Shuru
Apke Nagar Ki App…
कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
Shiv Singh rajput dahiya journalist MP
कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Raghunath Aghao1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Mohsin ahmed khan1
- खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।2
- खामगाव : स्थानिक बर्डे प्लॉट परिसरातील जोशी लेआउटमध्ये लग्नात नाचण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाला आता वेग आला आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी आणले होते. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:४० च्या सुमारास बर्डे प्लॉटमधील जोशी लेआउटमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नात गाण्यावर नाचत असताना शोएब खान अमिन खान (वय २२, रा. बरकत किराणा जवळ) याचा शेख तालीब शेख रहमान (२२), फैजान खान बुढन खान (२५), मुज्जमील खान जमीन खान उर्फ आफताब (२२) आणि अकोला येथील एका आरोपीशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चौघांनी संगनमत करून शोएबवर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शोएबचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. २६ एप्रिल रोजी सायंकाळी वरवट बकाल येथून बर्डे प्लॉटमधील तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. २७ एप्रिल रोजी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अकोला येथील चौथा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी (जोशी लेआउट) आणले होते. प्रत्यक्ष घटना कशी घडली, हल्ल्यात नेमकी कोणती शस्त्रे वापरली गेली आणि गुन्ह्याचा घटनाक्रम काय होता, याचे चित्रीकरण आणि माहिती पोलिसांनी संकलित केली. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.1
- railway station Nariman Nagar1