परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर माधुरी सिरसट झाली सोलापूर ग्रामीण पोलिस दलात दाखल. मोहोळ :- वाळूज (ता. मोहोळ) येथील मनसे अध्यक्ष रामभाऊ बुद्रुक यांची कन्या माधुरी मयूर सिरसट हिची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात पोलीस शिपाई पदासाठी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. माधुरीच्या या उल्लेखनीय यशामुळे तिचे माहेर वाळूज तसेच सासर यावली या दोन्ही गावांमध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. माधुरीने आपले प्राथमिक शिक्षण १ ली ते १० वी वाळूज येथे पूर्ण केले. त्यानंतर नागनाथ कॉलेज, मोहोळ येथे माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे गरड कॉलेज, मोहोळ येथे BCA पदवी प्राप्त करून तिने उच्च शिक्षण पूर्ण केले. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे ती अवघ्या १५ वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतरही न खचता तिने शिक्षण आणि करिअरचा मार्ग ठामपणे निवडला. २०१८ साली यावली (ता .मोहोळ) येथील मयूर सिरसट यांच्याशी तिचा विवाह झाला. लग्नानंतरही तिने आपले स्वप्न जपले आणि २०२४ पासून पोलिस भरतीची तयारी सुरू केली. तिच्या या प्रवासात सिद्धनागेश करिअर अकॅडमीचे अजित जाधव सर, शौर्य क्लासेसचे रमेश काकडे सर तसेच दीपस्तंभ अभ्यासिकेच्या स्वाती शेटे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनासोबतच स्वतःच्या कठोर मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवले. माधुरीचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरत असून, “परिश्रम केल्याशिवाय यश नाही” याचे जिवंत उदाहरण ठरल आहे.
परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर माधुरी सिरसट झाली सोलापूर ग्रामीण पोलिस दलात दाखल. मोहोळ :- वाळूज (ता. मोहोळ) येथील मनसे अध्यक्ष रामभाऊ बुद्रुक यांची कन्या माधुरी मयूर सिरसट हिची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात पोलीस शिपाई पदासाठी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. माधुरीच्या या उल्लेखनीय यशामुळे तिचे माहेर वाळूज तसेच सासर यावली या दोन्ही गावांमध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. माधुरीने आपले प्राथमिक शिक्षण १ ली ते १० वी वाळूज येथे पूर्ण केले. त्यानंतर नागनाथ कॉलेज, मोहोळ येथे माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे गरड कॉलेज, मोहोळ येथे BCA पदवी प्राप्त करून तिने उच्च शिक्षण पूर्ण केले. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे ती अवघ्या १५ वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतरही न खचता तिने शिक्षण आणि करिअरचा मार्ग ठामपणे निवडला. २०१८ साली यावली (ता .मोहोळ) येथील मयूर सिरसट यांच्याशी तिचा विवाह झाला. लग्नानंतरही तिने आपले स्वप्न जपले आणि २०२४ पासून पोलिस भरतीची तयारी सुरू केली. तिच्या या प्रवासात सिद्धनागेश करिअर अकॅडमीचे अजित जाधव सर, शौर्य क्लासेसचे रमेश काकडे सर तसेच दीपस्तंभ अभ्यासिकेच्या स्वाती शेटे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनासोबतच स्वतःच्या कठोर मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवले. माधुरीचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरत असून, “परिश्रम केल्याशिवाय यश नाही” याचे जिवंत उदाहरण ठरल आहे.
- सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.1
- Post by ईलियास नजीर शेख2
- सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by कर्जत लाईव्ह1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1