का कहना है कि जर्जर पोल के आसपास से प्रतिदिन स्कूली बच्चे, किसान और अन्य राहगीर गुजरते हैं। यदि समय रहते इसे नहीं बदला गया तो किसी भी क्षण जनहानि हो सकती है। ग्रामीणों ने बिजली विभाग से तत्काल जर्जर पोल बदलने की मांग की है। अब देखना यह होगा कि विभाग समय रहते कार्रवाई करता है या फिर किसी बड़े हादसे के बाद ही जिम्मेदारों की नींद खुलेगी1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- खिरोडा नजीक भीषण अपघात; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींचे प्राण वाचले..! खिरोडा नजीक भीषण अपघात; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींचे प्राण वाचले! वेळीच धावले मदतीला; गंभीर जखमींना अकोल्यात हलवले, पोलिसांचा तपास सुरू शेगाव | प्रतिनिधी शेगाव–वरवट मार्गावरील खिरोडा गावाजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना पाहताच खिरोडा येथील तरुणांनी मानवतेचा परिचय देत क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचण्याची आशा निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच दादा ठाकूर, गणेश हिवराळे, नवलसिंग पवार, आकाश दंगे, पवन हिवराळे, विश्वजित हिवराळे, निलेश तायडे आणि आदित्य हिवराळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. कोणत्याही प्रकारची वाट न पाहता त्यांनी तातडीने सहृदयी मोटे उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अपघातातील जखमी ज्ञानेश्वर विठ्ठल आमझरे व त्यांच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिली. दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई सुरू आहे. "अपघाताच्या क्षणी माणुसकीच सर्वात मोठी ठरते; खिरोडा ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद आहे."1