Shuru
Apke Nagar Ki App…
येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
Sachin Dilip Wakhare
येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!1
- नाशिक रोड स्थानकावर अयोध्या कॅन्ट–मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेसला आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सेवेमुळे ८०० ते १००० रुपयांत भाविकांना अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. प्रभू श्री रामांच्या जन्मभूमी अयोध्या आणि वनवासभूमी नाशिक यांना जोडणारी ही रेल्वे सेवा श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा सेतू ठरणार आहे. या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.1
- अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।1
- खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.1
- गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1