Shuru
Apke Nagar Ki App…
पीर बाजार भाजी मंडी व भाजी वाली बाईचा पुतळा तसेच शहाणू दर्गा जाणारा रोड येथील अतिक्रम काढणे चालू मनपा ची धडक कारवाई छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे
Sushil Navkar
पीर बाजार भाजी मंडी व भाजी वाली बाईचा पुतळा तसेच शहाणू दर्गा जाणारा रोड येथील अतिक्रम काढणे चालू मनपा ची धडक कारवाई छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे
More news from Beed and nearby areas
- फूँक मारकर दिए को बुझा सकते हैं मगर अगरबत्ती को नहीं क्योंकि जो महकता है उसे कौन बुझा सकता है, और जो जलता है वो खुद बुझ जाता है1
- Post by Shravan Deore2
- श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!1
- बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!1
- पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे1
- घनसावंगी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती केंद्र गुंज बु. येथे इयत्ता पहिली वर्गाचा शाळा प्रवेशोत्सव मेळावा दि. 29 एप्रिल 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रवेशपात्र मुलांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पाऊलांचे ठसे घेऊन जतन करण्यात आले आहेत. या पूर्वतयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीसाठी 20 मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे. हा कार्यक्रम मुख्याध्यापक तौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी ताई, शा. व्य. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, माता पालक व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. दि. 1 मे 2026 रोजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मुलांच्या कलागुणांचा अविष्कार सोहळा पार पडणार आहे. तरी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..1
- Post by Mushraf Tadvi1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1
- लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1