logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. यासह मार्टी संस्थेच्या कामास गती देण्यापासून भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावण्यापर्यंत एकूण १२ प्रलंबित मागण्या त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. विभागातील ही पदे अनेक वर्षे रिक्त असल्याने योजना राबवण्यात अडथळा येत असल्याचे आमदार शेख यांनी निदर्शनास आणले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुस्लीम आमदारांची बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. त्यांनी १९७८ क्रमांकांच्या लक्षवेधी सूचनेच्या कार्यवाहीबाबत सोमवारी मुस्लीम आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, विभागातील ४०६ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत, तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील ३६ आणि जिल्हा कार्यालयातील ८५ नवी पदेही अजून भरलेली नाहीत. त्यांनी अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (मार्टी) कामकाज सुरळीत करण्यावर, भिवंडीतील उर्दू घराचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यावर आणि लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरू करण्यावर भर दिला. याशिवाय, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी, उर्दू साहित्य अकादमीच्या अधीक्षक व कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार देण्याची आणि कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब मार्गी लावण्याची मागणीही आमदार शेख यांनी केली. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचे काम देऊनही चार वर्षांपासून कार्यारंभ दिलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आमदार शेख यांच्या १ जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रात दिवंगत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला होता, तरी त्यांची अपुरी राहिलेली कामे आपण मार्गी लावावीत, अशी विनंती केली आहे. या सर्व बाबी मुस्लीम समाजाच्या विकासाशी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आमदार शेख यांनी अधोरेखित केले.

12 hrs ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
12 hrs ago

समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. यासह मार्टी संस्थेच्या कामास गती देण्यापासून भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावण्यापर्यंत एकूण १२ प्रलंबित मागण्या त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. विभागातील ही पदे अनेक वर्षे रिक्त असल्याने योजना राबवण्यात अडथळा येत असल्याचे आमदार शेख यांनी निदर्शनास आणले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुस्लीम आमदारांची बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. त्यांनी १९७८ क्रमांकांच्या लक्षवेधी सूचनेच्या कार्यवाहीबाबत सोमवारी मुस्लीम आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, विभागातील ४०६ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत, तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील ३६ आणि जिल्हा कार्यालयातील ८५ नवी पदेही अजून भरलेली नाहीत. त्यांनी अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (मार्टी) कामकाज सुरळीत करण्यावर, भिवंडीतील उर्दू घराचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यावर आणि लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरू करण्यावर भर दिला. याशिवाय, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी, उर्दू साहित्य अकादमीच्या अधीक्षक व कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार देण्याची आणि कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब मार्गी लावण्याची मागणीही आमदार शेख यांनी केली. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचे काम देऊनही चार वर्षांपासून कार्यारंभ दिलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आमदार शेख यांच्या १ जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रात दिवंगत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला होता, तरी त्यांची अपुरी राहिलेली कामे आपण मार्गी लावावीत, अशी विनंती केली आहे. या सर्व बाबी मुस्लीम समाजाच्या विकासाशी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आमदार शेख यांनी अधोरेखित केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा येथून साकिब दाते यांनी सरकारला जोरदार ललकार दिली आहे, ज्यात त्यांनी नशेचे सेवन करणाऱ्यांना नव्हे, तर नशेच्या विक्रेत्यांना पकडण्याची मागणी केली आहे. दाते यांनी मुंब्रामध्ये नशा पूर्णपणे बंद करण्याची सरकारकडे आग्रही विनंती केली आहे. जनतेच्या वतीने करण्यात आलेली ही मागणी नशेच्या विरोधात एक स्पष्ट भूमिका मांडते.
    1
    मुंब्रा येथून साकिब दाते यांनी सरकारला जोरदार ललकार दिली आहे, ज्यात त्यांनी नशेचे सेवन करणाऱ्यांना नव्हे, तर नशेच्या विक्रेत्यांना पकडण्याची मागणी केली आहे. दाते यांनी मुंब्रामध्ये नशा पूर्णपणे बंद करण्याची सरकारकडे आग्रही विनंती केली आहे. जनतेच्या वतीने करण्यात आलेली ही मागणी नशेच्या विरोधात एक स्पष्ट भूमिका मांडते.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    17 min ago
  • कल्याण पोलिसांच्या विशेष पथकाने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत, रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण याच्यासह संपूर्ण टोळीला अटक केली आहे. कल्याण पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ३२ कोटींहून अधिक किमतीच्या ब्राउन शुगरसह अमजद पठाण आणि इतर ५ जणांना अटक केली आहे. या टोळीने मुंबई, कल्याण आणि नाशिक यांसारख्या शहरांमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट पसरवले होते.
    1
    कल्याण पोलिसांच्या विशेष पथकाने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत, रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण याच्यासह संपूर्ण टोळीला अटक केली आहे. कल्याण पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ३२ कोटींहून अधिक किमतीच्या ब्राउन शुगरसह अमजद पठाण आणि इतर ५ जणांना अटक केली आहे.

