शासन निर्णयानुसार वाशीम नगर परिषद पीएम स्वनिधी सनियंत्रण समितीवर- डांगे वाशीम-पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) पुनर्चित योजनेची प्रभावी, पारदर्शक व उत्तरदायी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र. पीएम स्वनिधी-२०२५/प्र.क्र.४९१/नवि-अन्वये राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर पीएम स्वनिधी सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयातील तरतुदींनुसार वाशीम नगर परिषद पीएम स्वनिधी सनियंत्रण समितीवर मनिष (सुधीर) भास्करराव डांगे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत योजनेच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेणे, पात्र पथ विक्रेत्यांची नोंदणी व कर्जप्रकरणांचा पाठपुरावा करणे, लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच योजनेंतर्गत लाभ अधिकाधिक पात्र पथ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे. झालेल्या या नियुक्तीनंतर मनिष (सुधीर) भास्करराव डांगे यांनी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग तसेच वाशीम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक पात्र पथ विक्रेत्यापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये आणि पथ विक्रेत्यांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी समिती सदस्य म्हणून प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करणार आहे." शहरातील पथ विक्रेत्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शासनाच्या विविध स्वयंरोजगार योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
शासन निर्णयानुसार वाशीम नगर परिषद पीएम स्वनिधी सनियंत्रण समितीवर- डांगे वाशीम-पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) पुनर्चित योजनेची प्रभावी, पारदर्शक व उत्तरदायी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र. पीएम स्वनिधी-२०२५/प्र.क्र.४९१/नवि-अन्वये राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर पीएम स्वनिधी सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयातील तरतुदींनुसार वाशीम नगर परिषद पीएम स्वनिधी सनियंत्रण समितीवर मनिष (सुधीर) भास्करराव डांगे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत योजनेच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेणे, पात्र पथ विक्रेत्यांची नोंदणी व कर्जप्रकरणांचा पाठपुरावा करणे, लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच योजनेंतर्गत लाभ अधिकाधिक पात्र पथ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे. झालेल्या या नियुक्तीनंतर मनिष (सुधीर) भास्करराव डांगे यांनी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग तसेच वाशीम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक पात्र पथ विक्रेत्यापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये आणि पथ विक्रेत्यांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी समिती सदस्य म्हणून प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करणार आहे." शहरातील पथ विक्रेत्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शासनाच्या विविध स्वयंरोजगार योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम1