logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक....सिन्नरफाट्यावर पिस्टलसह सराईत गुन्हेगार जेरबंद आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना, बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या नाशिकरोड गुन्हेशोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. सिन्नरफाटा परिसरात दबा धरून बसलेल्या या संशयिताचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (कट्टा), मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारत उर्फ सोनू मनोहर चावरे (३४, रा. नंदावन नगर, पिंपळगाव नजीक, ता. निफाड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्रांचा वापर आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक गस्त घालत होते. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक इसम सिन्नरफाटा परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हेशोध पथकाने सिन्नरफाटा परिसरात साध्या वेषात सापळा रचला. दरम्यान, संशयित हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी घेरण्याचा प्रयत्न केला असता, तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. मात्र, पथकातील अंमलदारांनी अत्यंत शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले. त्याची अंगझडती घेतली असता ३१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. अटक करण्यात आलेला आरोपी भारत उर्फ सोनू चावरे हा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात (गु.र.नं. ४८५/२०२५) गेल्या काही दिवसांपासून फरार होता. आगामी सण-उत्सवाच्या काळात तो नाशिकमध्ये शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भामरे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन भामरे, विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे आणि दीपक दिवटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

48 min ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
48 min ago
efaaa545-e496-4a30-9a2a-184e4e608573

नाशिक....सिन्नरफाट्यावर पिस्टलसह सराईत गुन्हेगार जेरबंद आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना, बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या नाशिकरोड गुन्हेशोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. सिन्नरफाटा परिसरात दबा धरून बसलेल्या या संशयिताचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (कट्टा), मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारत उर्फ सोनू मनोहर चावरे (३४, रा. नंदावन नगर, पिंपळगाव नजीक, ता. निफाड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्रांचा वापर आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक गस्त घालत होते. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक इसम सिन्नरफाटा परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हेशोध पथकाने सिन्नरफाटा परिसरात साध्या वेषात सापळा रचला. दरम्यान, संशयित हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी घेरण्याचा प्रयत्न केला असता, तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. मात्र, पथकातील अंमलदारांनी अत्यंत शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले. त्याची अंगझडती घेतली असता ३१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. अटक करण्यात आलेला आरोपी भारत उर्फ सोनू चावरे हा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात (गु.र.नं. ४८५/२०२५) गेल्या काही दिवसांपासून फरार होता. आगामी सण-उत्सवाच्या काळात तो नाशिकमध्ये शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भामरे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन भामरे, विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे आणि दीपक दिवटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दर्शवला असून कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
    4
    १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा
इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा  दर्शवला असून 
कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती.
दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला 
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    33 min ago
  • नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान दिव्य भारत बीएसएम न्यूज काठमांडू, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण अचानक पुरामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तिबेटच्या सीमेलगत असलेल्या रासुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. पुराच्या पाण्याने पूल, रस्ते, वाहने, घरे आणि विविध पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने बदलत आहे. दरम्यान, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती नेपाळ पर्यटन मंडळाने दिली आहे. भोटेकोशी नदीला अचानक महापूर बुधवारी सकाळच्या सुमारास तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने भोटेकोशी नदीचे पात्र धोकादायकरीत्या फुगले. काही क्षणांतच पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर जलमय झाला. रासुवा जिल्ह्यातील रसुवागढी, तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. पुराचा प्रभाव नुवाकोट, धादिंग आणि इतर परिसरांपर्यंत जाणवला. पुराच्या वेगामुळे अनेक वाहने, पूल आणि रस्ते पाण्यात वाहून गेले. काही ठिकाणी चिखल आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. १०५ भारतीय बेपत्ता या आपत्तीमुळे भारतातून नेपाळमार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक यादीनुसार ३८४ प्रवासी बेपत्ता असून त्यात २९१ विदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिक आहेत. विदेशी नागरिकांमध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे. बेपत्ता भारतीयांपैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. काही प्रवासी मार्गातील विविध ठिकाणी अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेची पडताळणी सुरू आहे. पर्यटन संस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस, मार्गदर्शक आणि ट्रॅव्हल एजन्सी यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पुरानंतर सुरुवातीला काही मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, ढिगारा, चिखल, वाहून गेलेली वाहने आणि संपर्क तुटलेले भाग यामुळे मृतांची आणि बेपत्तांची अचूक संख्या निश्चित