या टोळीने मुंबई, कल्याण आणि नाशिक यांसारख्या शहरांमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट पसरवले होते.
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    1 hr ago
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक गोपाळगड किल्ला अक्षरशः विकला गेल्याचा आरोप करत शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा किल्ला, ज्याला शिवभक्त देवाचे मंदिर मानतात, तो विकला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या किल्ल्यात आमराई झाल्याचे सांगितले जात आहे. सरकारने गोपाळगड किल्ल्याला 'महाराष्ट्र हेरिटेज' कधी घोषित करणार आणि त्याची देखरेख कधी करणार, की तो आंब्याची बाग म्हणूनच राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन सरकारने 1960 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला विकला होता. सध्या आचार संहिता संपल्यावर यावर सरकार लक्ष देईल, असे सांगितले जात असले तरी, शिवभक्तांनी याबाबत आवाज उचलण्याची आणि जागे होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
    1
    छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक गोपाळगड किल्ला अक्षरशः विकला गेल्याचा आरोप करत शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा किल्ला, ज्याला शिवभक्त देवाचे मंदिर मानतात, तो विकला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या किल्ल्यात आमराई झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारने गोपाळगड किल्ल्याला 'महाराष्ट्र हेरिटेज' कधी घोषित करणार आणि त्याची देखरेख कधी करणार, की तो आंब्याची बाग म्हणूनच राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन सरकारने 1960 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला विकला होता. सध्या आचार संहिता संपल्यावर यावर सरकार लक्ष देईल, असे सांगितले जात असले तरी, शिवभक्तांनी याबाबत आवाज उचलण्याची आणि जागे होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्या टी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रविवारी (दिनांक ३१ मे २०३६) मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत अमर नगर, खिंडीपाडा येथील १५० रहिवासी आणि वाणिज्यिक अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. हा गोरेगाव-मुलुंड लिंक रस्ता १२.२० किमी लांबीचा असून, त्याचे काम रस्ता, भूमिगत बोगदा आणि उड्डाणपूल अशा चार टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. टी विभागाच्या हद्दीतील अमर नगर, खिंडीपाडा येथील एकूण सुमारे ३८४ बांधकामे या जोडमार्गाच्या उभारणीत बाधित ठरणारी होती. त्यापैकी १५० बांधकामे निष्कासित करण्यात आली असून, उर्वरीत २३४ अनधिकृत बांधकामे पुढील आठवड्यात हटवली जाणार आहेत. उपायुक्त (परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त 'टी' विभाग यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. महापालिकेचे १० अभियंते आणि १०० कर्मचारी यांनी २ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र व १० डंपर यांच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटवली. सुरक्षेसाठी मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली ५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
    1
    मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्या टी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रविवारी (दिनांक ३१ मे २०३६) मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत अमर नगर, खिंडीपाडा येथील १५० रहिवासी आणि वाणिज्यिक अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.

हा गोरेगाव-मुलुंड लिंक रस्ता १२.२० किमी लांबीचा असून, त्याचे काम रस्ता, भूमिगत बोगदा आणि उड्डाणपूल अशा चार टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. टी विभागाच्या हद्दीतील अमर नगर, खिंडीपाडा येथील एकूण सुमारे ३८४ बांधकामे या जोडमार्गाच्या उभारणीत बाधित ठरणारी होती. त्यापैकी १५० बांधकामे निष्कासित करण्यात आली असून, उर्वरीत २३४ अनधिकृत बांधकामे पुढील आठवड्यात हटवली जाणार आहेत.

उपायुक्त (परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त 'टी' विभाग यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. महापालिकेचे १० अभियंते आणि १०० कर्मचारी यांनी २ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र व १० डंपर यांच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटवली. सुरक्षेसाठी मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली ५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
    user_Amit Omprakash tiwari
    Amit Omprakash tiwari
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • प्रत्येक मनुष्याने गीतेचे नक्कीच अध्ययन केले पाहिजे.
    2
    प्रत्येक मनुष्याने गीतेचे नक्कीच अध्ययन केले पाहिजे.
    user_Ajay s choudhary patrakaa
    Ajay s choudhary patrakaa
    Salesperson मुंबई, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • साकिब दाते यांनी मुंब्रामध्ये नशेच्या सौदागरांविरोधात एक मोहिम उघडली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंब्रामधील नशेच्या सौदागरांची आता खैर नाही. साकिब दाते यांनी प्रशासनासोबत मिळून या नशेच्या सौदागरांचा पूर्णपणे नायनाट करणार असल्याची घोषणा केली आहे.
    1
    साकिब दाते यांनी मुंब्रामध्ये नशेच्या सौदागरांविरोधात एक मोहिम उघडली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंब्रामधील नशेच्या सौदागरांची आता खैर नाही. साकिब दाते यांनी प्रशासनासोबत मिळून या नशेच्या सौदागरांचा पूर्णपणे नायनाट करणार असल्याची घोषणा केली आहे.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पनवेलमधील PWD कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका CNG गाडीला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. बघता बघता हे वाहन पूर्णपणे आगीच्या गोळ्यात बदलले, ज्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
    1
    पनवेलमधील PWD कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका CNG गाडीला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. बघता बघता हे वाहन पूर्णपणे आगीच्या गोळ्यात बदलले, ज्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.