Shuru
Apke Nagar Ki App…
राज्यातील मंदिर विश्वस्तांनी महसूलमंत्र्यांच्या बैठकीत 'देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला' तीव्र विरोध नोंदवला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत, विश्वस्तांनी आपल्या हरकती आणि सूचना मांडल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे आश्वासन दिले आहे.
लोक हिंद चॅनल
राज्यातील मंदिर विश्वस्तांनी महसूलमंत्र्यांच्या बैठकीत 'देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला' तीव्र विरोध नोंदवला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत, विश्वस्तांनी आपल्या हरकती आणि सूचना मांडल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे आश्वासन दिले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाचा मसुदा त्वरित रहित करावा, या मागणीसाठी २६ मे रोजी मुंबई मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अष्टविनायक मंदिरे, विदर्भ देवस्थान समिती, विविध प्रमुख मंदिरांचे विश्वस्त, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंदिर विश्वस्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच राज्यातील मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्याचे आणि प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याविषयी हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचेही आश्वासन मंत्र्यांनी दिले, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. या बैठकीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू रावकर, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. केशव विद्वांस, पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गद्रे आणि उपाध्यक्ष श्री. वैभव आपटे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, विदर्भ देवस्थान समिती संस्थापक अध्यक्ष श्री. अनुप जैस्वाल, अमरावती येथील श्री पिंगळाई माता देवस्थानचे श्री. विनोद पाखोडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांपुढे मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणे, मंदिरांचे पुजारी आणि विश्वस्त यांच्या सविस्तर अडचणी मांडल्या, तसेच प्रस्तावित कायद्यातील गंभीर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. मंदिर विश्वस्तांनी ‘मंदिरांच्या इनामी भूमीची विक्री करण्याऐवजी मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणे हटवण्याविषयी महाराष्ट्र सरकारने कार्यवाही करावी’, अशी मागणी केली, यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. महसूलमंत्र्यांनी या अधिनियमाविषयी अधिकाधिक विश्वस्तांना सूचना आणि हरकती नोंदवता याव्यात, यासाठी विभागीय आयुक्तांसह तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथेही घेण्याची सूचना देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र मंदिर महासंघाने हा प्रस्तावित कायदा रहित होईपर्यंत तीव्र विरोध कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. समस्त मंदिर विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाला ठाम विरोध असून, सरकारने हिंदुत्वाभिमुख असल्याने मंदिरांच्या हिताचा कायदा आणावा, अशी मागणी आहे. जोपर्यंत मंदिरांच्या इनामी भूमी विक्रीसाठीचा हा प्रस्तावित कायद्याचा मसुदा रहित केला जात नाही, तोपर्यंत विरोध कायम राहील, असे श्री. सुनील घनवट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी राज्यातील सर्व मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भाविक आणि समस्त नागरिकांना या अधिनियमाच्या विरोधात लवकरात लवकर सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे.3
- मिरा रोड येथील बकरा वादाचा दुसरा भाग समोर आला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या, डीसीपी राहुल चौहान आणि वारिस पठाण यांनी मोठी विधाने केली आहेत.1
- महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करत, 'झुरळ जनता पक्ष' आणि 'ढेकूण मोर्चा' यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात 'जनतेला दिलासा द्या, नाहीतर आमचा रोजगार संपेल!' अशी मागणी करण्यात आली आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांची झोप उडाली असून, या धक्क्याने विचार करून करून सर्वांचे रक्त आटले असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि EMI च्या ओझ्यामुळे माणसाचे रक्त ताणले जाऊन सुकून गेले आहे. महागाईने माणसाचे पूर्ण रक्त शोषून घेतल्यामुळे, ढेकणांसाठी जगण्याचा आधारच हिरावला गेला आहे. यामुळे ढेकणांचीही अवस्था बिकट झाली असून, त्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत, आता तरी चांगले दिवस यावेत अशी उपरोधिक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सर्वांना निरोगी, कुशल, मंगल आणि तणावमुक्त बनवण्यासाठी पावले उचलावीत, जेणेकरून ढेकणांनाही जगण्याचा आधार मिळेल, असे या निवेदनातून सुचवले जात आहे.1
- कल्याण फाटा परिसरात बकऱ्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर, इस्लामउद्दीन खान यांनी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली.1
- इदुल-अज़हाच्या पवित्र सणावर यकीन फाउंडेशनतर्फे कुर्बानीचे मांस वाटले जाणार आहे.1
- या वर्षी हज यात्रेकरूंचा प्रचंड मोठा जमाव (हुजूम) पाहायला मिळाला आहे. 2026 मध्येही इतक्याच मोठ्या संख्येने यात्रेकरूंची उपस्थिती अपेक्षित आहे.1
- मुंबईतील मीरा रोड येथील पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये ईद-उल-अजहाच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला आहे. काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सोसायटी परिसरात डुक्कर आणून आंदोलन केल्याचा आरोप स्थानिक मुस्लिम कुटुंबांनी केला आहे. स्थानिक मुस्लिम कुटुंबांनी दावा केला आहे की, हा प्रकार जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.1
- राज्यातील मंदिर विश्वस्तांनी महसूलमंत्र्यांच्या बैठकीत 'देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला' तीव्र विरोध नोंदवला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत, विश्वस्तांनी आपल्या हरकती आणि सूचना मांडल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे आश्वासन दिले आहे.1