करण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. दिवसभरात विविध वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा वेगवेगळा दिला असून काही ताज्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा ९५ पर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असून मृतांचा अंतिम आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूल आणि रस्ते वाहून गेले पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अनेक ठिकाणी मजबूत पूलही वाहून गेले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड-माती साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीमावर्ती भागातील संपर्क व्यवस्था प्रभावित झाल्याने बेपत्ता प्रवाशांशी संपर्क साधणे कठीण बनले आहे. पुरामुळे अनेक जलविद्युत प्रकल्प आणि वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांनाही मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भूस्खलन आणि हिमालयीन आपत्तीचा धोका या महापुरामागे तिबेट-नेपाळ सीमावर्ती भागातील भूस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित घटना कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक उपग्रह विश्लेषणात सीमेजवळील अस्थिर डोंगररचनेतून मोठ्या प्रमाणावर खडक-माती घसरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होऊन त्यानंतर प्रचंड पाण्याचा लोंढा खालील भागाकडे आला असण्याची शक्यता आहे. हिमालयीन भागात पावसाळ्यात भूस्खलन, ढगफुटी, हिमनदीतील बदल आणि अचानक पूर यांचा धोका कायम असतो. त्यामुळे या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पर्वतीय भागातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वसूचना यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर आपत्तीग्रस्त भागात नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खराब हवामान, चिखल, तुटलेले रस्ते आणि वाहून गेलेले पूल यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भारताकडूनही नेपाळमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदत आणि माहिती मिळविण्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्याचे वृत्त आहे. कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण १०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंबे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपर्क यंत्रणा खंडित झाल्याने काही प्रवाशांची माहिती तातडीने मिळत नसल्याचे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांची यादी सातत्याने तपासली जात असून सुरक्षित असलेल्या प्रवाशांची माहिती उपलब्ध होताच ती संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती अद्याप गंभीर नेपाळमधील या भीषण पुरामुळे हिमालयीन प्रदेशातील आपत्तीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी, शेकडो प्रवासी बेपत्ता होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान यामुळे नेपाळसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. १०५ भारतीय नागरिकांसह ३८४ प्रवाशांचा शोध लागणे आणि त्यांची सुरक्षितता निश्चित होणे ही सध्या सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. परिस्थिती वेगाने बदलत असल्याने मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत पुढील काही तासांत बदल होण्याची शक्यता आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी काठमांडू
    2
    नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता
तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान
नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता
तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
काठमांडू, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण अचानक पुरामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तिबेटच्या सीमेलगत असलेल्या रासुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. पुराच्या पाण्याने पूल, रस्ते, वाहने, घरे आणि विविध पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने बदलत आहे. दरम्यान, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती नेपाळ पर्यटन मंडळाने दिली आहे.
भोटेकोशी नदीला अचानक महापूर
बुधवारी सकाळच्या सुमारास तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने भोटेकोशी नदीचे पात्र धोकादायकरीत्या फुगले. काही क्षणांतच पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर जलमय झाला. रासुवा जिल्ह्यातील रसुवागढी, तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. पुराचा प्रभाव नुवाकोट, धादिंग आणि इतर परिसरांपर्यंत जाणवला.
पुराच्या वेगामुळे अनेक वाहने, पूल आणि रस्ते पाण्यात वाहून गेले. काही ठिकाणी चिखल आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
१०५ भारतीय बेपत्ता
या आपत्तीमुळे भारतातून नेपाळमार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक यादीनुसार ३८४ प्रवासी बेपत्ता असून त्यात २९१ विदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिक आहेत. विदेशी नागरिकांमध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे.
बेपत्ता भारतीयांपैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. काही प्रवासी मार्गातील विविध ठिकाणी अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेची पडताळणी सुरू आहे. पर्यटन संस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस, मार्गदर्शक आणि ट्रॅव्हल एजन्सी यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
पुरानंतर सुरुवातीला काही मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, ढिगारा, चिखल, वाहून गेलेली वाहने आणि संपर्क तुटलेले भाग यामुळे मृतांची आणि बेपत्तांची अचूक संख्या निश्चित करण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. दिवसभरात विविध वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा वेगवेगळा दिला असून काही ताज्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा ९५ पर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असून मृतांचा अंतिम आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूल आणि रस्ते वाहून गेले
पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अनेक ठिकाणी मजबूत पूलही वाहून गेले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड-माती साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीमावर्ती भागातील संपर्क व्यवस्था प्रभावित झाल्याने बेपत्ता प्रवाशांशी संपर्क साधणे कठीण बनले आहे.
