Shuru
Apke Nagar Ki App…
लातूरमध्ये अचानक अवकाळी गारपीट : शेती पिके, फळबागा धोक्यात लातूर : मंगळवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने लातूर शहरासह परिसरात धुमाकूळ घातला. यावेळी जोरदार पावसासोबत गारांचा पाऊस (गारपीट) झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. अचानक बदललेल्या हवामानामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, तर गारांच्या माऱ्यामुळे वाहनचालक आणि पादचारी अडचणीत सापडले. शेतकरी वर्गासाठीही ही गारपीट चिंतेची बाब ठरत असून उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
लातूरमध्ये अचानक अवकाळी गारपीट : शेती पिके, फळबागा धोक्यात लातूर : मंगळवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने लातूर शहरासह परिसरात धुमाकूळ घातला. यावेळी जोरदार पावसासोबत गारांचा पाऊस (गारपीट) झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. अचानक बदललेल्या हवामानामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, तर गारांच्या माऱ्यामुळे वाहनचालक आणि पादचारी अडचणीत सापडले. शेतकरी वर्गासाठीही ही गारपीट चिंतेची बाब ठरत असून उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिल्हाधिकाऱ्यांची गाडी तब्बल 3 तास रोखून ठिय्या आंदोलन ! माजलगावमध्ये आज शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला! थकीत ऊस बिलाच्या मुद्द्यावर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी एकवटले आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून जोरदार आंदोलन छेडले. 💥 “ऊसाला न्याय द्या!”. 💥 “थकीत बिल तात्काळ द्या!” 💥 “शेतकरी विरोधी धोरणे बंद करा!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. 👉 महिनोनमहिने ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात 👉 वाढता खर्च, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबीयांची जबाबदारी 👉 वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. 🚨 तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन 🚓 मोठा पोलीस बंदोबस्त 🤝 प्रशासनासोबत चर्चेनंतर आंदोलन स्थगित1
- मनपा अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?”; कोट्यवधींचा रस्ता का फोडावा लागतोय?" नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती1
- पायोनियर सीबीएसई स्कूल जोमाळा-भोकरदन च्या ५ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड @Bharat 24taas News भोकरदन – जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल कालच जाहीर झाला असून यामध्ये भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल जोमाळा-भोकरदन विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे . इयत्ता ५ वी तील पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे – • आरोही प्रवीण लाळे – गुण ९५ (एकूण क्रमांक ४३) • अर्नव राकेश महाजन – गुण ९५ (एकूण क्रमांक ५३) • तन्वी गजानन मिसाळ – गुण ९५ (एकूण क्रमांक ५५) • शौर्य श्रीमंत सोन्नी– गुण ९५ (एकूण क्रमांक ६८) • विराज अरुण दांडगे – गुण ९१.२५ (एकूण क्रमांक २४१) या सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण शाळा परिवाराने विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट निकाल देण्यासाठी शाळा कटिबद्ध आहे.” या उल्लेखनीय यशामुळे पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल ची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.1
- तिसरी विशाल बौद्ध धम्म परिषद उमरखेडा तालुका मंठा येथे आयोजित करण्यात आली होती या बौद्ध धम्म परिषदेला भंते शीलरत्न महाथेरो, भंते दीपंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना झाली.1
- बदनापूर जिल्हा जालना • महाराष्ट्रातील जालना येथे मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील गेट क्रमांक ५६ येथे रेल्वे अंडरब्रिज (RUB) बांधण्यात यावा. हा प्रस्ताव बऱ्याच काळापासून प्रलंबित असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. • देवगिरी एक्सप्रेसचा थांबा बदनापूर येथे देण्यात यावा, जेणेकरून परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. • जालना जिल्ह्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेन देण्यात यावी, कारण जालना साठी मंजूर करण्यात आलेली ट्रेन नांदेडकडे वळविण्यात आली आहे. या सर्व मागण्या मी आज संसदेत रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या असून जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.1
- जालना शहरातील बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे रु. ९२,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना बस स्थानक परिसरात तसेच शहरातील विविध भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जालना शहर व परिसरातील चोरी आणि घरफोडीचे १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे रु. ९२,४७०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास जालना पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- *इराणशी वाकडं, चुलीत लाकडं… आजही बदनापुर शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा .* इराण-अमेरिका युद्धाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून बदनापुर शहरातील एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. , तर अनेकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदनापुर शहरासहित तालुक्यातील सामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे2
- महिला आयोगावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात प्रकरणामुळे संतापाचा उद्रेक ज्याच्यावर विकृत वर्तनाचे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीचा सन्मान केला जात असल्याचा आरोप समोर येताच महिला आयोगाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी उभ्या असलेल्या संस्थेनेच अशा वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक झाल्याची भावना व्यक्त होत असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आयोगाकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अत्याचार सहन करणाऱ्या महिलांनी न्यायासाठी कुणाकडे जावे, असा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ही केवळ चूक नसून महिलांच्या विश्वासाचा घात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेच्या नीतिमत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित जबाबदार व्यक्तींनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर स्वेच्छेने राजीनामा दिला गेला नाही, तर सरकारने हस्तक्षेप करून कठोर निर्णय घ्यावा, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली चालणारे असे प्रकार थांबवणे अत्यावश्यक असून, अन्यथा जनतेचा विश्वास पूर्णपणे डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.1