logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबावी यासाठी वन विभागाकडून वनपरिक्षेत्रातील सर्वच पानवटे दुरुस्त करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकले हिंगोली जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत अटत चालले आहेत, वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबावी यासाठी वन विभागाकडून वनपरिक्षेत्रातील सर्वच पानवटे दुरुस्त करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.. दरम्यान पानवट्यामध्ये पाणी टाकल्यानंतर वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबणार आहे.. तर संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पानवट्यामध्ये पाणी टाकण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे..

7 days ago
user_Balu Vitthal Jadhav
Balu Vitthal Jadhav
पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
7 days ago

वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबावी यासाठी वन विभागाकडून वनपरिक्षेत्रातील सर्वच पानवटे दुरुस्त करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकले हिंगोली जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत अटत चालले आहेत, वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबावी यासाठी वन विभागाकडून वनपरिक्षेत्रातील सर्वच पानवटे दुरुस्त करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.. दरम्यान पानवट्यामध्ये पाणी टाकल्यानंतर वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबणार आहे.. तर संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पानवट्यामध्ये पाणी टाकण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे..

  • user_Meenakshee Pawar
    Meenakshee Pawar
    कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र
    thank you 🙏🙏
    7 days ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन! नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे. 🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे: शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे. प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल. 📍 प्रदर्शनाचा तपशील: दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६. वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत. स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड. विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    4
    🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन!
नांदेड:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे.
🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे:
शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे.
प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल.
📍 प्रदर्शनाचा तपशील:
दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६.
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत.
स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड.
विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे.
नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
  • महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    1
    महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
  • निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
    1
    निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांनी 21 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 22 तारखेला संपूर्ण ‘गाव बंद’ ठेवण्याची हाकही देण्यात आली आहे. ⚠️ प्रशासनासमोर मोठे आव्हान ⚠️ नागरिकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे 👉 पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... जय शिवराय! 🚩 #Himayatnagar #ShivajiMaharaj #Andolan #GavBandh #BreakingNews Maharashtra Maratha Shivray NewsUpdate SocialMedia
    1
    हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
मात्र, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांनी 21 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 22 तारखेला संपूर्ण ‘गाव बंद’ ठेवण्याची हाकही देण्यात आली आहे.
⚠️ प्रशासनासमोर मोठे आव्हान
⚠️ नागरिकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे
👉 पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
जय शिवराय! 🚩
#Himayatnagar #ShivajiMaharaj #Andolan #GavBandh #BreakingNews Maharashtra Maratha Shivray NewsUpdate SocialMedia
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावात  शुक्रवारी झालेल्या  वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रबी पिके, भाजीपाला आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळासह विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पाऊस कोसळला. यामुळे अनेक शेतांतील पिके जमिनीवर आडवी झाली. यशवंत श्रोत्री यांच्या शेतातील पपई पिकाचे नुकसान झाले, तर श्याम श्रीहरी कदम यांच्या मक्याला व पपईला  फटका बसला. सुशील कदम व विजय कदम यांच्या शेतातील आंब्याच्या  झाडांवरील सुमारे ९० टक्के आंबे वाऱ्यामुळे गळून पडले.याशिवाय कांदा व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी वीजतारा तुटून खाली पडल्या. या जिवंत तारांचा धक्का लागून याकूब शहा यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान, वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने काही मार्ग तात्पुरते बंद झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    2
    दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावात  शुक्रवारी झालेल्या  वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रबी पिके, भाजीपाला आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वादळासह विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पाऊस कोसळला. यामुळे अनेक शेतांतील पिके जमिनीवर आडवी झाली. यशवंत श्रोत्री यांच्या शेतातील पपई पिकाचे नुकसान झाले, तर श्याम श्रीहरी कदम यांच्या मक्याला व पपईला  फटका बसला. सुशील कदम व विजय कदम यांच्या शेतातील आंब्याच्या  झाडांवरील सुमारे ९० टक्के आंबे वाऱ्यामुळे गळून पडले.याशिवाय कांदा व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी वीजतारा तुटून खाली पडल्या. या जिवंत तारांचा धक्का लागून याकूब शहा यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान, वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने काही मार्ग तात्पुरते बंद झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    1
    परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.