Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात,बापलेकीचा घटनास्थळावरच मृत्यु यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील दोंघाचा हा घटनास्थळावरच मृत्यु झाला तर एक महिला ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. साखरा येथुन पांढरकवडा मार्गे आदीलाबाद येथे जात असलेली चारचाकी ट्रकवर आदळुन हा भीषण अपघात झाला.
विलास महल्ले
घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात,बापलेकीचा घटनास्थळावरच मृत्यु यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील दोंघाचा हा घटनास्थळावरच मृत्यु झाला तर एक महिला ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. साखरा येथुन पांढरकवडा मार्गे आदीलाबाद येथे जात असलेली चारचाकी ट्रकवर आदळुन हा भीषण अपघात झाला.
More news from India and nearby areas
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem1
- Post by Sharad Dayedar1
- चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात आल्या होत्या मात्र यावेळी त्यांचे वाहन प्रदूषणाच्या धुळीने माखल्या गेले. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे.1
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1