पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी
बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील
कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,
अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.4
- महाराष्ट्रातील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून खूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हे थक्क करणारे दृश्य समोर आल्यानंतर, एवढ्या मोठ्या संख्येने सिलेंडर पाण्यात वाहून जाण्यामागचे नेमके काय कारण असू शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी वीटभट्टी मजूर सविता रावते यांना आरोग्य यंत्रणेच्या कथित निष्काळजीपणामुळे आपले बाळ गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र विधान परिषदेत गाजली. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी हा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारला जाब विचारला. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आरोप केला की, २२ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर आरोग्य विभागाने पूर्णपणे संवेदनाहीन भूमिका घेतली होती. केवळ लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रशासन जागे झाले. तसेच, गर्भधारणेदरम्यान आवश्यक सोनोग्राफी न करणे, आधार कार्डाचे कारण देऊन संदर्भ चिठ्ठी नाकारणे, माता-बालक सुरक्षा कार्डावरील नोंदींबाबत त्रुटी आणि फेटल डॉप्लर उपलब्ध असूनही त्याचा वापर न करणे, अशा गंभीर बाबींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मृत बालकाच्या कुटुंबीयांवर विविध मार्गांनी दबाव आणून त्यांच्याकडून सकारात्मक जबाब घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित आशा सेविकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. या संपूर्ण प्रकरणात पीडित कुटुंबाला भेट देऊन पाठपुरावा करणाऱ्या 'भूमिपुत्र एल्गार संघटने'चे अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेखही चित्रा किशोर वाघ यांनी केला. प्रमोद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना केवळ कारवाई हाच उद्देश नसून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या प्रकरणामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य सेवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता चौकशीनंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- पालघर तालुक्यातील कुडण गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे आणि कल्पेश अशोक म्हात्रे यांच्या शेतातील सुमारे ८०० ते ९०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून आंबा, फणस, शेवगा आणि नारळ या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत तारापूर विभागाचे (पालघर) सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर यांनीही नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. मात्र, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर स्थानिक सदस्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी तीव्र नाराजी आणि तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.1
- ठाण्यातील मुंब्रा अमृत नगर भागात डिवाइडर तोडल्याच्या प्रकारानंतर एमआयएम (MIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख चांगल्याच संतापल्या आहेत. या घटनेवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, त्यांनी या प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आणि काय म्हटले आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- वापीमध्ये एक १ BHK रूम विक्रीसाठी उपलब्ध आहे. या रूमचे ठिकाण वापी रेल्वे स्टेशन आणि बुलेट ट्रेन स्टेशनपासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर आहे. उत्तम हवा-उजेड असणाऱ्या या रूममध्ये बाल्कनीची सुविधा देखील उपलब्ध आहे.1
- ठाण्यातील खडी मशीन रोडवर कोसळलेल्या एका भिंतीचा ढिगारा अद्याप न हटवण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्यावर पडलेला हा ढिगारा न हटवला गेल्याने लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम आणि गुजरात व दादरा-नगर हवेलीच्या सीमेलगत असलेल्या रुईघर-बोपदरी गावात गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पाऊस थांबल्यानंतरही अद्याप पूर्ववत करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीज नसल्यामुळे गावातील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मोबाईल चार्जिंग, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि घरगुती कामांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने आणि महावितरणने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती पथक पाठवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आता संपूर्ण गाव वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहत असून प्रशासनाच्या आगामी कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1