पुरामुळे अनेक जलविद्युत प्रकल्प आणि वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांनाही मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
भूस्खलन आणि हिमालयीन आपत्तीचा धोका
या महापुरामागे तिबेट-नेपाळ सीमावर्ती भागातील भूस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित घटना कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक उपग्रह विश्लेषणात सीमेजवळील अस्थिर डोंगररचनेतून मोठ्या प्रमाणावर खडक-माती घसरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होऊन त्यानंतर प्रचंड पाण्याचा लोंढा खालील भागाकडे आला असण्याची शक्यता आहे.
हिमालयीन भागात पावसाळ्यात भूस्खलन, ढगफुटी, हिमनदीतील बदल आणि अचानक पूर यांचा धोका कायम असतो. त्यामुळे या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पर्वतीय भागातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वसूचना यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर
आपत्तीग्रस्त भागात नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खराब हवामान, चिखल, तुटलेले रस्ते आणि वाहून गेलेले पूल यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
भारताकडूनही नेपाळमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदत आणि माहिती मिळविण्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्याचे वृत्त आहे.
कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण
१०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंबे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपर्क यंत्रणा खंडित झाल्याने काही प्रवाशांची माहिती तातडीने मिळत नसल्याचे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांची यादी सातत्याने तपासली जात असून सुरक्षित असलेल्या प्रवाशांची माहिती उपलब्ध होताच ती संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परिस्थिती अद्याप गंभीर
नेपाळमधील या भीषण पुरामुळे हिमालयीन प्रदेशातील आपत्तीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी, शेकडो प्रवासी बेपत्ता होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान यामुळे नेपाळसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, बचावकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. १०५ भारतीय नागरिकांसह ३८४ प्रवाशांचा शोध लागणे आणि त्यांची सुरक्षितता निश्चित होणे ही सध्या सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. परिस्थिती वेगाने बदलत असल्याने मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत पुढील काही तासांत बदल होण्याची शक्यता आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
प्रतिनिधी काठमांडू
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्-आयुक्त शेखर सिंह यांची पत्रकार परिषदेत माहिती *नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील. 29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन २९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील. दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल. भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले. आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत आणि विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची एक चांगली संधी आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसांचा आनंद घ्यावा.” कार्यक्रमाच्या पावित्र्याला सहकार्य करण्याचे आवाहन शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कार्यक्रमस्थळी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्थळ : ठक्कर डोम, नाशिक कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६ प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही “सिंहस्थ महाकुंभ मेळा"च्या तयारीमध्ये पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवाला देखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे.” - शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण.
    1
    नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्-आयुक्त शेखर सिंह यांची पत्रकार परिषदेत माहिती
*नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील.
29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन
२९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल.
पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील.
दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल.
भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत
महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.
वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन
महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले. 
आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत आणि विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची एक चांगली संधी आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसांचा आनंद घ्यावा.”
कार्यक्रमाच्या पावित्र्याला सहकार्य करण्याचे आवाहन
शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कार्यक्रमस्थळी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : ठक्कर डोम, नाशिक
कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६
प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही
“सिंहस्थ महाकुंभ मेळा"च्या तयारीमध्ये पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवाला देखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे.”
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रतिनिधी समाधान शिरसाठ मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
    2
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी समाधान शिरसाठ 
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. 
नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये  ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य 
डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    2
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    1
    शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी; खासदार भास्कर भगरे यांचा पाठिंबा विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांची विचारपूस केली. अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या आणि घडलेल्या इतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, निष्पाप मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, तर सध्या उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० आणि सुधारित १४ ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णय रद्द करावेत, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असून, शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी गोल्फ क्लब मैदानावरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई व्हावी यासाठी आगामी काळात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले. पाचव्या दिवशीही विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असल्याने आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    4
    आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी; 

खासदार भास्कर भगरे यांचा पाठिंबा
विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या आणि घडलेल्या इतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, निष्पाप मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, तर सध्या उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ५ ऑगस्ट २०२० आणि सुधारित १४ ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णय रद्द करावेत, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असून, शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी गोल्फ क्लब मैदानावरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई व्हावी यासाठी आगामी काळात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले.
पाचव्या दिवशीही विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असल्याने आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    36 min ago
  • बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें। गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
    1
    बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है।
इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें।
S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है।
इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें।
S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.